शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कुठे गेले जनतेचे विश्वासपात्र प्रतिनिधी?

By admin | Updated: February 20, 2015 01:26 IST

सन २००४ ते २०१४ पर्यंत आम्ही शासनात असताना शेतकऱ्यांच्या हितात अनेक कृषीविषयक कार्य केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे योजना,...

गोंदिया : सन २००४ ते २०१४ पर्यंत आम्ही शासनात असताना शेतकऱ्यांच्या हितात अनेक कृषीविषयक कार्य केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे योजना, असे अनेक कामे केली. मात्र ज्यांच्यावर जनतेने विश्वास ठेवून निवडून दिले ते लोकप्रतिनिधी आता कुठे बेपत्ता झाले? असा सवाल खा.प्रफुल्ल पटेल यांनी केला.गोरेगाव तालुक्याच्या हिराटोला येथे मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या कृषी संजिवनी २०१५ संमेलनाचे उद्घाटन प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.खा.पटेल पुढे म्हणाले, गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील हजारो युवकांना रोजगार देणारे अदानी पॉवर प्रोजेक्ट आम्ही सुरू केले. या क्षेत्रात अनेक विकास कार्य घडवून आणले. परंतु जनतेने विश्वास केलेले प्रतिनिधी आता कुठे गायब झाले. जनतेचे विश्वास न मिळल्यावरही आम्ही अनेकदा आपली उपस्थिती लोकांमध्ये दर्शविली. केवळ राजनितीच करणे हे आमचे ध्येय नसून गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जनतेशी आमचा लगाव आहे, असे ते म्हणाले.या वेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, मनोहर चंद्रिकापुरे, आ. प्रकाश गजभिये, विजय राणे उपस्थित होते.मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाचे संस्थापक कैलाश डोंगरे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे कार्य व उपक्रमांची माहिती दिली. तसेच प्रफुल्ल पटेल यांच्याकडून संस्थेसाठी सहकार्य मागितले व पटेलांनीही ते सहर्ष स्वीकार केले. अतिथी म्हणून सोमेश्वर रहांगडाले, बाबा बहेकार, सरपंच सीमा पटले, कल्पना बहेकार, जनार्दन सिंगाडे, बघेले, प्रा. सुचित लाकडे, बाबुलाल बिसेन, भोजू ब्राह्मणकर, प्रल्हाद बिसेन, सूर्यकांत डोंगरे, रमन हुमे, दिलीप मून आदी उपस्थित होते. संचालन प्रा. शैलेश डोंगरे यांनी तर आभार जनार्दन शिंगाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)