शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

गरिबांचे अश्रू पुसणे हेच ध्येय

By admin | Updated: February 22, 2016 01:57 IST

९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारण या समिकरणातून १२ वर्षांपूर्वी युवा स्वाभिमानची अमरावती जिल्ह्यात पेरणी करण्यात आली.

रवी राणा : युवा जागृती संमेलनाची सांगतागोंदिया : ९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारण या समिकरणातून १२ वर्षांपूर्वी युवा स्वाभिमानची अमरावती जिल्ह्यात पेरणी करण्यात आली. आजघडीला गावापासून मोठ्या शहरापर्यंत युवा स्वाभिमानरूपी रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. गरीब, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व तळागाळातील सर्वसामान्य जनतेसाठी ही संघटना तत्पर असून गरिबांचे अश्रू पुसणे हे युवा स्वाभिमानचे ध्येयधोरण आहे, असे प्रतिपादन युवा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष आ. रवी राणा यांनी केले.युवा स्वाभिमानच्या वतीने गणेशनगर येथील शारदा कॉन्व्हेंटच्या प्रांगणात युवा जागृती संमेलन घेण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मार्गदर्शक म्हणून बडनेरा क्षेत्राचे आ. रवी राणा उपस्थित होते. उपस्थित संघटनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले, युवा स्वाभिमान ही केवळ संघटनाच नव्हे, तर विचारांची चळवळ आहे. कार्यकर्त्यांनी समाजातील सर्वसामान्य गरीब जनतेसाठी लढावे. प्रसंगी त्यांच्या समस्यांसाठी रस्त्यावरदेखील उतरण्याची तयारी ठेवावी, असे ते म्हणाले.याप्रसंगी मंचावर युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, सेवानिवृत्त समाजकल्याण उपायुक्त अनिल देशमुख, नागपूरचे जिल्हाध्यक्ष शेखर बिसेन, वाय.पी. येडे, संचालक भूवन बिसेन, पोलीस पाटील हेतराम रहांगडाले, शैलेश मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकातून जितेश राणे यांनी युवा स्वाभिमानच्या बळकटीकरणाची पार्श्वभूमी मांडून भूमिका स्पष्ट केली.पुढे राणा म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडताना अटक झाली तरी चालेल, परंतु शेतकऱ्यांसाठी संपूर्ण ताकदीने कार्यकर्त्यांनी आंदोलन उभारावे. कार्यकर्त्यांची नुसती गर्दी नको तर दर्दी कार्यकर्ते असावेत ज्यांना समाजातील समस्यांची जाण आहे. महागडी शस्त्रक्रिया, अपूर्ण शिक्षण अशा समस्या असल्यास नागरिकांनी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. त्यांचे नि:शुल्क उपचार करून देण्यात येईल. पैशासाठी शिक्षण सोडणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल. अदानीसारख्या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळणे गरजेचे आहे. परप्रांतीयांना हाकलून लावून स्थानिकांना रोजगार देण्यासाठी युवा स्वाभिमान पुढाकार घेईल. महत्त्वाकांक्षी भेल प्रकल्प रखडला आहे. त्याला सुरू करून स्थानिकांना रोजगार देण्यात यावे, अशी मागणी आपण स्वत: मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील गरिबांसाठी लवकरच मोफत रूग्णाहिका पुरविण्याची घोषणा त्यांनी केली. वेगळा विदर्भ करण्याचे भाजपने वचन दिले होते. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वेगळा विदर्भ न केल्यास भाजपला मतदार जागा दाखवतील, असा टोलाही राणा यांनी लगावला. तसेच पुढच्या दौऱ्यात गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक मागासलेल्या गावात एक रात्र मुक्काम करून समस्यांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुनील वाघमारे यांनी केले. आभार धनजित बैस यांनी मानले. कार्यक्रमासाठी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)