शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

कुठे गेले जनतेचे विश्वासपात्र प्रतिनिधी?

By admin | Updated: February 20, 2015 01:26 IST

सन २००४ ते २०१४ पर्यंत आम्ही शासनात असताना शेतकऱ्यांच्या हितात अनेक कृषीविषयक कार्य केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे योजना,...

गोंदिया : सन २००४ ते २०१४ पर्यंत आम्ही शासनात असताना शेतकऱ्यांच्या हितात अनेक कृषीविषयक कार्य केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे योजना, असे अनेक कामे केली. मात्र ज्यांच्यावर जनतेने विश्वास ठेवून निवडून दिले ते लोकप्रतिनिधी आता कुठे बेपत्ता झाले? असा सवाल खा.प्रफुल्ल पटेल यांनी केला.गोरेगाव तालुक्याच्या हिराटोला येथे मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या कृषी संजिवनी २०१५ संमेलनाचे उद्घाटन प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.खा.पटेल पुढे म्हणाले, गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील हजारो युवकांना रोजगार देणारे अदानी पॉवर प्रोजेक्ट आम्ही सुरू केले. या क्षेत्रात अनेक विकास कार्य घडवून आणले. परंतु जनतेने विश्वास केलेले प्रतिनिधी आता कुठे गायब झाले. जनतेचे विश्वास न मिळल्यावरही आम्ही अनेकदा आपली उपस्थिती लोकांमध्ये दर्शविली. केवळ राजनितीच करणे हे आमचे ध्येय नसून गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जनतेशी आमचा लगाव आहे, असे ते म्हणाले.या वेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, मनोहर चंद्रिकापुरे, आ. प्रकाश गजभिये, विजय राणे उपस्थित होते.मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाचे संस्थापक कैलाश डोंगरे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे कार्य व उपक्रमांची माहिती दिली. तसेच प्रफुल्ल पटेल यांच्याकडून संस्थेसाठी सहकार्य मागितले व पटेलांनीही ते सहर्ष स्वीकार केले. अतिथी म्हणून सोमेश्वर रहांगडाले, बाबा बहेकार, सरपंच सीमा पटले, कल्पना बहेकार, जनार्दन सिंगाडे, बघेले, प्रा. सुचित लाकडे, बाबुलाल बिसेन, भोजू ब्राह्मणकर, प्रल्हाद बिसेन, सूर्यकांत डोंगरे, रमन हुमे, दिलीप मून आदी उपस्थित होते. संचालन प्रा. शैलेश डोंगरे यांनी तर आभार जनार्दन शिंगाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)