शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बारदाना परताव्याची रक्कम केव्हा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:30 IST

केशोरी : गेल्या वर्षी खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामातील आदिवासी महामंडळाने आधारभूत धान खरेदी केंद्रामध्ये धान्य खरेदी करताना शेतकऱ्यांजवळील ...

केशोरी : गेल्या वर्षी खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामातील आदिवासी महामंडळाने आधारभूत धान खरेदी केंद्रामध्ये धान्य खरेदी करताना शेतकऱ्यांजवळील बारदाना वापरला होता. धानाच्या चुकाऱ्यासोबत बारदाना रकमेचा परतावा करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु अजूनही शेतकऱ्यांना बारदाना परताव्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बारदाना परतावा रक्कम केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.

बारदाना रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यास आदिवासी विकास महामंडळ टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मागील वर्षीच्या खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील धान विक्री करताना शेतकऱ्यांनी स्वत: जवळील २५ रुपये प्रती किमतीचा बारदाना वापरुन महामंडळाच्या आधारभूत धान खरेदी केंद्राला दिला. शासनाकडे बारदाना उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना विनंती करुन त्याचा बारदाना वापरण्यात आला. त्या वर्षीच धानाची चुकारे मिळाले परंतु बारदाना परतावा रक्कम अजूनही शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आली नाही. धान चुकारे जेव्हा मिळतील तेव्हाच बारदाना रक्कम देण्यात येईल असे महामंडळाकडून शेतकऱ्यांना सांगितले होते. परंतु एक वर्षाचा कालावधी लोटूनही आदिवासी महामंडळाने बारदाना रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. यासंदर्भात अनेकदा दिनेश पाटील रहांगडाले यांनी आदिवासी उपप्रादेशिक कार्यालय यांचेशी संपर्क साधून विचारणा केली असता यापूर्वी अधिकारी दुसरे होते त्यामुळे त्यांनी काय केले आहे हे मला माहीत नाही. माहिती घेतल्यानंतर बारदाना परतावा रक्कम देण्याची कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

......

अधिकारी म्हणतात रेकार्ड सापडेना

संबंधित अधिकाऱ्यांना बारदाना देय रकमेचा रेकार्ड सापडत नाही याचे नवल वाटते. या संबंधीची माहिती प्रत्येक आधारभूत धान खरेदी केंद्रावर उपलब्ध असताना माहिती घेण्यासाठी पंधरा पंधरा दिवस लावणे याचा अर्थ शेतकऱ्याप्रति संबंधित अधिकाऱ्यांना किती सहानुभूती आहे हे दिसून येते. याकडे शासनाने त्वरित लक्ष घालून शेतकऱ्यांना बारदाना परताव्याची रक्कम अदा करावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.