शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांचे अश्रू पुसणे हेच ध्येय

By admin | Updated: February 22, 2016 01:57 IST

९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारण या समिकरणातून १२ वर्षांपूर्वी युवा स्वाभिमानची अमरावती जिल्ह्यात पेरणी करण्यात आली.

रवी राणा : युवा जागृती संमेलनाची सांगतागोंदिया : ९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारण या समिकरणातून १२ वर्षांपूर्वी युवा स्वाभिमानची अमरावती जिल्ह्यात पेरणी करण्यात आली. आजघडीला गावापासून मोठ्या शहरापर्यंत युवा स्वाभिमानरूपी रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. गरीब, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व तळागाळातील सर्वसामान्य जनतेसाठी ही संघटना तत्पर असून गरिबांचे अश्रू पुसणे हे युवा स्वाभिमानचे ध्येयधोरण आहे, असे प्रतिपादन युवा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष आ. रवी राणा यांनी केले.युवा स्वाभिमानच्या वतीने गणेशनगर येथील शारदा कॉन्व्हेंटच्या प्रांगणात युवा जागृती संमेलन घेण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मार्गदर्शक म्हणून बडनेरा क्षेत्राचे आ. रवी राणा उपस्थित होते. उपस्थित संघटनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले, युवा स्वाभिमान ही केवळ संघटनाच नव्हे, तर विचारांची चळवळ आहे. कार्यकर्त्यांनी समाजातील सर्वसामान्य गरीब जनतेसाठी लढावे. प्रसंगी त्यांच्या समस्यांसाठी रस्त्यावरदेखील उतरण्याची तयारी ठेवावी, असे ते म्हणाले.याप्रसंगी मंचावर युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, सेवानिवृत्त समाजकल्याण उपायुक्त अनिल देशमुख, नागपूरचे जिल्हाध्यक्ष शेखर बिसेन, वाय.पी. येडे, संचालक भूवन बिसेन, पोलीस पाटील हेतराम रहांगडाले, शैलेश मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकातून जितेश राणे यांनी युवा स्वाभिमानच्या बळकटीकरणाची पार्श्वभूमी मांडून भूमिका स्पष्ट केली.पुढे राणा म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडताना अटक झाली तरी चालेल, परंतु शेतकऱ्यांसाठी संपूर्ण ताकदीने कार्यकर्त्यांनी आंदोलन उभारावे. कार्यकर्त्यांची नुसती गर्दी नको तर दर्दी कार्यकर्ते असावेत ज्यांना समाजातील समस्यांची जाण आहे. महागडी शस्त्रक्रिया, अपूर्ण शिक्षण अशा समस्या असल्यास नागरिकांनी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. त्यांचे नि:शुल्क उपचार करून देण्यात येईल. पैशासाठी शिक्षण सोडणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल. अदानीसारख्या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळणे गरजेचे आहे. परप्रांतीयांना हाकलून लावून स्थानिकांना रोजगार देण्यासाठी युवा स्वाभिमान पुढाकार घेईल. महत्त्वाकांक्षी भेल प्रकल्प रखडला आहे. त्याला सुरू करून स्थानिकांना रोजगार देण्यात यावे, अशी मागणी आपण स्वत: मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील गरिबांसाठी लवकरच मोफत रूग्णाहिका पुरविण्याची घोषणा त्यांनी केली. वेगळा विदर्भ करण्याचे भाजपने वचन दिले होते. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वेगळा विदर्भ न केल्यास भाजपला मतदार जागा दाखवतील, असा टोलाही राणा यांनी लगावला. तसेच पुढच्या दौऱ्यात गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक मागासलेल्या गावात एक रात्र मुक्काम करून समस्यांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुनील वाघमारे यांनी केले. आभार धनजित बैस यांनी मानले. कार्यक्रमासाठी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)