शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

महिला व बालविकास विभागाचे अधिकारी ‘त्यांच्या’ घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2017 01:06 IST

अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निमगाव-बोंडगाव येथील जन्मदात्या माय-बापांचे छत्र हरपलेल्या त्या चार

 माधुरी नासरे : पुनर्वसन व शैक्षणिक प्रवाहात आणणार लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निमगाव-बोंडगाव येथील जन्मदात्या माय-बापांचे छत्र हरपलेल्या त्या चार अनाथ निरागस लेकींची जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाने गांभीर्याने दखल घेऊन प्रत्यक्षात अधिकारी वर्ग त्यांच्या झोपडीवजा दारामध्ये बुधवारी (दि.१४) धडकले. केश कर्तनाचे काम करून घराचा गाडा चालविणाऱ्या निमगाव येथील ४० वर्षीय अनिल सुदाम सूर्यवंशी हा पत्नी मंगला (३६) व मोहीणी (१७), स्वाती (१५), जोत्सना (१०), टिष्ट्वंकल (८) या चार मुलींसोबत राहत होता. अचानक एके दिवशी घरचा करता पुरुष असलेला अनिल यांची प्रकृती एकाएकी खालावली व २३ एप्रिल २०१७ रोजी अनिलची प्राणज्योत मालवली. त्यापाठोपाठ १९ मे रोजी ध्यानीमनी काहीही कल्पना नसताना मंगला यांची एकाएकी प्रकृती गंभीर स्वरुपाने खालावली. कोणताही औषधोपचार करण्याची दैवाने संधी न देता मंगला हिने देह त्यागला. मागे पुढे २५ दिवसांच्या फरकाने जन्मदात्या माय-बापाचे एकाकी छत्र हरपल्याने त्या चारही बहीणी अनाथ झाल्या. एकाकी पडल्या हसण्या बाळगण्याच्या वयात मायबापाची साथ सोडून गेल्याने पुढील आयुष्य त्या ४ बहिणीनी कसे व्यथित करायचे असा गंभीर प्रश्न सूर्यवंशी कुटूंबावर पडला. मायबापाचे छत्र हरवून अनाथ झालेल्या त्या चारही बहिणींची व्यथा वेळोवेळी ‘लोकमत’ ने मांडून मदतीचे आवाहन केले होते. मानवी मनाला वेदना देऊन सहानुभूती निर्माण करणाऱ्या बातम्यानी सामाजिक दानदाते पुढे आले. त्या बातमीची दखल घेऊन राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाचे संबंधीत अधिकारी व पदाधिकाऱ्यांचा ताफा थेट त्या चार अनाथ बहिणींच्या व्यथा ऐकून घेण्यासाठी निमगाव येथील त्यांच्या राहत्या घरी बुधवारी (१४) येवून ठेपला. बालकल्याण समितीच्या अध्यक्ष डॉ. माधुरी नासरे, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी सुहास बोंदरे, समाजिक कार्यकर्ता मुकेश पटले, सरंक्षण अधिकारी प्रवीण वाकडे, गजानन गोबाडे यांनी चारही अनाथ बहिणींची भेट घेतली. डॉ. नासरे यांनी त्यांची हकीकत जाणून घेतली. बाल न्याय (काळजी व सरंक्षण) अधिनियम २००० (२००६) व सुधारीत अधिनियम २०१५ अन्वये काळजी व सरंक्षणाची गरज असणाऱ्या ० ते १८ वयोगटातील बालकांना पूनर्वसन करणे तसेच त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे, सर्वागिण विकास घडविणे, बालकांना अन्न, वस्त्र, निवारा उपलब्ध करून देणे इत्यादी सोयी सवलती पुरविण्याचे काम बालविकास विभागाअंतर्गत बाल कल्याण समिती व जिल्हा बालसरंक्षण अधिकारी कक्षाच्या समन्वयाने बालकाच्या काळजी व संरक्षणाचे कार्य निरंतरपणे करीत असल्याचे याप्रसंगी त्यांनी सांगितले. चारही बहिणीचे संगोपन व शैक्षणिक कार्याची जबाबदारी विभागाच्यावतीने घेतली जाईल, त्यांनी त्यांच्या घरातील काका, आजा व आजींच्या समक्ष सांगीतले. आपण संमती दिली तर बहिणीच्या संगोपनाची दखल घेऊ असे त्यांनी सांगितले. यावेळी पो.पा. संजय कापगते, माधोराव गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता आनंद गायकवाड, प्रा. माधव चचाणे, मुलीचे काका बबन सूर्यवंशी उपस्थित होते.