शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

विकासासाठी हवा विदर्भ वेगळा

By admin | Updated: February 3, 2016 01:55 IST

सन १९९७ ला भाजपाने भुवनेश्वरला वेगळ्या विदर्भाचा ठराव केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी सत्तारुढ

राम नेवले : विदर्भ राज्यासाठी ३१ मार्चला दिल्लीत विशाल आंदोलन तिरोडा : सन १९९७ ला भाजपाने भुवनेश्वरला वेगळ्या विदर्भाचा ठराव केला. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळी सत्तारुढ पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांनी आमच्या केंद्रात राज्य आल्यास आम्ही वेगळा विदर्भ देऊच, असेही ठोस आश्वासन विदर्भाच्या जनतेला दिले. विदर्भातील जनतेनेही आश्वासनावर विश्वास ठेऊन विदर्भातून ४४ आमदार निवडून दिले. त्यामुळेच महाराष्ट्रात सत्ता मिळाली व केद्रातही सत्ता प्राप्त झाली. परंतु आता आश्वासन देणारे नेते विदर्भ राज्य विसरून गेले व विदर्भ विकासाच्या गप्पा मारीत आहेत, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले म्हणाले.स्थानिक पोलीस स्थानकासमोर आयोजित सभेत ते बोलत होते.नेवले पुढे म्हणाले, देशातील सर्वात जास्त कर्जबाजारी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख झाली आहे. अशा दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या महाराष्ट्रात राहून राज्यकर्ते कितीही विकासाचे बोल बोलत असले तरी महाराष्ट्रात राहून विदर्भाचा विकास केवळ अशक्य आहे. वेगळे विदर्भ राज्य हेच विदर्भ राज्याचे विकासाचे मूलमंत्र आहे, असे परखड मत त्यांनी सभेत व्यक्त केले. ते म्हणाले, वेगळ्या विदर्भाचे आश्वासन देऊन विदर्भाच्या जनतेशी विश्वासघात करणे हे सत्तारुढ पक्षाला महागात पडेल, म्हणून वेगळ्या विदर्भ राज्याच्या प्रक्रियेला त्वरित सुरूवात करावी अन्यथा विदर्भ राज्य आंंदोलन समिती विदर्भ राज्याचे आंदोलन अजून तीव्र करेल. १८ मार्चला नागपूर येथे विदर्भस्तरीय विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून विदर्भ राज्य परिषद घेण्यात येत आहे. ३१ मार्चला दिल्ली येथे विशाल धरणे आंदोलन करण्यात येणार असून दिल्ली येथे पंतप्रधान नरेद्र मोदी व गृहमंत्र्यांना भेटून विदर्भ राज्य निर्मितीची आठवण करून देऊन राजधानीत स्वतंत्र विदर्भाचे बिगूल गाजविण्यात येणार आहे, असे राम नेवले यांनी सांगितले. डॉ.कृष्णकांत दुबे यांनी विदर्भाच्या निर्मितीसाठी बलिदानाची गरज पडत असल्यास माझे बलिदान मी प्रथमत: देण्यास तयार असल्याचे सांगितले. तर वेगळ्या विदर्भाची आवश्यकता का आहे, यावर अ‍ॅड. नंदा पराते, अरविंद देशमुख, दिलीप नरवडिया, अर्चना नंदघले, रमेश ढोमणे, गुरमित चावला, डी.आर. गिरीपुंजे, रफीक शेख, सुरेश धुर्वे, गजानन बारापात्रे, सुनिता बारापात्रे, राधेश्याम नागपुरे यांनीही मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रम राम नेवले यांच्या अध्यक्षतेखाली झाला. संचालन शामराव झरारिया यांनी केले. आभार पंडित तिवारी यांनी मानले. कार्यक्रमासाठी अनिल अंबुले, गौरव झरारिया, शामराव भोंडेकर, दुर्गेश कापसे, पंकज हटवार, पवन लांजेवार, पिंटू भगत, राजकुमार फटिंग, सहादेव आमकर यांनी तसेच कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)