शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

यापुढे खपवून घेतले जाणार नाही ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:48 IST

गोंदिया : नगरसेविका रत्नमाला साहू यांचे पती ऋषिकांत साहू यांनी नगर परिषद अभियंता डॉली मदान यांना धमकावणी व त्यांच्या ...

गोंदिया : नगरसेविका रत्नमाला साहू यांचे पती ऋषिकांत साहू यांनी नगर परिषद अभियंता डॉली मदान यांना धमकावणी व त्यांच्या दालनातील खुर्च्यांची फेकाफेकी केल्याने नगर परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांत चांगलाच रोष व्याप्त होता. यालाच घेऊन मंगळवारी (दि. २) कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. मंगळवारी मुख्याधिकारी करण चव्हाण व नगराध्यक्ष अशोक इंगळे यांना निवेदन देण्यात आले. यात, मुख्याधिकारी चव्हाण यांनी समजूत घातल्यानंतर कर्मचाऱ्यांनी कामकाज सुरळीतपणे सुरू केले.

शहरातील रेलटोली परिसरातील रस्त्यावर पेविंग ब्लाॅक लावण्यासाठी कंत्राटदाराला कार्यादेश द्या अथवा काम करण्यास सांगा यावरून ऋषिकांत साहू यांनी नगर परिषद अभियंता डॉली मदान यांना सोमवारी (दि.१) धमकी दिली होती. एवढेच नव्हे तर त्यांच्या दालनातील खुर्च्यांची फेकाफेक केली होती. या प्रकरणी मदान यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. मात्र नगर परिषद अधिकारी-कर्मचारी चांगलेच नाराज असून त्यांनी या प्रकरणाचा निषेध नोंदवून मंगळवारी (दि.२) कामबंद आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार, मंगळवारी नगर परिषदेतील सर्व अधिकारी-कर्मचारी एकत्र आले व त्यांनी घडलेल्या प्रकाराला घेऊन मुख्याधिकारी चव्हाण तसेच नगराध्यक्ष इंगळे यांना प्रकरणी कारवाई करावी तसेच कामबंद आंदोलन करण्याबाबत निवेदन दिले. यात नगराध्यक्ष इंगळे यांनी, हा प्रकार उचित नसल्याचे सांगत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तर मुख्याधिकारी चव्हाण यांनी कामबंद आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांची कामे अडतात, त्यामुळे कामबंद आंदोलन न करण्याबाबत समजूत काढली. यानंतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन मागे घेतले.

--------------------------------

अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये संताप

साहू यांनी नगर परिषद अभियंता मदान यांच्यासोबत केलेल्या व्यवहारानंतर नगर परिषदेत कार्यरत अधिकारी-कर्मचारी चांगलेच संतापले आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीही नगर परिषदेत कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांशी पदाधिकारी व सदस्यांकडून असाच व्यवहार करण्यात आल्याचे प्रकार घडले आहे. मात्र नेहमीच काहीच कारवाई होत नसून नगर परिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत असे प्रकार घडतच आहेत. मात्र यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.