शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

माकडांच्या हल्ल्यात महिला जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2017 00:56 IST

साखरीटोला परिसरात पागल झालेल्या माकडांचा कहर सुरुच असून माकडांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : साखरीटोला परिसरात पागल झालेल्या माकडांचा कहर सुरुच असून माकडांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. मात्र वनविभागाचे अधिकारी निद्रावस्थेत आहेत. आतापर्यंत त्या माकडाचा बंदोबस्त करण्यात वनविभाग अपयशी ठरला आहे. अजून किती लोकांना त्या माकडांच्या हल्ल्याला सामोरे जावे लागेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभाग नागरिकांच्या मरणाची वाट पाहत आहे काय? असा प्रश्न नागरिकांनी विचारला आहे.१८ मे रोजी सलंगटोला येथील मोहपत कुशन मुनेश्वर यांचा माकडाने चावा घेवून गंभीर जखमी केले होते. ते सध्या नागपूरला उपचार घेत आहेत. ही घटना ताजी असतानाच २२ मे रोजी सकाळी ६ वाजताच्या दरम्यान साखरीटोला (सातगाव) येथील विठा काशीनाथ दोनोडे (५५) या महिलेला घराच्या मागील भागात अचानक माकडाच्या हल्ल्याचा सामना करावा लागला. झाडू घेवून साफसफाई करीत असताना माकडाने त्यांच्या अंगावर उडी घेवून मानेच्या लचका तोडला व गंभीर जखमी केले. लगेच त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र सातगाव येथे भरती करण्यात आले. येथून त्यांना रेफर टू गोंदिया करण्यात आले. १०८ क्रमांकाच्या गाडीने त्यांना गोंदियाला पुढील उपचाराकरिता नेण्यात आले. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. यापूर्वी सुद्धा हेटीटोला येथील माजी सरपंच प्रमिला बागळे, सलंगटोला येथील पाच ते सहा लोकांना व साखरीटोला येथे तीन ते चार घटना घडल्या. मात्र अजूनही माकडांचा बंदोबस्त विभाग करू शकला नाही व कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई देऊ शकला नाही. यासाठी वनविभागाचे अधिकारी कारणीभूत आहेत. साखरीटोला येथे वनविभागाचे बिट कार्यालय आहे. बरेचदा ते बंद असते. येथील बिटरक्षक एस.जी. बुंदेले हे गोंदियावरुन अपडाऊन करतात. मुख्यालयी ते राहत नाही. त्यामुळे आपल्या बिटकडे दुर्लक्ष असते. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी निलकंठ दोनोडे यांनी केली आहे.