शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

समस्यांना घेऊन नगरपंचायतवर महिलांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

सडक अर्जुनी नगर पंचायतची मुख्य समस्या स्वस्त धान्य दुकानाची आहे. स्वस्त धान्य दुकानदार हा सडक अर्जुनी येथील नसून तो बाहेरगावचा आहे. आपल्या अरेरावी प्रवृत्तीमुळे असंख्य लाभार्थ्यांची तो दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. तसेच महिन्यातून फक्त २ ते ३ दिवसच स्वस्त धान्य वाटप करतो. त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहतात.

ठळक मुद्देशहरातील समस्यांचा वाचला पाढा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, समस्या मार्गी लावा

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : येथील ग्रामपंचायतचे नगर पंचायतमध्ये रुपांतर झाले.परंतु गावकऱ्यांच्या समस्या मार्गी लागण्याऐवजी त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. समस्याग्रस्त शेकडो संतप्त महिलांनी शुक्रवारी (दि.२९) नगर पंचायतवर हल्लाबोल केला.समस्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले.सडक अर्जुनी नगर पंचायतची मुख्य समस्या स्वस्त धान्य दुकानाची आहे. स्वस्त धान्य दुकानदार हा सडक अर्जुनी येथील नसून तो बाहेरगावचा आहे. आपल्या अरेरावी प्रवृत्तीमुळे असंख्य लाभार्थ्यांची तो दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. तसेच महिन्यातून फक्त २ ते ३ दिवसच स्वस्त धान्य वाटप करतो. त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहतात. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार हा सडक अर्जुनीचाच असावा आणि सर्वांना धान्य वितरीत करण्यात यावे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नगर पंचायत करु शकत नाही.नगरातील जनतेला दूषीत पाणी पुरवठा केला जातो. नळाद्वारे येणारे पाणी गढूळ व दूषित आहे. पाण्यामुळे अनेक प्रकारचे आजार होत असून पाणीपट्टी कर हा पहिल्यापेक्षा दुप्पट वाढविला आहे. नगर पंचायतने शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. शासनाच्या घरकुल योजनेचा दोन वर्षांपासून जनतेला लाभ मिळाला नाही. अधिकारी वर्ग आणि पुढारी घरकुल योजनेतून आपल्याला काहीही फायदा होणार नाही म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तसेच घरकुल योजनेचे जे खरे लाभार्थी आहे, त्यांना डावलून आपल्या मर्जीतील लोकांचे नाव समाविष्ट करीत असल्याचा आरोप केला आहे. नगर पंचायतचे कर्मचारी सर्वसामान्य लोकांना सभ्यतेची वागणूक देत नसून असभ्यपणाची व उडवाउडवीचे उत्तरे देतात. अशा कर्मचाºयांवर कारवाई करण्यात यावी. बगीच्या,स्वच्छता, आरोग्य याचाही समावेश आहे. नगर पंचायतच्या समस्या न सुटल्यास महिलांना आंदोलन करावे असा इशाराही या वेळी दिला. या महिलांनी आपला मोर्चा पंचायत समितीकडे ही नेला होता.परंतु खंडविकास अधिकारी उपस्थित नव्हते.मोर्चाचे नेतृत्व वैशाली गिºहेपुंजे, कविता भिवगडे, मिरा झोडवने, वेनू झिंगरे, माया हुडे, उषा होळकर, पुष्पा गुप्ता, कल्पना भेंडारकर, सिंदू गिºहेपुंजे, पुष्पा सानेकर, शिंदू मालदे, इंदू परिहार, प्रभा ठाकरे, लता मालदे यांनी केले असून १३५ महिलांनी समस्या निवेदनावर स्वाक्षºया केल्या आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका