शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

कुठे गेले जनतेचे विश्वासपात्र प्रतिनिधी?

By admin | Updated: February 20, 2015 01:26 IST

सन २००४ ते २०१४ पर्यंत आम्ही शासनात असताना शेतकऱ्यांच्या हितात अनेक कृषीविषयक कार्य केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे योजना,...

गोंदिया : सन २००४ ते २०१४ पर्यंत आम्ही शासनात असताना शेतकऱ्यांच्या हितात अनेक कृषीविषयक कार्य केले. शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या शेतात शेततळे योजना, असे अनेक कामे केली. मात्र ज्यांच्यावर जनतेने विश्वास ठेवून निवडून दिले ते लोकप्रतिनिधी आता कुठे बेपत्ता झाले? असा सवाल खा.प्रफुल्ल पटेल यांनी केला.गोरेगाव तालुक्याच्या हिराटोला येथे मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या कृषी संजिवनी २०१५ संमेलनाचे उद्घाटन प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.खा.पटेल पुढे म्हणाले, गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील हजारो युवकांना रोजगार देणारे अदानी पॉवर प्रोजेक्ट आम्ही सुरू केले. या क्षेत्रात अनेक विकास कार्य घडवून आणले. परंतु जनतेने विश्वास केलेले प्रतिनिधी आता कुठे गायब झाले. जनतेचे विश्वास न मिळल्यावरही आम्ही अनेकदा आपली उपस्थिती लोकांमध्ये दर्शविली. केवळ राजनितीच करणे हे आमचे ध्येय नसून गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील जनतेशी आमचा लगाव आहे, असे ते म्हणाले.या वेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, मनोहर चंद्रिकापुरे, आ. प्रकाश गजभिये, विजय राणे उपस्थित होते.मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाचे संस्थापक कैलाश डोंगरे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेचे कार्य व उपक्रमांची माहिती दिली. तसेच प्रफुल्ल पटेल यांच्याकडून संस्थेसाठी सहकार्य मागितले व पटेलांनीही ते सहर्ष स्वीकार केले. अतिथी म्हणून सोमेश्वर रहांगडाले, बाबा बहेकार, सरपंच सीमा पटले, कल्पना बहेकार, जनार्दन सिंगाडे, बघेले, प्रा. सुचित लाकडे, बाबुलाल बिसेन, भोजू ब्राह्मणकर, प्रल्हाद बिसेन, सूर्यकांत डोंगरे, रमन हुमे, दिलीप मून आदी उपस्थित होते. संचालन प्रा. शैलेश डोंगरे यांनी तर आभार जनार्दन शिंगाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)