शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

खरीपाप्रमाणेच रब्बीला बोनस मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 23:38 IST

राज्य सरकारने खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला होता. सध्या रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत विक्रीस आला असून खरीपाप्रमाणेच रब्बीतील धानाला बोनस मिळणार का, असा संभ्रम शेतकºयांमध्ये निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देशेतकरी संभ्रमात : केंद्रावर धानाची आवक वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य सरकारने खरीप हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ५०० रुपये बोनस जाहीर केला होता. सध्या रब्बी हंगामातील धान बाजारपेठेत विक्रीस आला असून खरीपाप्रमाणेच रब्बीतील धानाला बोनस मिळणार का, असा संभ्रम शेतकºयांमध्ये निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्यात खरीपानंतर रब्बी धानाची सुध्दा जवळपास ३६ हजार हेक्टरवर लागवड केली जाते. सध्या रब्बीतील धानाची मळणी करुन तो विक्रीसाठी बाजारपेठेत येत आहे. बहुतेक शेतकरी हे शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभावाने धानाची विक्री करतात.यंदा सरकारने निवडणुकीच्या तोंडावर खरीपात धानाला ५०० रुपये प्रती क्विंटल बोनस जाहीर केला होता. मात्र हेच धोरण रब्बी हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लागू राहील. यासंदर्भातील कुठलेच स्पष्ट आदेश नाही. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सुध्दा यावर अद्याप मौन बाळगले आहे. त्यामुळे शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणारे शेतकरी बोनस मिळणार की नाही या संभ्रमात आहेत. सध्या निवडणुकीचे वारे वाहत असल्याने व पुढे विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याने शासन रब्बी हंगामातही धानपिकाला खरीप हंगामात जाहिर केलेला बोनस कायम ठेवील अशी आशा आहे.खरीप हंगामात जिल्ह्यात १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर तर रब्बी हंगामात ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात येते. मागील वर्षी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या समर्थन मुल्यानुसार धानपिकाला १७५० व १७७० अशा हमीभाव दिला. ५०० रुपये प्रती क्विंटल पकडल्यास २३५० प्रती क्विंटल दर शेतकऱ्यांना मिळतो. लगतच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश या राज्यात धानपिकाला सरसकट २५०० रुपये प्रती क्विंटल भाव देण्यात येत आहे. अशी मागणीही शेतकऱ्यांकडून केली जात आहे.प्रत्येक हंगामासाठी हमीभाव व बोनसचे स्वरुप वेगळे असते. खरीप हंगामात दरवर्षी शासनाच्यावतीने बोनस जाहीर करण्यात येते. मात्र, ते बोनस रब्बी हंगामातील धानपिकाला मिळत नाही. रब्बीतील धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाच्या काही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर धानाची आवक सुरू झाली असून बोनसचा तिढा मात्र कायम आहे.

टॅग्स :agricultureशेती