शहरं
Join us  
Trending Stories
1
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
2
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
3
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
4
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
5
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
6
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
7
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
8
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
9
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
10
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
11
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
12
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
13
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
14
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
15
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
16
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
17
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
18
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
19
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
20
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!

शहरातील समस्यांचे ग्रहण सुटणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST

राजेश मुनीश्वर : सडक अर्जुनी : स्थानिक ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपातंर होऊन सहा वर्षे पूर्ण झाली. मात्र, या सहा वर्षांत ...

राजेश मुनीश्वर :

सडक अर्जुनी : स्थानिक ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपातंर होऊन सहा वर्षे पूर्ण झाली. मात्र, या सहा वर्षांत शहराची कसलीच प्रगती झाली नाही. शहरवासीयांना अजूनही शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे जाळे विस्तारण्यात आले नाही. रस्ते, स्वच्छता आणि इतर समस्या कायम आहेत. त्यामुळे या समस्यांचे ग्रहण नेमके सुटणार केव्हा, असा सवाल शहरवासीय नगरपंचायतीला करीत आहेत.

शहरवासीयांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वॉटर फिल्टर लावण्यात आले होते; पण तेही शेवटची घटका मोजत आहे. शहरातील काही वॉर्डांत बोअरवेल नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. सार्वजनिक विंधन विहीर नसल्याने, एखादवेळी वीज नसल्यावर पाण्यासाठी हाहाकार होत असते. वॉर्ड क्रमांक १७ मध्ये दोन विंधन विहिरीची नितांत गरज आहे; पण त्याठिकाणी एकही विंधन विहीर नसल्याने वॉर्डांतील नागरिकांना इतरत्र भटकावे लागते.

नागरिकांना सायंकाळी फिरण्यासाठी गार्डन नाही.

सडक अर्जुनी तालुका होऊन ३१ वर्षे पूर्ण झालीत. तालुका झाल्याने लेआउटचा महापूर सडक अर्जुनी शहरात आला आहे. लेआउटमध्ये लोकांनी घरे बांधून शहराचे स्वरूप आले; पण जाण्यासाठी रस्ता नाही. घराचे सांडपाणी जाण्यासाठी नाल्या नाहीत, काही वॉर्डांत नाल्या आहेत; पण रस्ते उंच झाल्याने नाल्या खाली झाल्या आहेत. नाल्यांमधील केरकचऱ्याची नियमित साफसफाई केली जात नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सुंदर गाव, हिरव्या गावची संकल्पना पूर्ण झालीच नाही, छत्तीस कोटी वृक्षलागवडीअंतर्गत प्रत्येक वॉर्डात वृक्षारोपण करण्यात आले होते; पण त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केल्याने ही संपूर्ण झाडे वाळली आहेत.

............

झाडच झाले बसस्थानक

सडक अर्जुनी येथे बसस्थानक नसल्याने ये- जा करणाऱ्या प्रवाशांना चौकातील एका लिंबाच्या झाडाचा आश्रय घेऊन बस येण्याची वाट बघावी लागते. तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक नसलेले हे राज्यातील एकमेव ठिकाण असावे. मात्र, याकडे शासन, प्रशासनाचेसुद्धा लक्ष गेले नाही. त्यामुळे ही समस्या कायम आहे.

.........

समस्यांची दखल घेणार तरी केव्हा

शहरातील समस्यांसंदर्भात अनेकदा नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र, त्यांनी आजपर्यंत आश्वासनापलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे समस्या कायम आहेत. या समस्यांची दखल घेऊन त्या मार्गी केव्हा लावणार असा सवाल प्रल्हाद कोरे, रेखा मुनीश्वर, रोशन बडोले, तुकाराम येरणे, राजेश फुले, प्रमिला कोरे, दुर्गा खोटेले, चिलिया ब्राह्मणकर, संजय मेंढे, देवीदास रुखमोडे, अंजली मुनीश्वर, विनोद बारसागडे यांनी केला आहे.