शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

महिला व बालविकास विभागाचे अधिकारी ‘त्यांच्या’ घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2017 01:06 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निमगाव-बोंडगाव येथील जन्मदात्या माय-बापांचे छत्र हरपलेल्या त्या चार

 माधुरी नासरे : पुनर्वसन व शैक्षणिक प्रवाहात आणणार लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निमगाव-बोंडगाव येथील जन्मदात्या माय-बापांचे छत्र हरपलेल्या त्या चार अनाथ निरागस लेकींची जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाने गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्षात अधिकारी वर्ग त्यांच्या झोपडीवजा दारामध्ये बुधवारी (दि.१४) धडकले. केश कर्तनाचे काम करून घराचा गाडा चालविणाऱ्या निमगाव येथील ४० वर्षीय अनिल सुदाम सूर्यवंशी हा पत्नी मंगला (३६) व मोहीणी (१७), स्वाती (१५), जोत्सना (१०), टिष्ट्वंकल (८) या चार मुलींसोबत राहत होता. अचानक एके दिवशी घरचा करता पुरुष असलेला अनिल यांची प्रकृती एकाएकी खालावली व २३ एप्रिल २०१७ रोजी अनिलची प्राणज्योत मालवली. त्यापाठोपाठ १९ मे रोजी ध्यानीमनी काहीही कल्पना नसताना मंगला यांची एकाएकी प्रकृती गंभीर स्वरुपाने खालावली. कोणताही औषधोपचार करण्याची दैवाने संधी न देता मंगला हिने देह त्यागला. मागे पुढे २५ दिवसांच्या फरकाने जन्मदात्या माय-बापाचे एकाकी छत्र हरपल्याने त्या चारही बहीणी अनाथ झाल्या. एकाकी पडल्या हसण्या बाळगण्याच्या वयात मायबापाची साथ सोडून गेल्याने पुढील आयुष्य त्या ४ बहिणीनी कसे व्यथित करायचे असा गंभीर प्रश्न सूर्यवंशी कुटूंबावर पडला. मायबापाचे छत्र हरवून अनाथ झालेल्या त्या चारही बहिणींची व्यथा वेळोवेळी ‘लोकमत’ ने मांडून मदतीचे आवाहन केले होते. मानवी मनाला वेदना देऊन सहानुभूती निर्माण करणाऱ्या बातम्यानी सामाजिक दानदाते पुढे आले. त्या बातमीची दखल घेऊन राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे संबंधीत अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा ताफा थेट त्या चार अनाथ बहिणींच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी निमगाव येथील त्यांच्या राहत्या घरी बुधवारी (१४) येवून ठेपला. बालकल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. माधुरी नासरे, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी सुहास बोंदरे, समाजिक कार्यकर्ता मुकेश पटले, सरंक्षण अधिकारी प्रवीण वाकडे, गजानन गोबाडे यांनी चारही अनाथ बहिणींची भेट घेतली. डॉ. नासरे यांनी त्यांची हकीकत जाणून घेतली. बाल न्याय (काळजी व सरंक्षण) अधिनियम २००० (२००६) व सुधारीत अधिनियम २०१५ अन्वये काळजी व सरंक्षणाची गरज असणाऱ्या ० ते १८ वयोगटातील बालकांना पूनर्वसन करणे तसेच त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, सर्वागिण विकास घडविणे, बालकांना अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध करून देणे इत्यादी सोयी सवलती पुरविण्याचे काम बालविकास विभागाअंतर्गत बाल कल्याण समिती व जिल्हा बालसरंक्षण अधिकारी कक्षाच्या समन्वयाने बालकाच्या काळजी व संरक्षणाचे कार्य निरंतरपणे करीत असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले. चारही बहिणीचे संगोपन व शैक्षणिक कार्याची जबाबदारी विभागाच्यावतीने घेतली जाईल, त्यांनी त्यांच्या घरातील काका, आजा व आजींच्या समक्ष सांगीतले. आपण संमती दिली तर बहिणीच्या संगोपनाची दखल घेऊ असे त्यांनी सांगितले. यावेळी पो.पा. संजय कापगते, माधोराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता आनंद गायकवाड, प्रा. माधव चचाणे, मुलीचे काका बबन सूर्यवंशी उपस्थित होते.