शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
4
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
5
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
6
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
7
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
8
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
9
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
10
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
11
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
12
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
13
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
14
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
15
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
16
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
17
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
18
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
19
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी

कंपन्यांचे पोट भरण्यासाठी पीक विमा काढायचा का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:26 IST

गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र, यानंतरही ...

गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात पूर परिस्थिती निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र, यानंतरही पीक विमाधारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. परिणामी, यंदा पीक विमा काढण्यासाठी मुदतवाढ देऊनसुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याकडे पाठ फिरविली आहे. मागील वर्षी ५६६४० शेतकऱ्यांनी पीक काढला होता तर यंदा केवळ १२०६८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. त्यामुळे पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या निम्म्यावर आली असून केवळ विमा कंपन्यांचे पोट भरण्यासाठी पीक विमा काढायचा का? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला आहे.

.........

यंदा केवळ २१.३० टक्के पीक विमा

- मागील वर्षी अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे नुकसान होऊनदेखील पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना परतावा मिळाला नाही. त्यामुळे यंदा केवळ २१.३० टक्के म्हणजे १२०६८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला.

- पीक विमा कंपन्यांकडून नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण केले जात नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित राहतो.

- इतर पिकांच्या तुलनेत धान पिकाच्या नुकसान भरपाईसाठी वेगळे निकष लावले जात आहेत. त्यामुळे परतावा मिळण्यास अडचण होत आहे.

........

कोट

गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे क्षेत्र आहे. तर धान पिकाच्या नुकसानीसाठी विमा कंपन्याकडून वेगळे निकष लावले जात आहेत. त्यामुळे शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यास वंचित राहत आहेत. त्यामुळेच यंदा विमा कंपन्यांना नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत.

- गणेश घोरपडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

......

जिल्ह्यातील एकूण शेतकरी : २ लाख ७२ हजार,

मागील वर्षी पीक विमा काढलेले शेतकरी : ५६६४०

यावर्षी पीक विमा काढलेले शेतकरी : १२०६८

एकूण खरीप क्षेत्र : २ लाख १० हजार २४२

......................................

तालुकानिहाय पीक विमा काढणारे शेतकरी

आमगाव : ६३३

अर्जुनी मोरगाव : ६३३

देवरी : ९३१

गोंदिया :१५६३

गोरेगाव : १४३७

सडक अर्जुनी : २८२१

सालेकसा : ७४८

तिरोडा : ३२७२

..............................

पीकनिहाय लागवड क्षेत्र

धान : १ लाख ८१ हजार हेक्टर

तूर : ४ हजार हेक्टर

ऊस : १५ हजार हेक्टर

इतर पिके : १० हजार हेक्टर

.................

यामुळेच फिरविली पाठ

जिल्ह्यात एकूण २ लाख ७२ हजार खातेधारक शेतकरी आहेत. यापैकी मागील वर्षी ५६६४० शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. विमा हप्त्यापोटी शेतकरी, राज्य आणि केंद्र सरकार यांनी एकूण १६ कोटी रुपये भरले होते. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात पूरपरिस्थिती निर्माण हाेऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र, विमा कंपनीने केवळ ४३३३ शेतकऱ्यांना मदतीसाठी पात्र ठरवीत २ कोटी रुपये नुकसान भरपाई दिली. नुकसान हाेऊनदेखील लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्याकडे पाठ फिरविली आहे.

............

मागील वर्षीचा अनुभव वाईट

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्याचा परतावा मिळावा यासाठी पीक विमा काढला होता. मात्र, मागील वर्षी नुकसान होऊनसुद्धा परतावा मिळाला नाही. त्यामुळे यंदा पीक विमा काढलाच नाही.

- रामदास बोरकर, शेतकरी, नवेगावबांध

............

पीक विमा कंपन्याकडून दरवर्षी शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. मागील वर्षी पूर आणि अतिवृष्टी हाेऊनसुद्धा विमा कंपन्यांनी नुकसान भरपाई दिली नाही. त्यामुळे आता पीक विमा न काढण्याचा निर्णय घेतला आहे.

- देवीदास जमाईवार, शेतकरी

.........