शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

चाबी कुणाचे कुलूप लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्हा परिषदेत मागील पाच वर्षे काँग्रेस-भाजप अभद्र युतीची सत्ता होती. या युतीवरून अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले तरी ती पाच वर्षे सुरळीतपणे कायम होते; पण यावेळेचे चित्र वेगळे आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडीची सत्ता आहे, तर या तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढविली. यंदाच्या निवडणुकीचे चित्र निश्चितच वेगळे राहणार आहे.

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ओबीसी प्रवर्गाच्या एकूण ३० जागा वगळून जि.प.च्या ४३ आणि पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक  पार पडली. या निवडणुकीत प्रथमच गोंदिया विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार यांच्या चाबी संघटनेने जि.प.च्या १४, तर पंचायत  समितीच्या सर्वच जागा लढविल्या होत्या. गोंदिया तालुक्यात चौरंगी लढत झाल्याने आणि या तालुक्यात जो बाजी मारेल त्याला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे चाबी कुणाचे कुलूप लावणार हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चाबीच्या कुलूप लावण्यावरच फुलांची उधळण आणि घड्याळाची टिकटिक वाजण्याचे समीकरण बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत मागील पाच वर्षे काँग्रेस-भाजप अभद्र युतीची सत्ता होती. या युतीवरून अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले तरी ती पाच वर्षे सुरळीतपणे कायम होते; पण यावेळेचे चित्र वेगळे आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडीची सत्ता आहे, तर या तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढविली. यंदाच्या निवडणुकीचे चित्र निश्चितच वेगळे राहणार आहे. जिल्हा परिषद ४३ आणि पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी जागा सर्वसाधारण करून त्यासाठी १८ जानेवारीला निवडणूक होत आहेत. यात  जिल्हा  परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० जागांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेवर कोणत्या पक्षाचा झेंडा हे ठरविण्यात या १० जागा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या दहा जागांच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. २१ तारखेला पार पडलेल्या १२९ जागांच्या निवडणुकीसाठी पार पडलेल्या निवडणुकीत बहुतेक सर्वच ठिकाणी त्रिशंकू लढती झाल्या. त्यामुळे कुठे हात सोबत तर कुठे घड्याळाची टिकटिक, तर काही ठिकाणी फुलांची उधळ होणे निश्चित आहे. या निवडणुकीत ७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने याचा विजयाचा समीकरणावर निश्चित परिणाम होणार आहे. मात्र,  गोंदिया तालुक्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि चाबी असा चौरंगी सामना झाला. त्यामुळे चाबी ज्यांचे कुलूप लावील त्याचा तेवढाचा फायदा फूल उमलण्यास आणि घडीची टिकटिक वाजण्यास होणार आहे. त्यामुळे याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जिल्हा परिषदेत कोण होणार प्लस आणि मायनस- मागील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २० जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर काँग्रेस १६ आणि भाजपने १७ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन जिल्हा परिषदेत सहज सत्ता स्थापन करू शकले असते. पण स्थानिक बंगाल आणि गल्लीचे राजकारण यात आडवे आल्याने काँग्रेसने कमळ हातात घेत अभद्र युती करीत सत्ता स्थापन केली होती. पण यंदाचे समीकरण वेगळे आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत कोण मायनस आणि कोण प्लस होतो याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. १० जागांवर बरेच समीकरण अवलंबून - ओबीसी प्रवर्गाच्या सर्वसाधारण करण्यात आल्या आहेत. यात जिल्हा परिषदेच्या केशोरी, इटखेडा, माहुरकुडा, महागाव, बोंडगावदेवी, पांढरी, ठाणा, घाटटेमणी, किकरीपार, निंबा जागांचा समावेश आहे. जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने या दहा जागा फारच महत्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे या दहा जागांकडे सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. 

कोण किती पाण्यात कळणार १९ ला - जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ आणि पंचायत समितीच्या १०६ जागांची एकत्रित मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे निकालानंतरच कोण किती पाण्यात हे स्पष्ट होणार आहे. नेत्यांनी मांडले पक्षश्रेष्ठींसमोर अंकगणित - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या १२९ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक पार पडली. यात ७० टक्के मतदान झाले. यानंतर प्रत्येक पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार कोणत्या क्षेत्रात प्लस आणि मायनस राहू शकतो याची आकडेमोड करुन अंक गणित सादर केल्याची माहिती आहे.  

सर्वच म्हणतात आम्हीच सरस, मतदार म्हणतात आमच्याकडे गुपित 

- स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जिल्हा परिषदेची निवडणूक ही महत्त्वपूर्ण मानली जाते आहे. २१ डिसेंबरला निवडणूक पार पडल्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आम्हीच सरस असल्याचा दावा केला. पण कोण सरस याचे गुपित मतदारांनाच माहिती असल्याने ते काय निर्णय देतात हे १९ जानेवारीला मतपेट्यांचा पिटारा उघडल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद