शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अन्नदात्याची एवढी चेष्टा कशाला करता साहेब?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:30 IST

सालेकसा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान कापणी सुरू होण्याआधीच शासनाकडून रब्बी पिकाच्या धानाची हमीभावात विक्री करण्यासाठी सातबारा ऑनलाइन झाल्याची ...

सालेकसा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील धान कापणी सुरू होण्याआधीच शासनाकडून रब्बी पिकाच्या धानाची हमीभावात विक्री करण्यासाठी सातबारा ऑनलाइन झाल्याची प्रक्रिया करण्यात आली आणि तेवढ्याच घाईने ती बंद करण्यात आली. याबाबत दिवसभर शेतात राबणारा शेतकरी अंधारात ठेवला गेला. विहित मुदतीत काही दलाल व्यापाऱ्यांनी आपल्या जवळच्या मोजक्या शेतकऱ्यांचे सातबारा ऑनलाइन करून घेतले. धान उत्पादक शेतकरी हा खरा अन्नदाता असून, त्याची एवढी थट्टा कशाला करता साहेब, अशी आर्त हाक शेतकरी देत आहेत.

देशात सर्वत्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव असून, यादरम्यान राज्य शासनाने राज्यात कडक निर्बंध घातले आहेत. जवळपास सर्वच ठिकाणी कामकाज बंद आहे. लॉकडाऊन काळात केंद्र शासनाकडून गरिबांना दोन महिन्यांचे मोफत धान्य पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या भरवशावर शासनाने हा निर्णय घेतला त्याच शेतकऱ्यांची अवस्था सध्या बिकट आहे. रब्बी हंगामात साधारणत: जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात धानाची पेरणी आणि रोवणी केली गेली. थंडीच्या वेळी गार पाण्यात व चिखलात आपल्याला व आपल्या कुटुंबाला खपवून सतत परिश्रम करून पिकाची लागवड बळीराजाने केली. त्यानंतर रात्री-बेरात्री शेतात जाऊन सतत पिकांना पाणीपुरवठा करण्याचे काम आपली तहान,भूक विसरून केली. त्या रब्बी पिकाची कापणी आता मे महिन्यात होऊ लागली आहे. मोठ्या मेहनतीने पिकविलेल्या धान पिकांना योग्य भाव मिळावा म्हणून शेतकरी धान खरेदी केंद्रावर धान घेत आहे. परंतु सातबारा ऑनलाइन प्रक्रिया ३० एप्रिललाच बंद झाली आहे. त्यामुळे गरजेपोटी अल्पदराने धान विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

कोट

शासनाने धान खरेदी केंद्र सुरू करून थेट खरेदी केंद्रावर धान पीक आणि सातबारा स्वीकारावा, ज्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळेल. तसेच खात्यावर रक्कमसुद्धा लवकर देण्याची व्यवस्था करावी.

-देवरम चुटे, युवा शेतकरी, साखरीटोला