शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीच्या भूमिकेवरून साहित्यिक एकवटले; लेखक, कवी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार परत करणार
2
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
3
सोनम रघुवंशीला 'वाचवणारा आणि लपवणारा' लोकेंद्र तोमर कोण? राजा हत्याकांडात आणखी एक मोठा खुलासा
4
Devendra Fadnavis: राहुल गांधींना मेक इन इंडिया माहिती नाही, त्यांनी गृहपाठ करायला हवा; फडणवीसांचा टोला!
5
तुमचा पैसा 'रॉकेट' बनवणार! 'या' ५ म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ? पाहा संपूर्ण यादी!
6
पुतण्याच्या प्रेमात काकी झाली वेडी, पती आणि तीन वर्षांच्या मुलीला सोडलं, पुतण्यासोबत लग्न केलं
7
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
8
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
9
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
10
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
11
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
12
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
13
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
14
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
15
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
16
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
17
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
18
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
19
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
20
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती

शहरातील समस्यांचे ग्रहण सुटणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:33 IST

राजेश मुनीश्वर : सडक अर्जुनी : स्थानिक ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपातंर होऊन सहा वर्षे पूर्ण झाली. मात्र, या सहा वर्षांत ...

राजेश मुनीश्वर :

सडक अर्जुनी : स्थानिक ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपातंर होऊन सहा वर्षे पूर्ण झाली. मात्र, या सहा वर्षांत शहराची कसलीच प्रगती झाली नाही. शहरवासीयांना अजूनही शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पाणीपुरवठा योजनेचे जाळे विस्तारण्यात आले नाही. रस्ते, स्वच्छता आणि इतर समस्या कायम आहेत. त्यामुळे या समस्यांचे ग्रहण नेमके सुटणार केव्हा, असा सवाल शहरवासीय नगरपंचायतीला करीत आहेत.

शहरवासीयांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वॉटर फिल्टर लावण्यात आले होते; पण तेही शेवटची घटका मोजत आहे. शहरातील काही वॉर्डांत बोअरवेल नसल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. सार्वजनिक विंधन विहीर नसल्याने, एखादवेळी वीज नसल्यावर पाण्यासाठी हाहाकार होत असते. वॉर्ड क्रमांक १७ मध्ये दोन विंधन विहिरीची नितांत गरज आहे; पण त्याठिकाणी एकही विंधन विहीर नसल्याने वॉर्डांतील नागरिकांना इतरत्र भटकावे लागते.

नागरिकांना सायंकाळी फिरण्यासाठी गार्डन नाही.

सडक अर्जुनी तालुका होऊन ३१ वर्षे पूर्ण झालीत. तालुका झाल्याने लेआउटचा महापूर सडक अर्जुनी शहरात आला आहे. लेआउटमध्ये लोकांनी घरे बांधून शहराचे स्वरूप आले; पण जाण्यासाठी रस्ता नाही. घराचे सांडपाणी जाण्यासाठी नाल्या नाहीत, काही वॉर्डांत नाल्या आहेत; पण रस्ते उंच झाल्याने नाल्या खाली झाल्या आहेत. नाल्यांमधील केरकचऱ्याची नियमित साफसफाई केली जात नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. सुंदर गाव, हिरव्या गावची संकल्पना पूर्ण झालीच नाही, छत्तीस कोटी वृक्षलागवडीअंतर्गत प्रत्येक वॉर्डात वृक्षारोपण करण्यात आले होते; पण त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केल्याने ही संपूर्ण झाडे वाळली आहेत.

............

झाडच झाले बसस्थानक

सडक अर्जुनी येथे बसस्थानक नसल्याने ये- जा करणाऱ्या प्रवाशांना चौकातील एका लिंबाच्या झाडाचा आश्रय घेऊन बस येण्याची वाट बघावी लागते. तालुक्याच्या ठिकाणी बसस्थानक नसलेले हे राज्यातील एकमेव ठिकाण असावे. मात्र, याकडे शासन, प्रशासनाचेसुद्धा लक्ष गेले नाही. त्यामुळे ही समस्या कायम आहे.

.........

समस्यांची दखल घेणार तरी केव्हा

शहरातील समस्यांसंदर्भात अनेकदा नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र, त्यांनी आजपर्यंत आश्वासनापलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे समस्या कायम आहेत. या समस्यांची दखल घेऊन त्या मार्गी केव्हा लावणार असा सवाल प्रल्हाद कोरे, रेखा मुनीश्वर, रोशन बडोले, तुकाराम येरणे, राजेश फुले, प्रमिला कोरे, दुर्गा खोटेले, चिलिया ब्राह्मणकर, संजय मेंढे, देवीदास रुखमोडे, अंजली मुनीश्वर, विनोद बारसागडे यांनी केला आहे.