शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
4
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
5
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
6
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
7
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
8
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
9
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
10
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
11
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
12
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
13
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
14
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
15
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
16
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
17
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
18
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
19
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी

वसतिगृह व निवासी शाळा झाल्या ‘वायफाय’

By admin | Updated: August 31, 2016 00:10 IST

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना जगाचे ज्ञान सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी विशेष समाजकल्याण

समाजकल्याण विभागाचा पुढाकार : इंग्रजी बळकटीकरणावर दिला जातोय भर गोंदिया : अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना जगाचे ज्ञान सहजपणे उपलब्ध व्हावे यासाठी विशेष समाजकल्याण विभागाने जिल्ह्यातील चारही वसतिगृह व दोन निवासी शाळांना ‘वायफाय’ कनेक्टीव्हीटी दिली आहे. त्यामुळे तेथील विद्यार्थ्यांना स्वत:जवळील पैसे खर्च न करता आॅनलाईन कामे करण्याची संधी प्राप्त झाली आहे. जिल्ह्यात समाजकल्याण विभागाकडून चालविली जाणारे चार वसतिगृह आणि तीन निवासी शाळा आहेत. गोंदियात मुलींचे व मुलांचे वसतिगृह, तिरोड्यात मुलींचे वसतिगृह, अर्जुनी-मोरगाव येथे मुलांचे वसतिगृह आहेत. त्यांच्यासह डव्वा येथील निवासी मुलींची शाळा, नंगपूरा मुर्री येथील मुलांची शाळा वायफाय करण्यात आली. सरांडी येथील मुलींची निवासी शाळा वायफाय करण्याची प्रक्रिया सुरु आहे. विद्यार्थी मागास राहू नयेत, त्यांना वर्तमान स्थितीबद्दलचे ज्ञान मिळवता यावे यासाठी शब्दकोष व अवांतर वाचनासाठी ९ प्रकारच्या पुस्तिका पुरविण्याच्या सूचना सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिल्यामुळे त्या पुस्तिका विद्यार्थ्यांना पुरविण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व निर्माण करण्यासाठी त्यांना विशेष पुस्तके पुरविण्यात आली आहेत. प्रत्येक निवासी शाळेत संगणक लॅब तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून नवीन गोष्टी सहजरित्या मिळवू शकतात यासाठी सेवा देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी) ६४१ विद्यार्थ्यांना लाभ ४वसतिगृह व निवासी शाळांमध्ये वायफायची सोय करण्यात आल्यामुळे जिल्ह्यातील ४ वसतिगृह व ३ निवासी शाळांमधील ६४१ विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे. गोंदियातील मुलांच्या वसतिगृहात ७५, गोंदियात मुलींच्या वसतिगृहात ८०, तिरोडा येथे ६०, अर्जुनी-मोरगाव ६०, डव्वा येथे १४३, सरांडी येथे ८० तर नंगपुरा मुर्री येथे १४३ विद्यार्थी या वायफायचा लाभ घेऊ शकतात. पाणी शुद्धीकरण यंत्र ४स्वच्छ पाण्याअभावी विद्यार्थी आजारी पडत होते. त्यामुळे अनेकदा सामाजिक न्याय विभागाची प्रतिमा मलीन व्हायची. परंतु आता निवासी शाळा किंवा वसतिगृहातील विद्यार्थी आजारी पडू नये यासाठी २५ हजार रुपये प्रत्येक ठिकाणी खर्च करुन वॉटर प्युरिफायर (आरो) बसविण्यात आले आहेत. निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना यापुर्वी सामाजिक न्याय विभागाकडून विशेष गणवेश दिला जात नव्हता. परंतु यंदापासून विद्यार्थ्यांना ड्रेस देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या सोयी देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. - मंगेश वानखेडे सहायक आयुक्त, विशेष समाजकल्याण विभाग, गोंदिया