शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील समस्यांचे ग्रहण सुटणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST

राजेश मुनीश्वर : सडक अर्जुनी : स्थानिक ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपातंर होऊन सहा वर्षे पूर्ण झाली. मात्र, या सहा वर्षांत ...

राजेश मुनीश्वर :

सडक अर्जुनी : स्थानिक ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपातंर होऊन सहा वर्षे पूर्ण झाली. मात्र, या सहा वर्षांत शहराची कसलीच प्रगती झाली नाही. शहरवासीयांना अजूनही शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे जाळे विस्तारण्यात आले नाही. रस्ते, स्वच्छता आणि इतर समस्या कायम आहेत. त्यामुळे या समस्यांचे ग्रहण नेमके सुटणार केव्हा, असा सवाल शहरवासीय नगरपंचायतीला करीत आहेत.

शहरवासीयांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वॉटर फिल्टर लावण्यात आले होते; पण तेही शेवटची घटका मोजत आहे. शहरातील काही वॉर्डांत बोअरवेल नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. सार्वजनिक विंधन विहीर नसल्याने, एखादवेळी वीज नसल्यावर पाण्यासाठी हाहाकार होत असते. वॉर्ड क्रमांक १७ मध्ये दोन विंधन विहिरीची नितांत गरज आहे; पण त्याठिकाणी एकही विंधन विहीर नसल्याने वॉर्डांतील नागरिकांना इतरत्र भटकावे लागते.

नागरिकांना सायंकाळी फिरण्यासाठी गार्डन नाही.

सडक अर्जुनी तालुका होऊन ३१ वर्षे पूर्ण झालीत. तालुका झाल्याने लेआउटचा महापूर सडक अर्जुनी शहरात आला आहे. लेआउटमध्ये लोकांनी घरे बांधून शहराचे स्वरूप आले; पण जाण्यासाठी रस्ता नाही. घराचे सांडपाणी जाण्यासाठी नाल्या नाहीत, काही वॉर्डांत नाल्या आहेत; पण रस्ते उंच झाल्याने नाल्या खाली झाल्या आहेत. नाल्यांमधील केरकचऱ्याची नियमित साफसफाई केली जात नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सुंदर गाव, हिरव्या गावची संकल्पना पूर्ण झालीच नाही, छत्तीस कोटी वृक्षलागवडीअंतर्गत प्रत्येक वॉर्डात वृक्षारोपण करण्यात आले होते; पण त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केल्याने ही संपूर्ण झाडे वाळली आहेत.

............

झाडच झाले बसस्थानक

सडक अर्जुनी येथे बसस्थानक नसल्याने ये- जा करणाऱ्या प्रवाशांना चौकातील एका लिंबाच्या झाडाचा आश्रय घेऊन बस येण्याची वाट बघावी लागते. तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक नसलेले हे राज्यातील एकमेव ठिकाण असावे. मात्र, याकडे शासन, प्रशासनाचेसुद्धा लक्ष गेले नाही. त्यामुळे ही समस्या कायम आहे.

.........

समस्यांची दखल घेणार तरी केव्हा

शहरातील समस्यांसंदर्भात अनेकदा नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र, त्यांनी आजपर्यंत आश्वासनापलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे समस्या कायम आहेत. या समस्यांची दखल घेऊन त्या मार्गी केव्हा लावणार असा सवाल प्रल्हाद कोरे, रेखा मुनीश्वर, रोशन बडोले, तुकाराम येरणे, राजेश फुले, प्रमिला कोरे, दुर्गा खोटेले, चिलिया ब्राह्मणकर, संजय मेंढे, देवीदास रुखमोडे, अंजली मुनीश्वर, विनोद बारसागडे यांनी केला आहे.