शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

चाबी कुणाचे कुलूप लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2021 05:00 IST

गोंदिया जिल्हा परिषदेत मागील पाच वर्षे काँग्रेस-भाजप अभद्र युतीची सत्ता होती. या युतीवरून अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले तरी ती पाच वर्षे सुरळीतपणे कायम होते; पण यावेळेचे चित्र वेगळे आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडीची सत्ता आहे, तर या तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढविली. यंदाच्या निवडणुकीचे चित्र निश्चितच वेगळे राहणार आहे.

अंकुश गुंडावारलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ओबीसी प्रवर्गाच्या एकूण ३० जागा वगळून जि.प.च्या ४३ आणि पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक  पार पडली. या निवडणुकीत प्रथमच गोंदिया विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार यांच्या चाबी संघटनेने जि.प.च्या १४, तर पंचायत  समितीच्या सर्वच जागा लढविल्या होत्या. गोंदिया तालुक्यात चौरंगी लढत झाल्याने आणि या तालुक्यात जो बाजी मारेल त्याला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा मार्ग सुकर होणार आहे. त्यामुळे चाबी कुणाचे कुलूप लावणार हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. चाबीच्या कुलूप लावण्यावरच फुलांची उधळण आणि घड्याळाची टिकटिक वाजण्याचे समीकरण बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे. गोंदिया जिल्हा परिषदेत मागील पाच वर्षे काँग्रेस-भाजप अभद्र युतीची सत्ता होती. या युतीवरून अनेकदा आरोप-प्रत्यारोप झाले तरी ती पाच वर्षे सुरळीतपणे कायम होते; पण यावेळेचे चित्र वेगळे आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडीची सत्ता आहे, तर या तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक स्वबळावर लढविली. यंदाच्या निवडणुकीचे चित्र निश्चितच वेगळे राहणार आहे. जिल्हा परिषद ४३ आणि पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी जागा सर्वसाधारण करून त्यासाठी १८ जानेवारीला निवडणूक होत आहेत. यात  जिल्हा  परिषदेच्या १० आणि पंचायत समितीच्या २० जागांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेवर कोणत्या पक्षाचा झेंडा हे ठरविण्यात या १० जागा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे या दहा जागांच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. २१ तारखेला पार पडलेल्या १२९ जागांच्या निवडणुकीसाठी पार पडलेल्या निवडणुकीत बहुतेक सर्वच ठिकाणी त्रिशंकू लढती झाल्या. त्यामुळे कुठे हात सोबत तर कुठे घड्याळाची टिकटिक, तर काही ठिकाणी फुलांची उधळ होणे निश्चित आहे. या निवडणुकीत ७० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने याचा विजयाचा समीकरणावर निश्चित परिणाम होणार आहे. मात्र,  गोंदिया तालुक्यात भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि चाबी असा चौरंगी सामना झाला. त्यामुळे चाबी ज्यांचे कुलूप लावील त्याचा तेवढाचा फायदा फूल उमलण्यास आणि घडीची टिकटिक वाजण्यास होणार आहे. त्यामुळे याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

जिल्हा परिषदेत कोण होणार प्लस आणि मायनस- मागील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक २० जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर काँग्रेस १६ आणि भाजपने १७ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन जिल्हा परिषदेत सहज सत्ता स्थापन करू शकले असते. पण स्थानिक बंगाल आणि गल्लीचे राजकारण यात आडवे आल्याने काँग्रेसने कमळ हातात घेत अभद्र युती करीत सत्ता स्थापन केली होती. पण यंदाचे समीकरण वेगळे आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत कोण मायनस आणि कोण प्लस होतो याकडेच सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. १० जागांवर बरेच समीकरण अवलंबून - ओबीसी प्रवर्गाच्या सर्वसाधारण करण्यात आल्या आहेत. यात जिल्हा परिषदेच्या केशोरी, इटखेडा, माहुरकुडा, महागाव, बोंडगावदेवी, पांढरी, ठाणा, घाटटेमणी, किकरीपार, निंबा जागांचा समावेश आहे. जि.प.मध्ये सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टीने या दहा जागा फारच महत्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे या दहा जागांकडे सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रित केल्याने या निवडणुकीतील चुरस वाढली आहे. 

कोण किती पाण्यात कळणार १९ ला - जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ आणि पंचायत समितीच्या १०६ जागांची एकत्रित मतमोजणी १९ जानेवारीला होणार आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच पक्षाच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे निकालानंतरच कोण किती पाण्यात हे स्पष्ट होणार आहे. नेत्यांनी मांडले पक्षश्रेष्ठींसमोर अंकगणित - जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या १२९ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक पार पडली. यात ७० टक्के मतदान झाले. यानंतर प्रत्येक पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार कोणत्या क्षेत्रात प्लस आणि मायनस राहू शकतो याची आकडेमोड करुन अंक गणित सादर केल्याची माहिती आहे.  

सर्वच म्हणतात आम्हीच सरस, मतदार म्हणतात आमच्याकडे गुपित 

- स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने जिल्हा परिषदेची निवडणूक ही महत्त्वपूर्ण मानली जाते आहे. २१ डिसेंबरला निवडणूक पार पडल्यानंतर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आम्हीच सरस असल्याचा दावा केला. पण कोण सरस याचे गुपित मतदारांनाच माहिती असल्याने ते काय निर्णय देतात हे १९ जानेवारीला मतपेट्यांचा पिटारा उघडल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद