शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

शेतकऱ्यांच्या समस्यांची कोण घेणार दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:33 IST

मुंडीकोटा : निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. महागाई, मजुराचा खर्च, रासायनिक खते, ट्रॅक्टर यांचे ...

मुंडीकोटा : निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. महागाई, मजुराचा खर्च, रासायनिक खते, ट्रॅक्टर यांचे दर यावर्षी गगनाला भिडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडत नाहीत, खर्च जास्त उत्पन्न कमी, अशी गंभीर परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.

शेतकरी रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतीची मशागत करीत असतो. त्यावर तो आपला वर्षभराचा उदरनिर्वाह करीत असतो. शेतकऱ्यांच्या धान पिकाला हमीभाव मिळावा यासाठी जिल्ह्यात शासनाच्यावतीने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या आधारभूत हमीभाव धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. मागील वर्षीचा विचार केल्यास खरीप हंगामातील धान पिकांचे बोनस फक्त ५० टक्के मिळाले आहे. पण अर्धा बोनस पत्ताच नाहीत, शेतकरी चातकासारखी बोनसची प्रतीक्षा करीत आहेत. बोनस खात्यावर जमा झाले किंवा नाही या करीता दररोज बँकेच्या चकरा मारीत असून आल्या पावलीच परत जात आहे. मुंडीकोटा येथे विविध सेवा सहकारी संस्था मुंडीकोटा यांना २०२०-२१ ला खरीप धानाची खरेदी करण्याकरिता आदेश दिले होते. त्यामुळे त्यांनी धान खरेदीला सुरुवात केली. मात्र अद्यापही खरीप आणि रब्बी हंगामातील धानाची उचल करण्यात आली नाही. त्यामुळे गोदामांमध्ये धान तसाच पडून आहे. शेतकऱ्यांच्या समस्येकडे शासनाने लक्ष देऊन बोनस आणि थकीत चुकाऱ्याची रक्कम त्वरित देण्याची मागणी केली आहे.