शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
2
जो तो एआयच्या मागे लागलाय...! इंटेलच्या CEO नी यासाठी राजीनामा दिला; आता ₹९१५ कोटी लावून...
3
भाभा अणुसंशोधन केंद्रात हेरगिरीचा डाव, शास्त्रज्ञ बनून फिरत होते आदिल आणि अख्तर, असं फुटलं बिंग 
4
बच्चू कडूंनी चर्चेला यावं! लोकांना, रुग्णांना त्रास होईल असं काही करू नये - देवेंद्र फडणवीस
5
"मुख्यमंत्रिपदावर मी नको होतो म्हणून मला..," फडणवीसांच्या आरोपांनंतर एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट
6
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
7
राम मंदिरासाठी भक्तांनी दिले तब्बल ३ हजार कोटींचे दान, १५०० कोटी खर्च; बांधकाम पूर्णत्वाकडे!
8
तुम्हाला किती रिटर्न मिळेल माहीत नाही, परंतु पीयूष बन्सल आणि त्यांच्या बहिणीला मिळणार कोट्यवधी रुपये
9
गुड मॉर्निंग! उठल्यानंतर फॉलो करा २०-२०-२० रूल; दिवसभर राहाल पॉझिटिव्ह अन् एनर्जेटिक
10
IND vs AUS 1st T20I : टॉस वेळी मार्शचा खास विक्रम! टीम इंडियातील युवा ऑलराउंडर ३ सामन्यातून 'आउट'
11
जमात-उल-मोमिनत... महिलांना हाताशी धरून मसूद अझहरची नवी खेळी; भारताविरोधात पुन्हा रचला कट
12
निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम
13
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
14
जेवण बनवता येत नाही, काही शिकवले नाही का? वरळीतील विवाहितेला छळ असह्य, सासरच्यांविरोधात दिली तक्रार
15
कमी भाड्याचं आमिष दाखवून महिलांना टॅक्सीत बसवायचे अन् रस्त्यातच...; कुठे घडत होत्या धक्कादायक घटना?
16
काँग्रेसच्या नेत्याने कार्यक्रमात म्हटलं बांगलादेशचं राष्ट्रगीत, भाजपा आक्रमक, काँग्रेसनं दिलं असं प्रत्युत्तर
17
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
18
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
19
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
20
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई

१५ दिवसातच खड्डे ‘जैसे थे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:12 IST

सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक-अर्जुनी या १४ किमी. लांबीच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागतात.

ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : शेंडा ते सडक-अर्जुनी मार्गाचे नव्याने डांबरीकरण करा

लोकमत न्यूज नेटवर्कशेंडा (कोयलारी) : सडक-अर्जुनी तालुक्यातील शेंडा ते सडक-अर्जुनी या १४ किमी. लांबीच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरुन वाहने चालवावी लागतात. या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे, यासाठी अनेकदा वृत्तपत्रांतून बातम्या झळकल्या. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या वृत्तांकडे लक्ष न देता कंत्राटदार व स्वहिताकडे लक्ष देवून अधूनमधून खड्डे बुजविण्याचे काम केले. परिणामी १५ दिवसांतच खड्ड्यांची ‘जैसे थे’ परिस्थिती झाली आहे.सडक-अर्जुनी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने लोकांना कार्यालयीन कामासाठी येणे-जाणे करावे लागते. अशातच दिवसेंदिवस वाहतुकीच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. परिणामी रस्त्याची दुर्दशा होवून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. याच मार्गावर येणाऱ्या शेंडा ते उशिखेडा या ५ किमी. रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट आहे. या रस्त्यावरुन वाहन चालकांना आपली बाजू सोडून कधीकधी उजव्या बाजूने वाहन चालवावे लागते. अशावेळी अपघात घडून मृत्यूला आमंत्रण देण्याची परिस्थिती येवू शकते.या मार्गावर प्रत्येक १-२ किमी.च्या अंतरावर जीवघेणे वळण आहेत. त्यामुळे समोरुन येणारे वाहन एकमेकांना दिसत नाही. अशातच अनेक अपघात घडले आहेत. राज्याचे बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा करून १५ डिसेंबर २०१७ पर्यंत खड्डे भरण्याचे निर्देश अधिकाºयांना दिले होते. मात्र अडेलतट्टू अधिकाऱ्यांनी मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाची अंमलबजावणी केली नसल्याचे दिसून येते.राष्टÑीय महामार्ग क्र.६ पासून पुतळी, कोयलारी, शेंडा, सालईटोला हा मार्ग तयार असताना या मार्गावर नव्याने डांबरीकरणाचे काम प्रगती पथावर आहे. परंतु शेंडा ते सडक अर्जुनी या रहदारीच्या मार्गाकडे दुर्लक्ष करण्यात आले. यावरुन सा.बां. विभागाच्या अधिकाºयांच्या कार्यप्रणालीवर शंका निर्माण होते. हा परिसर आदिवासीबहुल व नक्षल क्षेत्रात मोडतो. त्यामुळे शासन व प्रशासन या क्षेत्राकडे नेहमीच दुर्लक्ष करतात, असे बोलले जाते. त्याचप्रमाणे काम न करताच काम सुरु असल्याचे सांगून वरिष्ठ व जनतेची दिशाभूल केली जाते.याचे ताजे उदाहरण म्हणजे खोल ढोडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रपट्यावर याच वर्षी नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. परंतु पोच मार्गाच्या कामाला त्यावेळी सुरुवात झाली नव्हती व सद्यस्थितीत सुद्धा झाली नाही. तरी सा.बां. विभागाच्या एका अधिकाऱ्याने पोच मार्गाचे काम सुरु असल्याचे वर्तमान पत्रातून प्रकाशित करुन स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेतली होती. यावरुन या विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मानसिकता लक्षात येते. या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्ता पूर्णत: उखडला आहे. त्यामुळे नव्याने डांबरीकरण होणे गरजेचे आहे. जेणेकरुन या मार्गावरुन रहदारीला त्रास होणार नाही. यासाठी सा.बां. बांधकाम विभागाने जातीने लक्ष पुरवून नव्याने डांबरीकरण करावे, अशी मागणी जनतेकडून करण्यात आली आहे.दरवर्षी ठिगळ लावण्याचा उपक्रममागील तीन वर्षांपूर्वी शेंडा ते सडक-अर्जुनी या १४ किमी. अंतराच्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण होणार होते. त्यासाठी ४० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते. एवढेच नाही तर या रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनही उरकले होते. मात्र तीन वर्षांचा काळ लोटूनही डांबरीकरणास सुरुवात झाली नाही. कंत्राटदार व स्वत:चे हित जोपासून दरवर्षी ठिगळ लावण्याचा उपक्रम सार्वजनिक बांधकाम विभाग राबवित असल्याचे दिसून येते.