शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
2
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
3
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
4
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
5
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
6
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
7
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
8
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
9
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
10
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
11
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
12
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
13
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
14
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
15
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
16
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
17
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
18
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
19
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
20
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले

गरिबांचे अश्रू पुसणे हेच ध्येय

By admin | Updated: February 22, 2016 01:57 IST

९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारण या समिकरणातून १२ वर्षांपूर्वी युवा स्वाभिमानची अमरावती जिल्ह्यात पेरणी करण्यात आली.

रवी राणा : युवा जागृती संमेलनाची सांगतागोंदिया : ९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारण या समिकरणातून १२ वर्षांपूर्वी युवा स्वाभिमानची अमरावती जिल्ह्यात पेरणी करण्यात आली. आजघडीला गावापासून मोठ्या शहरापर्यंत युवा स्वाभिमानरूपी रोपट्याचा वटवृक्ष झाला आहे. गरीब, शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार व तळागाळातील सर्वसामान्य जनतेसाठी ही संघटना तत्पर असून गरिबांचे अश्रू पुसणे हे युवा स्वाभिमानचे ध्येयधोरण आहे, असे प्रतिपादन युवा स्वाभिमानचे संस्थापक अध्यक्ष आ. रवी राणा यांनी केले.युवा स्वाभिमानच्या वतीने गणेशनगर येथील शारदा कॉन्व्हेंटच्या प्रांगणात युवा जागृती संमेलन घेण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मार्गदर्शक म्हणून बडनेरा क्षेत्राचे आ. रवी राणा उपस्थित होते. उपस्थित संघटनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते पुढे म्हणाले, युवा स्वाभिमान ही केवळ संघटनाच नव्हे, तर विचारांची चळवळ आहे. कार्यकर्त्यांनी समाजातील सर्वसामान्य गरीब जनतेसाठी लढावे. प्रसंगी त्यांच्या समस्यांसाठी रस्त्यावरदेखील उतरण्याची तयारी ठेवावी, असे ते म्हणाले.याप्रसंगी मंचावर युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश राणे, सेवानिवृत्त समाजकल्याण उपायुक्त अनिल देशमुख, नागपूरचे जिल्हाध्यक्ष शेखर बिसेन, वाय.पी. येडे, संचालक भूवन बिसेन, पोलीस पाटील हेतराम रहांगडाले, शैलेश मानकर आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकातून जितेश राणे यांनी युवा स्वाभिमानच्या बळकटीकरणाची पार्श्वभूमी मांडून भूमिका स्पष्ट केली.पुढे राणा म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडताना अटक झाली तरी चालेल, परंतु शेतकऱ्यांसाठी संपूर्ण ताकदीने कार्यकर्त्यांनी आंदोलन उभारावे. कार्यकर्त्यांची नुसती गर्दी नको तर दर्दी कार्यकर्ते असावेत ज्यांना समाजातील समस्यांची जाण आहे. महागडी शस्त्रक्रिया, अपूर्ण शिक्षण अशा समस्या असल्यास नागरिकांनी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. त्यांचे नि:शुल्क उपचार करून देण्यात येईल. पैशासाठी शिक्षण सोडणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाईल. अदानीसारख्या उद्योगांमध्ये स्थानिकांना रोजगार मिळणे गरजेचे आहे. परप्रांतीयांना हाकलून लावून स्थानिकांना रोजगार देण्यासाठी युवा स्वाभिमान पुढाकार घेईल. महत्त्वाकांक्षी भेल प्रकल्प रखडला आहे. त्याला सुरू करून स्थानिकांना रोजगार देण्यात यावे, अशी मागणी आपण स्वत: मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे ते म्हणाले. दरम्यान गोंदिया जिल्ह्यातील गरिबांसाठी लवकरच मोफत रूग्णाहिका पुरविण्याची घोषणा त्यांनी केली. वेगळा विदर्भ करण्याचे भाजपने वचन दिले होते. परंतु याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वेगळा विदर्भ न केल्यास भाजपला मतदार जागा दाखवतील, असा टोलाही राणा यांनी लगावला. तसेच पुढच्या दौऱ्यात गोंदिया जिल्ह्यातील सर्वाधिक मागासलेल्या गावात एक रात्र मुक्काम करून समस्यांचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुनील वाघमारे यांनी केले. आभार धनजित बैस यांनी मानले. कार्यक्रमासाठी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)