शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पोकळी भरण्यासाठी भाजपला खंबीर नेतृत्व लाभेल का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2016 00:24 IST

भाजपचे सालेकसा तालुक्यातील दिग्गज नेते राकेश शर्मा यांचे वयाच्या ६० व्या वर्षी आजारांमुळे अकाली निधन झाले.

विजय मानकर सालेकसा भाजपचे सालेकसा तालुक्यातील दिग्गज नेते राकेश शर्मा यांचे वयाच्या ६० व्या वर्षी आजारांमुळे अकाली निधन झाले. त्यांच्या निधनाने सालेकसा तालुक्यात भारतीय जनता पक्ष अनाथ झाल्याचे वाटत आहे. शर्मा यांच्या खंबीर नेतृत्वापुढे पक्षाचे नेते व कार्यकर्ते नतमस्तक होत होते. तसेच विरोधी पक्षाचे नेतेसुद्धा सलाम ठोकत होते. कारण राकेश शर्मा यांची नेतृत्वशैली सर्वांना प्रभावित करणारी होती. लोकशाही पद्धतीने राजकारण करीत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटविला होता. त्यांची कर्मठता, पक्षनिष्ठपणा व माणसे जोडण्याची शैली एवढी जबरदस्त राहिली की सामान्य माणसापासून शीर्ष नेतृत्वापर्यंत शर्मा यांचे कायमचे प्रतिबिंब उमटले आहे. अशात आता सालेकसा तालुक्यात भाजपला सांभाळणारे खंबीर नेतृत्व सहज मिळणे कठीण आहे. एकीकडे भाजप या संकटातून सावरण्यासाठी सर्व पर्यायांवर विचारमंथन करीत आहे, तर दुसरीकडे इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाजपला दमदार पर्याय देवून आपला पक्ष मजबूत होईल आणि आपले नेतृत्व तालुक्यात दिसून येईल असे स्वप्न पडू लागले आहे. तसे होणे स्वाभाविक आहे. राजकारणात कोण केव्हा कोणाच्या समोर येईल हे सांगता येत नाही. काही लोक आता हे ही समजून बसले आहेत की भाजप आता कमजोर होऊ शकते आणि आपल्या पक्षाची स्थिती भक्कम होऊ शकते. स्वप्न बघा, मोठे व्हा, आपल्या राजकारणाचा प्रभाव जनमानसावर पडू द्या, परंतु एक गोष्ट लक्षात असू द्या, की कधी एखाद्या चांगल्या नेतृत्वामुळे पक्षाला बळकटी मिळत असते. परंतु नेतृत्व देण्यासाठी पक्ष सुद्धा महत्वाचा घटक असतो. पक्षाने संधी दिली तर सामान्य नेताही खास बनू शकतो. आजघडीला भारतीय जनता पक्ष देशाचा सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाला प्रखर विचारधारा लाभलेली आहे. त्यामुळे भाजपच्या विचारसरणीचा अंगीकार करणाऱ्या जनसामान्य लोकांची मोठी फळी आहे. म्हणून भाजप कमजोर होईल असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणारे वाटत आहे. लोकशाही शासन पद्धतीमध्ये कोणताही पक्ष चिरकाळ सत्तेवर टिकून राहत नाही. परंतु त्याचबरोबर पक्ष पराभूत झाला म्हणजे पक्ष संपला असे समजून चालणेही मुर्खपणा ठरू शकते. या तालुक्यात सतत भाजप आणि काँग्रेस हे दोनच पक्ष एकमेकाला पर्याय देऊ शकले आहेत. यामध्ये तालुक्यातील दोन परिवाराची ऐतिहासिक भूमिका राहीली आहे. भाजप हा वशिष्ठ परिवाराच्या घरी तर काँग्रेस पक्ष बहेकार परिवारात केंद्रीत राहीला. वशिष्ठ कुटुंबातून तिघांना पं.स. सभापतीपद भूषविण्याची संधी मिळाली तर बहेकार कुटुंबातून दोन आमदार घडले. काही काळ मंत्रीपदही लाभले. सालेकसा पंचायत समितीवर दोन अडीच दशकापर्यंत वशिष्ठ परिवाराचाच कब्जा राहीला आहे. या कुटुंबाची सामान्य लोकांपासून वरिष्ठस्तरापर्यंत मजबूत पकड राहीली. १९९२ मध्ये भाजप पं.स. वर पुन्हा सत्तेवर आली आणि राकेश शर्मा (वशिष्ठ) हे पाच वर्षासाठी सभापती बनले होते. बारकुजी दमाहे वरिष्ठ असूनही त्यांना उपसभापतीपदावर समाधान मानावे लागले होते. दरम्यान १९९५ मध्ये राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार आले. महादेवराव शिवणकर मंत्री बनले. त्यामुळे या क्षेत्रातील सामान्य नेत्याचीही कॉलर टाईट झाली. यात राकेश शर्मा यांचे वजन वाढले. त्यांची मुंबईवारी वाढली. परंतु या दरम्यान शर्मा यांचा सामान्य लोकांशी व मतदारांशी काहीसा संपर्क कमी झाला. त्यामुळे सभापती म्हणून लोकांना ते फारच कमी भेटत होते. याचा दुष्प्रचार खूप झाला आणि १९९६ ला भाजप चारही मुंड्या चित झाली होती. काँग्रेसने संधीचा पुरेपूर लाभ घेत जि.प., पं.स.च्या सर्वच जागा आपल्या खिशात टाकल्या होत्या. हा भाजपसाठी मोठा धडा शिकण्यासारखा परिणाम होता. पण परिणामाने खचून न जाता राकेश शर्मा यांनी पुन्हा पक्षासाठी परिश्रम घेतले. रात्री-बेरात्री लोकांच्या मदतीला धावून जाणे, कोणत्याही कामासाठी कोणत्याही विभागात संपर्क करणे यामुळे त्यांचा जनसंपर्क वाढला. अधिकारी-कर्मचारी यांच्याशी समन्वय साधण्यात यश येऊ लागले होते. याचा फायदा थेट भाजपला मिळत राहीला. २००० मध्ये नवनिर्मित गोंदिया जिल्ह्यात पहिली निवडणूक झाली. यात सालेकसा पं.स.वर पुन्हा भाजपचा कब्जा झाला. शर्मा यांचा प्रभाव वाढला. त्यांना नंतर जिल्हाध्यक्षपद सुद्धा लाभले. मागील १५ वर्षात यश-अपयश वाट्याला आले. परंतु शर्मा यांच्या नेतृत्वात भाजप भक्कम स्थितीत राहिली. त्यांंनी किंगमेकरची भूमिका पार पाडली. आज ते हयात नाहीत. पण त्यांची प्रेरणा घेवून काम केल्यास भाजपवर फारसा परिणाम होणार नाही. शर्मा यांनी तालुक्यात वाढविलेला पसारा टिकवून ठेवणे यासाठी भाजपला मेहनत मात्र घ्यावी लागणार आहे. त्यासाठी तालुक्यात भाजपला एका खंबीर नेतृत्वाची मात्र गरज आहे.