शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

जोर का झटका देत ८ बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST

गोंदिया : मागील आठवडाभरापासून ४-५ बाधितांनी भर पडत असल्याने कोरोना आता परतीच्या वाटेवर असल्याचे वाटत होते. मात्र, बुधवारी (दि. ...

गोंदिया : मागील आठवडाभरापासून ४-५ बाधितांनी भर पडत असल्याने कोरोना आता परतीच्या वाटेवर असल्याचे वाटत होते. मात्र, बुधवारी (दि. ३०) जिल्ह्यात थेट ८ बाधितांची भर पडल्याने कोरोनाने अद्याप जिल्हा सोडला नसल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला पूर्णपणे निरोप देण्यासाठी गाफील न राहता नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाची दुसरी अवघ्या देशासह जिल्ह्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे. कित्येकांचा जीव घेतल्यानंतर आता कोरोना रुग्ण कमी झाल्याने शासनाने निर्बंध शिथिल करून देत जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढत अगदी बेभानपणे रस्त्यावर उतरून पुन्हा आपला मनमानीपणा सुरू केला आहे. आजघडीला शहरातील व त्यातही बाजारातील गर्दी बघता नागरिकांना एप्रिल व मे महिन्यातील कोरोना कहराचा विसर पडल्याचे दिसते. त्यामुळेच नियमांना बगल देत नागरिकांची बेभान वागणूक सुरू झाली आहे. कोरोनाची लाट आता ओसरू लागल्याने जिल्ह्यातही बाधितांची संख्या नियंत्रणात आली व दररोज ४-५ बाधितांची नोंद घेतली जात होती. मात्र, आठवडाभरात बुधवारी (दि.३०) थेट ८ बाधितांनी नोंद घेण्यात आल्याने संख्या पुन्हा वाढू लागल्याचे दिसले. यामुळे कोरोना पूर्णपणे गेला नसून नागरिकांचा गाफिलपणा अनर्थ करण्यास कारणीभूत ठरणार यात शंका नाही. त्यामुळे नागरिकांनी आता आणखी सावधपणाने वागण्याची गरज असून असे केले तरच जिल्ह्यातून कोरोना पूर्णपणे हद्दपार होणार व त्याचा प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही.

--------------------------------

मंगळवारी एका मृत्यूची नोंद

एप्रिल व मे महिन्यात आलेल्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने सुमारे ४००-४५० नागरिकांचा जीव घेतला. परिणामी जिल्ह्यातील मृतांची संख्या ७०० एवढी झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ५७३ मृत्युसंख्या सांगितली जात असली तरी ही संख्याही कमी नाही. त्यात मंगळवारी (दि.२९) आणखी एका बाधिताच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गोंदिया शहर कोरोना हॉटस्पॉट असल्याने शहरवासीयांनी आणखीच सावधानी बाळगण्याची गरज आहे.

--------------------------------

कठोर निर्बंधातून धोक्याची सूचना

दुसरी लाट ओसरत असल्याचे बघून राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले होते. मात्र, आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ या नव्या रूपाने गोंधळ घातला आहे. त्यामुळे राज्यातच पुन्हा एकदा निर्बंध कठोर केले जात आहेत. म्हणजेच, या कठोरतेतून शासनाने धोक्याची सूचना दिली आहे. हे आता नागरिकांनी समजून घेण्याची गरज असून नियमांचे पालन व लसीकरण यावरच भर देण्याची खरी गरज आहे.