शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह मदत मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:29 IST

बोंडगावदेवी : राज्यात सत्ता बदल झाला व राज्यातील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. त्यामुळे ...

बोंडगावदेवी : राज्यात सत्ता बदल झाला व राज्यातील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. त्यामुळे नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये कमालीचा रोष वाढला. राज्यातील लोकप्रतिनिधींनी शासनाकडे पाठपुरावा केला. वारंवार नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सुध्दा सहानुभूती करुन मदत द्या. यासाठी मुख्यमंत्र्यांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारापर्यंतची सानुग्रह मदत जाहीर केली. ती मदत शेतकऱ्यांपर्यंत अजूनपावेतो पोहचलीच नाही. शेतकऱ्यांना गाजर न दाखविता नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह मदत देण्यासाठी पुनर्विचार करावा अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष प्रमोद लांजेवार यांनी केली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना सानुग्रह मदत वाटप करण्याच्या प्रक्रियेदरम्यान त्याचवेळी राज्यात कोरोनाचा उद्रेक सुरु झाला. अर्थव्यवस्था डबघाईला आली म्हणून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मार्च २०२१ पर्यंत मदत केली जाईल अशी माहिती लोकप्रतिनिधींकडून देण्यात येत होती. नुकताच राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात आला असून २०२१ च्या अर्थसंकल्पात नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मदतीसंबंधी कोणतीही तरतूद करण्यात आली नसल्याने गाजर दाखविण्यात आल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत. सत्तेत आल्यानंतर जाहीर केल्याप्रमाणे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सानुग्रह मदत करण्यासाठी राज्यशासनाने पुनर्विचार करावा अशी मागणी लांजेवार यांनी केली आहे.