शहरं
Join us  
Trending Stories
1
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
2
भाजपने आणखी एक नगरपालिका बिनविरोध जिंकली; मविआच्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले... 
3
Breaking: भारत - इस्रायल समृद्धीच्या नव्या पर्वाचे 'टेक ऑफ'; मुक्त व्यापार करार, थेट विमानसेवा अन् बरंच काही...
4
मोठी बातमी! लुधियाना टोल प्लाझाजवळ पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक; परिसरात गोळीबाराचा आवाज
5
२०० महिलांनी कोर्टातच घेतला जीव; मालेगावात जे घडता घडता राहिलं ते नागपूरमध्ये झालं होतं
6
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्का, अनिल देशमुख यांचे पुत्र सलिल देशमुख यांचा राजीनामा
7
Viral : जगातला सगळ्यात आळशी व्यक्ती! स्पर्धा जिंकण्यासाठी तब्बल 'इतके' तास गादीवर झोपून राहिला
8
'अनगरच्या पाटलांचा माज आम्ही उतरवणार, चुकीला माफी नाही'; अजित पवारांच्या नेत्याचा थेट इशारा
9
बंगालमध्ये 'घमासान'! "परिस्थिती अत्यंत बिघडलीये, SIR त्वरित थांबवा..."; ममता बॅनर्जींच CECना पत्र, आणखी काय म्हणाल्या?
10
IND vs SA: हार्दिक पांड्या आफ्रिकेविरूद्धच्या वनडे मालिकेत खेळणार की नाही? वाचा ताजी अपडेट
11
लाकडाचेच ते...! चीनमधील १,५०० वर्षे जुन्या प्राचीन मंदिराचे पॅव्हेलिअन पेटले; पर्यटकांनी मेणबत्ती लावली अन्...
12
भारतात विकली जाणारी टेस्ला मॉडेल Y किती सुरक्षित; युरो एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये मिळवले 'एवढे' स्टार रेटिंग!
13
पश्चिम बंगालमध्ये ९०० मतदारांची नावे यादीतून गायब; निवडणूक आयोगाचा संताप, बीएलओंवर कारवाईचे आदेश
14
लोकांचे पैसे गुंतविता गुंतविता Groww ने १९,००० कोटींचे नुकसान केले; गुंतवणूकदार डोके धरून बसले...
15
पती नव्हे राक्षस! पत्नीने मित्रांना विरोध केला म्हणून मारहाण, गर्भपात आणि नंतर अश्लील व्हिडीओ व्हायरल
16
'पाश्चिमात्य दबावातही भारत-रशिया संबंध मजबूत', अमेरिकेचा उल्लेख करत रशियाची मोठी प्रतिक्रिया
17
Nashik: येवल्यात छगन भुजबळांच्या 'पंच'मुळे उद्धवसेना 'सलाइन'वर, 'शिंदेसेने'लाही दिला शह
18
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
19
२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर
20
Pune Hit And Run: टेम्पोने उडवले, सात वर्षाच्या अनुरागने जागेवरच सोडला जीव, आजोबा आणि भाऊ थोडक्यात बचावले
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील समस्यांचे ग्रहण सुटणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST

राजेश मुनीश्वर : सडक अर्जुनी : स्थानिक ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपातंर होऊन सहा वर्षे पूर्ण झाली. मात्र, या सहा वर्षांत ...

राजेश मुनीश्वर :

सडक अर्जुनी : स्थानिक ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपातंर होऊन सहा वर्षे पूर्ण झाली. मात्र, या सहा वर्षांत शहराची कसलीच प्रगती झाली नाही. शहरवासीयांना अजूनही शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे जाळे विस्तारण्यात आले नाही. रस्ते, स्वच्छता आणि इतर समस्या कायम आहेत. त्यामुळे या समस्यांचे ग्रहण नेमके सुटणार केव्हा, असा सवाल शहरवासीय नगरपंचायतीला करीत आहेत.

शहरवासीयांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वॉटर फिल्टर लावण्यात आले होते; पण तेही शेवटची घटका मोजत आहे. शहरातील काही वॉर्डांत बोअरवेल नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. सार्वजनिक विंधन विहीर नसल्याने, एखादवेळी वीज नसल्यावर पाण्यासाठी हाहाकार होत असते. वॉर्ड क्रमांक १७ मध्ये दोन विंधन विहिरीची नितांत गरज आहे; पण त्याठिकाणी एकही विंधन विहीर नसल्याने वॉर्डांतील नागरिकांना इतरत्र भटकावे लागते.

नागरिकांना सायंकाळी फिरण्यासाठी गार्डन नाही.

सडक अर्जुनी तालुका होऊन ३१ वर्षे पूर्ण झालीत. तालुका झाल्याने लेआउटचा महापूर सडक अर्जुनी शहरात आला आहे. लेआउटमध्ये लोकांनी घरे बांधून शहराचे स्वरूप आले; पण जाण्यासाठी रस्ता नाही. घराचे सांडपाणी जाण्यासाठी नाल्या नाहीत, काही वॉर्डांत नाल्या आहेत; पण रस्ते उंच झाल्याने नाल्या खाली झाल्या आहेत. नाल्यांमधील केरकचऱ्याची नियमित साफसफाई केली जात नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सुंदर गाव, हिरव्या गावची संकल्पना पूर्ण झालीच नाही, छत्तीस कोटी वृक्षलागवडीअंतर्गत प्रत्येक वॉर्डात वृक्षारोपण करण्यात आले होते; पण त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केल्याने ही संपूर्ण झाडे वाळली आहेत.

............

झाडच झाले बसस्थानक

सडक अर्जुनी येथे बसस्थानक नसल्याने ये- जा करणाऱ्या प्रवाशांना चौकातील एका लिंबाच्या झाडाचा आश्रय घेऊन बस येण्याची वाट बघावी लागते. तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक नसलेले हे राज्यातील एकमेव ठिकाण असावे. मात्र, याकडे शासन, प्रशासनाचेसुद्धा लक्ष गेले नाही. त्यामुळे ही समस्या कायम आहे.

.........

समस्यांची दखल घेणार तरी केव्हा

शहरातील समस्यांसंदर्भात अनेकदा नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र, त्यांनी आजपर्यंत आश्वासनापलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे समस्या कायम आहेत. या समस्यांची दखल घेऊन त्या मार्गी केव्हा लावणार असा सवाल प्रल्हाद कोरे, रेखा मुनीश्वर, रोशन बडोले, तुकाराम येरणे, राजेश फुले, प्रमिला कोरे, दुर्गा खोटेले, चिलिया ब्राह्मणकर, संजय मेंढे, देवीदास रुखमोडे, अंजली मुनीश्वर, विनोद बारसागडे यांनी केला आहे.