शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार तरी केव्हा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 05:00 IST

५३ सदस्यीय असलेल्या गोंदिया जि.प. वर मागील पाच वर्षे भाजप-काँग्रेस अभद्र युतीची सत्ता होती. मात्र आता राज्यातील समीकरण बदलले असून जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये फेरबदल झाला आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा सूर आवळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेसुद्धा आवळत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ मागील वर्षी १५ जुलैला संपला. पण, कोरोनामुळे निवडणुका लांबणीवर गेल्याने शासनाने जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली. याला आता वर्षभरापाचा कालावधी लोटला असून, अजूनही जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा निवडणूक विभागाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे जि. प. निवडणुकांचा बिगुल नेमका वाजणार तरी केव्हा, असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना पडला आहे. जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. ग्रामविकास संदर्भातील अनेक विकासकामे येथून केली जातात. त्यामुळेच जिल्हा परिषदेला भरपूर महत्त्व आहे. एकूण ५३ सदस्यीय असलेल्या गोंदिया जि.प. वर मागील पाच वर्षे भाजप-काँग्रेस अभद्र युतीची सत्ता होती. मात्र आता राज्यातील समीकरण बदलले असून जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांमध्ये फेरबदल झाला आहे. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा सूर आवळला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेसुद्धा आवळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना या पक्षांनी सुद्धा या निवडणुका स्वळबळावरच लढविण्याची तयारी सुरू केली आहे. त्याच दृष्टीने सध्या गावा गावांत मोर्चेबांधणी सुरू असून, छोटेखानी सभा आणि बैठकांची रणधुमाळी सुरू आहे. या बैठकांमधून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याचा सल्ला दिला जात आहे, तर इतरही पक्ष छोट्या छोट्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे. 

मोर्चेबांधणीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस अग्रेसर- कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला असून, निर्बंधदेखील शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक विभागाकडून कुठल्याही क्षणी निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आ. राजेंद्र जैन, आ. मनाेहर चंद्रिकापुरे, विजय शिवणकर यांच्या नेतृत्वात जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे, तर काँग्रेससुद्धा माजी आ. दिलीप बन्सोड, नामदेव किरसान, अमर वऱ्हाडे, रत्नदीप दहीवले यांच्या नेतृत्वात सभा बैठकांचा धडका लावल्याचे चित्र आहे तर भाजप आणि शिवसेना यात थोडी मागे असल्याचे चित्र आहे. मात्र सर्वच राजकीय पक्षांनी ग्रामीण भागात आपला जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. 

ओबीसी आरक्षणाने पेच कायम सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण रद्द केले. त्यामुळे ओबीसींच्या जागा रद्द करुन नव्याने सर्कल निहाय आरक्षण जाहीर करावे लागले. ओबीसीच्या जागा रद्द झाल्याने आता जनरलच्या जागा वाढणार आहे. एकूण ५३ जागांपैकी ३७ जागा जनरल होण्याची शक्यता आहे. मात्र, यावर राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे. विकासकामांवर परिणाम जिल्ह्यात एकूण ५३ जिल्हा परिषद क्षेत्र असून, या सदस्यांच्या माध्यमातून क्षेत्रातील विविध कामे केली जातात. तसेच नागरिकांच्या समस्यांचीसुद्धा दखल घेतली जाते. पण, मागील वर्षभरापासून निवडणुका लांबणीवर गेल्याने सर्व विकासकामे ठप्प पडली आहेत.

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद