शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

समस्यांना घेऊन नगरपंचायतवर महिलांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 06:00 IST

सडक अर्जुनी नगर पंचायतची मुख्य समस्या स्वस्त धान्य दुकानाची आहे. स्वस्त धान्य दुकानदार हा सडक अर्जुनी येथील नसून तो बाहेरगावचा आहे. आपल्या अरेरावी प्रवृत्तीमुळे असंख्य लाभार्थ्यांची तो दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. तसेच महिन्यातून फक्त २ ते ३ दिवसच स्वस्त धान्य वाटप करतो. त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहतात.

ठळक मुद्देशहरातील समस्यांचा वाचला पाढा : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, समस्या मार्गी लावा

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : येथील ग्रामपंचायतचे नगर पंचायतमध्ये रुपांतर झाले.परंतु गावकऱ्यांच्या समस्या मार्गी लागण्याऐवजी त्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. समस्याग्रस्त शेकडो संतप्त महिलांनी शुक्रवारी (दि.२९) नगर पंचायतवर हल्लाबोल केला.समस्यांचे निवेदन जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्या नावे तहसीलदारांना देण्यात आले.सडक अर्जुनी नगर पंचायतची मुख्य समस्या स्वस्त धान्य दुकानाची आहे. स्वस्त धान्य दुकानदार हा सडक अर्जुनी येथील नसून तो बाहेरगावचा आहे. आपल्या अरेरावी प्रवृत्तीमुळे असंख्य लाभार्थ्यांची तो दिशाभूल करीत असल्याचा आरोप केला. तसेच महिन्यातून फक्त २ ते ३ दिवसच स्वस्त धान्य वाटप करतो. त्यामुळे अनेक लाभार्थी वंचित राहतात. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार हा सडक अर्जुनीचाच असावा आणि सर्वांना धान्य वितरीत करण्यात यावे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नगर पंचायत करु शकत नाही.नगरातील जनतेला दूषीत पाणी पुरवठा केला जातो. नळाद्वारे येणारे पाणी गढूळ व दूषित आहे. पाण्यामुळे अनेक प्रकारचे आजार होत असून पाणीपट्टी कर हा पहिल्यापेक्षा दुप्पट वाढविला आहे. नगर पंचायतने शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. शासनाच्या घरकुल योजनेचा दोन वर्षांपासून जनतेला लाभ मिळाला नाही. अधिकारी वर्ग आणि पुढारी घरकुल योजनेतून आपल्याला काहीही फायदा होणार नाही म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तसेच घरकुल योजनेचे जे खरे लाभार्थी आहे, त्यांना डावलून आपल्या मर्जीतील लोकांचे नाव समाविष्ट करीत असल्याचा आरोप केला आहे. नगर पंचायतचे कर्मचारी सर्वसामान्य लोकांना सभ्यतेची वागणूक देत नसून असभ्यपणाची व उडवाउडवीचे उत्तरे देतात. अशा कर्मचाºयांवर कारवाई करण्यात यावी. बगीच्या,स्वच्छता, आरोग्य याचाही समावेश आहे. नगर पंचायतच्या समस्या न सुटल्यास महिलांना आंदोलन करावे असा इशाराही या वेळी दिला. या महिलांनी आपला मोर्चा पंचायत समितीकडे ही नेला होता.परंतु खंडविकास अधिकारी उपस्थित नव्हते.मोर्चाचे नेतृत्व वैशाली गिºहेपुंजे, कविता भिवगडे, मिरा झोडवने, वेनू झिंगरे, माया हुडे, उषा होळकर, पुष्पा गुप्ता, कल्पना भेंडारकर, सिंदू गिºहेपुंजे, पुष्पा सानेकर, शिंदू मालदे, इंदू परिहार, प्रभा ठाकरे, लता मालदे यांनी केले असून १३५ महिलांनी समस्या निवेदनावर स्वाक्षºया केल्या आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका