शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
4
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
5
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
6
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
7
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
8
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
9
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
10
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
11
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
12
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
13
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
14
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
15
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
16
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
17
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
18
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
19
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
20
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

राष्ट्रीय उद्यानाच्या संजयकुटीत वाळवीचे साम्राज्य,लक्ष देणार कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 05:00 IST

सुरुवातीच्या काळात संजयकुटी ही इमारत संपूर्णतः लाकडी होती. ही इमारत एकांतवासात असल्याने पर्यटक येथे आकर्षणापोटी आवर्जून हजेरी लावतात. काही वर्षांपूर्वी या इमारतीला अशीच वाळवी लागली होती. तेव्हा ज्या लाकडांवर ही वास्तू उभी होती ते मोठे लाकडी खांब काढून त्याऐवजी सिमेंटचे खांब उभारण्यात आले होते. या खांबांच्या खालच्या भागापासून तर अगदी टोकापर्यंत वाळवीचे थर दिसून येत आहेत. सिमेंटच्या खांबांवर लाकडी व बांबूने तयार केलेली वास्तू आहे.

संतोष बुकावन लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : नवेगावबांध राष्ट्रीय उद्यानात असलेल्या संजयकुटीत वाळवीचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी वर्ग दोन पासून तर वर्ग चारचे अनेक कर्मचारी नियुक्त आहेत. यांच्यावर शासनाचे दरमहा लाखों रुपये खर्च होतात. मात्र त्यांच्या निष्क्रियतेमुळे राष्ट्रीय उद्यानातील वास्तूला धोका निर्माण झाला आहे.         राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्गरम्य परिसरात संजयकुटी नामक वास्तू आहे. ही इमारत व सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटक नौकाविहार अथवा स्वतःच्या साधनाने तिथे जातात. या इमारतीचे लोकार्पण तत्कालीन वन, स्वास्थ व पाटबंधारे राज्यमंत्री सतीश चतुर्वेदी तसेच महसूल, पुनर्वसन व राजशिष्टाचार मंत्री अजहर हुसेन यांचे हस्ते २१ डिसेंबर १९८१ रोजी झाले होते.  सुरुवातीच्या काळात संजयकुटी ही इमारत संपूर्णतः लाकडी होती. ही इमारत एकांतवासात असल्याने पर्यटक येथे आकर्षणापोटी आवर्जून हजेरी लावतात. काही वर्षांपूर्वी या इमारतीला अशीच वाळवी लागली होती. तेव्हा ज्या लाकडांवर ही वास्तू उभी होती ते मोठे लाकडी खांब काढून त्याऐवजी सिमेंटचे खांब उभारण्यात आले होते. या खांबांच्या खालच्या भागापासून तर अगदी टोकापर्यंत वाळवीचे थर दिसून येत आहेत. सिमेंटच्या खांबांवर लाकडी व बांबूने तयार केलेली वास्तू आहे. ही वाळवी बहुधा लाकडांवर अधिक दिसून येते. त्यामुळे सिमेंटच्या टोकावरून लाकूड अथवा बांबूपर्यंत पोहोचणे अगदी शक्य आहे. यामुळे ही वास्तू वाळवीने पोखरून धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.            राष्ट्रीय उद्यान व येथे उपलब्ध असलेल्या प्रत्येक बाबींच्या संरक्षणासाठी वनविभागाचे कर्मचारी नियुक्त आहेत. त्या कर्मचाऱ्यांचे याकडे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे कर्मचारी केवळ स्वतःचे उदरभरण करण्याच्या उद्देशाने वेतनासाठीच नियुक्त आहेत का ? असा प्रश्न पर्यटक विचारत आहेत.

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्यforest departmentवनविभाग