शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

गरिबांचे अश्रू पुसणे हेच ध्येय

By admin | Updated: February 22, 2016 01:57 IST

९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारण या समिकरणातून १२ वर्षांपूर्वी युवा स्वाभिमानची अमरावती जिल्ह्यात पेरणी करण्यात आली.

रवी राणा : युवा जागृती संमेलनाची सांगतागोंदिया : ९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारण या समिकरणातून १२ वर्षांपूर्वी युवा स्वाभिमानची अमरावती जिल्ह्यात पेरणी करण्यात आली. आजघडीला गावापासून मोठ्या शहरापर्यंत युवा स्वाभिमानरूपी रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. गरीब, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व तळागाळातील सर्वसामान्य जनतेसाठी ही संघटना तत्पर असून गरिबांचे अश्रू पुसणे हे युवा स्वाभिमानचे ध्येयधोरण आहे, असे प्रतिपादन युवा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष आ. रवी राणा यांनी केले.युवा स्वाभिमानच्या वतीने गणेशनगर येथील शारदा कॉन्व्हेंटच्या प्रांगणात युवा जागृती संमेलन घेण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मार्गदर्शक म्हणून बडनेरा क्षेत्राचे आ. रवी राणा उपस्थित होते. उपस्थित संघटनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले, युवा स्वाभिमान ही केवळ संघटनाच नव्हे, तर विचारांची चळवळ आहे. कार्यकर्त्यांनी समाजातील सर्वसामान्य गरीब जनतेसाठी लढावे. प्रसंगी त्यांच्या समस्यांसाठी रस्त्यावरदेखील उतरण्याची तयारी ठेवावी, असे ते म्हणाले.याप्रसंगी मंचावर युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, सेवानिवृत्त समाजकल्याण उपायुक्त अनिल देशमुख, नागपूरचे जिल्हाध्यक्ष शेखर बिसेन, वाय.पी. येडे, संचालक भूवन बिसेन, पोलीस पाटील हेतराम रहांगडाले, शैलेश मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकातून जितेश राणे यांनी युवा स्वाभिमानच्या बळकटीकरणाची पार्श्वभूमी मांडून भूमिका स्पष्ट केली.पुढे राणा म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडताना अटक झाली तरी चालेल, परंतु शेतकऱ्यांसाठी संपूर्ण ताकदीने कार्यकर्त्यांनी आंदोलन उभारावे. कार्यकर्त्यांची नुसती गर्दी नको तर दर्दी कार्यकर्ते असावेत ज्यांना समाजातील समस्यांची जाण आहे. महागडी शस्त्रक्रिया, अपूर्ण शिक्षण अशा समस्या असल्यास नागरिकांनी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. त्यांचे नि:शुल्क उपचार करून देण्यात येईल. पैशासाठी शिक्षण सोडणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल. अदानीसारख्या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळणे गरजेचे आहे. परप्रांतीयांना हाकलून लावून स्थानिकांना रोजगार देण्यासाठी युवा स्वाभिमान पुढाकार घेईल. महत्त्वाकांक्षी भेल प्रकल्प रखडला आहे. त्याला सुरू करून स्थानिकांना रोजगार देण्यात यावे, अशी मागणी आपण स्वत: मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील गरिबांसाठी लवकरच मोफत रूग्णाहिका पुरविण्याची घोषणा त्यांनी केली. वेगळा विदर्भ करण्याचे भाजपने वचन दिले होते. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वेगळा विदर्भ न केल्यास भाजपला मतदार जागा दाखवतील, असा टोलाही राणा यांनी लगावला. तसेच पुढच्या दौऱ्यात गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक मागासलेल्या गावात एक रात्र मुक्काम करून समस्यांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुनील वाघमारे यांनी केले. आभार धनजित बैस यांनी मानले. कार्यक्रमासाठी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)