शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

ग्रामपंचायतचा सरपंच कोण?

By admin | Updated: November 29, 2014 23:23 IST

तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींपैकी सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरी ग्रामपंचातचा सरंपच कोण? हा संतप्त प्रश्न गावकरी व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी खंडविकास अधिकारी

देवरी : तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींपैकी सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवरी ग्रामपंचातचा सरंपच कोण? हा संतप्त प्रश्न गावकरी व ग्रामपंचायतच्या सदस्यांनी खंडविकास अधिकारी एस.एन. मेश्राम यांना विचारला आहे. या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधार्थ खंडविकास अधिकारी मागील दोन दिवसांपासून कार्यालयात आलेच नाहीत.सविस्तर असे की, देवरीचे सरपंच संतोष मडावी यांच्या विरोधात १२ विरुद्ध एक सदस्यांनी ८ आॅगस्ट रोजी अविश्वास ठराव पारीत केला होता. १२ आॅगस्ट रोजी खंडविकास अधिकारी मेश्राम यांनी देवरीचे उपसरपंच कृष्णदास चोपकर यांना अधिकृत पत्र देऊन प्रभारी सरपंच म्हणून नियुक्त केले होते. १३ आॅगस्ट रोजी मडावी यांनी अविश्वासा विरोधात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता व त्याला २६ आॅगस्ट रोजी मंजूर करण्यात आले. मंजूर अर्जाचा आदेश नियमानुसार अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदार व त्यांच्याकडून खंविअ मेश्राम यांच्याकडे पाठवायला पाहिजे होता. परंतु तशी प्रक्रिया न झाल्याने खंविअ मेश्राम यांनी २६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर पर्यंत प्रभारी सरपंच चोपकर यांचे पद रिक्त करून मडावी यांना सरपंच पद देण्याचे कोणतेही आदेश काढले नाही.तर ३१ आॅक्टोबर रोजी प्रभारी सरपंचांनी अप्पर जिल्हाधिकारी यांनी अविश्वासाच्या विरोधात मंजूर केलेल्या अर्जाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रीट पीटीशन दाखल करुन आवाहन केले. यावर उच्च न्यायालयाचे १४ आॅक्टोबर रोजी ग्रामपंचायत देवरीची जशी परिस्थिती होती तशी असू द्या म्हणून स्टेटेस्को दिला. त्यामुळे सरपंच पदाचा प्रभार चोपकर यांच्याकडेच होता व आहे.दरम्यामन विस्तार अधिकारी के.ए. आचले यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करुन व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश नसून सुद्धा ८ आॅक्टोबर रोजी पंचायत समितीच्या आवक जावक मध्ये मागील ४ आॅक्टोबर असा दिनांक टाकून खंड विकास अधिकारी यांना मडावी यांना रुजू करीत असल्याचे पत्र दिल्याचा व आपल्या पदाचे दुरुपयोग केल्याचा आरोप १२ सदस्यांनी लावला आहे. तसेच तेव्हापासून आचले व मडावी हे ग्रामपंचायत मध्ये कराच्या रुपाने जमा होणारा पैसा बँक अकाँउट मध्ये न टाकता व ग्रामपंचायत कमेटीची मंजूरी न घेता परस्पररित्या नियमबाह्य खर्च करीत असल्याची तक्रार तहसीलदारांकडे केली आहे.मुख्य म्हणजे मागील चार महिन्यांपासून वाऱ्यावर असलेल्या ग्रामपंचायतचा सरपंच कोण हा प्रश्न स्थायी समितीच्या सभेत १४ नोव्हेंबर रोजी महिला बालकल्याण सभापती सविता पुराम व जिल्हा परिषद सदस्य राजेश चांदेवार यांनी उपस्थित केला होता. यावर खंडविकास अधिकारी मेश्राम यांनी २४ तासांत निर्णय देण्याचे आश्वासन सभेत दिले होते. त्या अनुषंगाने १२ सदस्यांनी भाजपा तालुकाध्यक्षांच्या नेतृत्वात खंड विकास अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यावेळी सुद्धा वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन सांगतो, हेच उत्तर खंड विकास अधिकारी मागील दोन महिन्यांपासून देत असल्याने ग्रामपंचायत सदस्यांनी तहसीलदारांकडे दाद मागितली. त्यावेळी तहसीलदारांसमोर बीडीओंंनी २० नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता पर्यंत निर्णय देण्याचे आश्वासन दिले. परंतु दि. २७ नोव्हेंबरपासून खंडविकास अधिकारी लापता आहेत. न्याय मागणाऱ्यांनी दिवसभर दुरध्वनीद्वारे संपर्क केला असता त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. (प्रतिनिधी)