शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
3
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
4
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
6
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
7
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
8
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
9
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
10
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
11
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
12
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
13
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
14
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
15
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
16
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
17
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
18
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
19
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार

जोर का झटका देत ८ बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:21 IST

गोंदिया : मागील आठवडाभरापासून ४-५ बाधितांनी भर पडत असल्याने कोरोना आता परतीच्या वाटेवर असल्याचे वाटत होते. मात्र, बुधवारी (दि. ...

गोंदिया : मागील आठवडाभरापासून ४-५ बाधितांनी भर पडत असल्याने कोरोना आता परतीच्या वाटेवर असल्याचे वाटत होते. मात्र, बुधवारी (दि. ३०) जिल्ह्यात थेट ८ बाधितांची भर पडल्याने कोरोनाने अद्याप जिल्हा सोडला नसल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला पूर्णपणे निरोप देण्यासाठी गाफील न राहता नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाची दुसरी अवघ्या देशासह जिल्ह्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे. कित्येकांचा जीव घेतल्यानंतर आता कोरोना रुग्ण कमी झाल्याने शासनाने निर्बंध शिथिल करून देत जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढत अगदी बेभानपणे रस्त्यावर उतरून पुन्हा आपला मनमानीपणा सुरू केला आहे. आजघडीला शहरातील व त्यातही बाजारातील गर्दी बघता नागरिकांना एप्रिल व मे महिन्यातील कोरोना कहराचा विसर पडल्याचे दिसते. त्यामुळेच नियमांना बगल देत नागरिकांची बेभान वागणूक सुरू झाली आहे. कोरोनाची लाट आता ओसरू लागल्याने जिल्ह्यातही बाधितांची संख्या नियंत्रणात आली व दररोज ४-५ बाधितांची नोंद घेतली जात होती. मात्र, आठवडाभरात बुधवारी (दि.३०) थेट ८ बाधितांनी नोंद घेण्यात आल्याने संख्या पुन्हा वाढू लागल्याचे दिसले. यामुळे कोरोना पूर्णपणे गेला नसून नागरिकांचा गाफिलपणा अनर्थ करण्यास कारणीभूत ठरणार यात शंका नाही. त्यामुळे नागरिकांनी आता आणखी सावधपणाने वागण्याची गरज असून असे केले तरच जिल्ह्यातून कोरोना पूर्णपणे हद्दपार होणार व त्याचा प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही.

--------------------------------

मंगळवारी एका मृत्यूची नोंद

एप्रिल व मे महिन्यात आलेल्या दुसऱ्या लाटेत कोरोनाने सुमारे ४००-४५० नागरिकांचा जीव घेतला. परिणामी जिल्ह्यातील मृतांची संख्या ७०० एवढी झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ५७३ मृत्युसंख्या सांगितली जात असली तरी ही संख्याही कमी नाही. त्यात मंगळवारी (दि.२९) आणखी एका बाधिताच्या मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गोंदिया शहर कोरोना हॉटस्पॉट असल्याने शहरवासीयांनी आणखीच सावधानी बाळगण्याची गरज आहे.

--------------------------------

कठोर निर्बंधातून धोक्याची सूचना

दुसरी लाट ओसरत असल्याचे बघून राज्य शासनाने निर्बंध शिथिल केले होते. मात्र, आता कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ या नव्या रूपाने गोंधळ घातला आहे. त्यामुळे राज्यातच पुन्हा एकदा निर्बंध कठोर केले जात आहेत. म्हणजेच, या कठोरतेतून शासनाने धोक्याची सूचना दिली आहे. हे आता नागरिकांनी समजून घेण्याची गरज असून नियमांचे पालन व लसीकरण यावरच भर देण्याची खरी गरज आहे.