शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

महिला व बालविकास विभागाचे अधिकारी ‘त्यांच्या’ घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2017 01:06 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निमगाव-बोंडगाव येथील जन्मदात्या माय-बापांचे छत्र हरपलेल्या त्या चार

 माधुरी नासरे : पुनर्वसन व शैक्षणिक प्रवाहात आणणार लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निमगाव-बोंडगाव येथील जन्मदात्या माय-बापांचे छत्र हरपलेल्या त्या चार अनाथ निरागस लेकींची जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाने गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्षात अधिकारी वर्ग त्यांच्या झोपडीवजा दारामध्ये बुधवारी (दि.१४) धडकले. केश कर्तनाचे काम करून घराचा गाडा चालविणाऱ्या निमगाव येथील ४० वर्षीय अनिल सुदाम सूर्यवंशी हा पत्नी मंगला (३६) व मोहीणी (१७), स्वाती (१५), जोत्सना (१०), टिष्ट्वंकल (८) या चार मुलींसोबत राहत होता. अचानक एके दिवशी घरचा करता पुरुष असलेला अनिल यांची प्रकृती एकाएकी खालावली व २३ एप्रिल २०१७ रोजी अनिलची प्राणज्योत मालवली. त्यापाठोपाठ १९ मे रोजी ध्यानीमनी काहीही कल्पना नसताना मंगला यांची एकाएकी प्रकृती गंभीर स्वरुपाने खालावली. कोणताही औषधोपचार करण्याची दैवाने संधी न देता मंगला हिने देह त्यागला. मागे पुढे २५ दिवसांच्या फरकाने जन्मदात्या माय-बापाचे एकाकी छत्र हरपल्याने त्या चारही बहीणी अनाथ झाल्या. एकाकी पडल्या हसण्या बाळगण्याच्या वयात मायबापाची साथ सोडून गेल्याने पुढील आयुष्य त्या ४ बहिणीनी कसे व्यथित करायचे असा गंभीर प्रश्न सूर्यवंशी कुटूंबावर पडला. मायबापाचे छत्र हरवून अनाथ झालेल्या त्या चारही बहिणींची व्यथा वेळोवेळी ‘लोकमत’ ने मांडून मदतीचे आवाहन केले होते. मानवी मनाला वेदना देऊन सहानुभूती निर्माण करणाऱ्या बातम्यानी सामाजिक दानदाते पुढे आले. त्या बातमीची दखल घेऊन राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे संबंधीत अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा ताफा थेट त्या चार अनाथ बहिणींच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी निमगाव येथील त्यांच्या राहत्या घरी बुधवारी (१४) येवून ठेपला. बालकल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. माधुरी नासरे, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी सुहास बोंदरे, समाजिक कार्यकर्ता मुकेश पटले, सरंक्षण अधिकारी प्रवीण वाकडे, गजानन गोबाडे यांनी चारही अनाथ बहिणींची भेट घेतली. डॉ. नासरे यांनी त्यांची हकीकत जाणून घेतली. बाल न्याय (काळजी व सरंक्षण) अधिनियम २००० (२००६) व सुधारीत अधिनियम २०१५ अन्वये काळजी व सरंक्षणाची गरज असणाऱ्या ० ते १८ वयोगटातील बालकांना पूनर्वसन करणे तसेच त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, सर्वागिण विकास घडविणे, बालकांना अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध करून देणे इत्यादी सोयी सवलती पुरविण्याचे काम बालविकास विभागाअंतर्गत बाल कल्याण समिती व जिल्हा बालसरंक्षण अधिकारी कक्षाच्या समन्वयाने बालकाच्या काळजी व संरक्षणाचे कार्य निरंतरपणे करीत असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले. चारही बहिणीचे संगोपन व शैक्षणिक कार्याची जबाबदारी विभागाच्यावतीने घेतली जाईल, त्यांनी त्यांच्या घरातील काका, आजा व आजींच्या समक्ष सांगीतले. आपण संमती दिली तर बहिणीच्या संगोपनाची दखल घेऊ असे त्यांनी सांगितले. यावेळी पो.पा. संजय कापगते, माधोराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता आनंद गायकवाड, प्रा. माधव चचाणे, मुलीचे काका बबन सूर्यवंशी उपस्थित होते.