शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

जोर का झटका देत ८ बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST

गोंदिया : मागील आठवडाभरापासून ४-५ बाधितांनी भर पडत असल्याने कोरोना आता परतीच्या वाटेवर असल्याचे वाटत होते. मात्र, बुधवारी (दि. ...

गोंदिया : मागील आठवडाभरापासून ४-५ बाधितांनी भर पडत असल्याने कोरोना आता परतीच्या वाटेवर असल्याचे वाटत होते. मात्र, बुधवारी (दि. ३०) जिल्ह्यात थेट ८ बाधितांची भर पडल्याने कोरोनाने अद्याप जिल्हा सोडला नसल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला पूर्णपणे निरोप देण्यासाठी गाफील न राहता नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाची दुसरी अवघ्या देशासह जिल्ह्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे. कित्येकांचा जीव घेतल्यानंतर आता कोरोना रुग्ण कमी झाल्याने शासनाने निर्बंध शिथिल करून देत जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढत अगदी बेभानपणे रस्त्यावर उतरून पुन्हा आपला मनमानीपणा सुरू केला आहे. आजघडीला शहरातील व त्यातही बाजारातील गर्दी बघता नागरिकांना एप्रिल व मे महिन्यातील कोरोना कहराचा विसर पडल्याचे दिसते. त्यामुळेच नियमांना बगल देत नागरिकांची बेभान वागणूक सुरू झाली आहे. कोरोनाची लाट आता ओसरू लागल्याने जिल्ह्यातही बाधितांची संख्या नियंत्रणात आली व दररोज ४-५ बाधितांची नोंद घेतली जात होती. मात्र, आठवडाभरात बुधवारी (दि.३०) थेट ८ बाधितांनी नोंद घेण्यात आल्याने संख्या पुन्हा वाढू लागल्याचे दिसले. यामुळे कोरोना पूर्णपणे गेला नसून नागरिकांचा गाफिलपणा अनर्थ करण्यास कारणीभूत ठरणार यात शंका नाही. त्यामुळे नागरिकांनी आता आणखी सावधपणाने वागण्याची गरज असून असे केले तरच जिल्ह्यातून कोरोना पूर्णपणे हद्दपार होणार व त्याचा प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही.

--------------------------------

मंगळवारी एका मृत्यूची नोंद

एप्रिल व मे महिन्यात आलेल्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने सुमारे ४००-४५० नागरिकांचा जीव घेतला. परिणामी जिल्ह्यातील मृतांची संख्या ७०० एवढी झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ५७३ मृत्युसंख्या सांगितली जात असली तरी ही संख्याही कमी नाही. त्यात मंगळवारी (दि.२९) आणखी एका बाधिताच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गोंदिया शहर कोरोना हॉटस्पॉट असल्याने शहरवासीयांनी आणखीच सावधानी बाळगण्याची गरज आहे.

--------------------------------

कठोर निर्बंधातून धोक्याची सूचना

दुसरी लाट ओसरत असल्याचे बघून राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले होते. मात्र, आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ या नव्या रूपाने गोंधळ घातला आहे. त्यामुळे राज्यातच पुन्हा एकदा निर्बंध कठोर केले जात आहेत. म्हणजेच, या कठोरतेतून शासनाने धोक्याची सूचना दिली आहे. हे आता नागरिकांनी समजून घेण्याची गरज असून नियमांचे पालन व लसीकरण यावरच भर देण्याची खरी गरज आहे.