शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना बारदाना परताव्याची रक्कम केव्हा मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:30 IST

केशोरी : गेल्या वर्षी खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामातील आदिवासी महामंडळाने आधारभूत धान खरेदी केंद्रामध्ये धान्य खरेदी करताना शेतकऱ्यांजवळील ...

केशोरी : गेल्या वर्षी खरीप हंगामातील आणि रब्बी हंगामातील आदिवासी महामंडळाने आधारभूत धान खरेदी केंद्रामध्ये धान्य खरेदी करताना शेतकऱ्यांजवळील बारदाना वापरला होता. धानाच्या चुकाऱ्यासोबत बारदाना रकमेचा परतावा करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. परंतु अजूनही शेतकऱ्यांना बारदाना परताव्याची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बारदाना परतावा रक्कम केव्हा मिळणार असा प्रश्न उपस्थित केला आहे.

बारदाना रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यास आदिवासी विकास महामंडळ टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मागील वर्षीच्या खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील धान विक्री करताना शेतकऱ्यांनी स्वत: जवळील २५ रुपये प्रती किमतीचा बारदाना वापरुन महामंडळाच्या आधारभूत धान खरेदी केंद्राला दिला. शासनाकडे बारदाना उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना विनंती करुन त्याचा बारदाना वापरण्यात आला. त्या वर्षीच धानाची चुकारे मिळाले परंतु बारदाना परतावा रक्कम अजूनही शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आली नाही. धान चुकारे जेव्हा मिळतील तेव्हाच बारदाना रक्कम देण्यात येईल असे महामंडळाकडून शेतकऱ्यांना सांगितले होते. परंतु एक वर्षाचा कालावधी लोटूनही आदिवासी महामंडळाने बारदाना रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. यासंदर्भात अनेकदा दिनेश पाटील रहांगडाले यांनी आदिवासी उपप्रादेशिक कार्यालय यांचेशी संपर्क साधून विचारणा केली असता यापूर्वी अधिकारी दुसरे होते त्यामुळे त्यांनी काय केले आहे हे मला माहीत नाही. माहिती घेतल्यानंतर बारदाना परतावा रक्कम देण्याची कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

......

अधिकारी म्हणतात रेकार्ड सापडेना

संबंधित अधिकाऱ्यांना बारदाना देय रकमेचा रेकार्ड सापडत नाही याचे नवल वाटते. या संबंधीची माहिती प्रत्येक आधारभूत धान खरेदी केंद्रावर उपलब्ध असताना माहिती घेण्यासाठी पंधरा पंधरा दिवस लावणे याचा अर्थ शेतकऱ्याप्रति संबंधित अधिकाऱ्यांना किती सहानुभूती आहे हे दिसून येते. याकडे शासनाने त्वरित लक्ष घालून शेतकऱ्यांना बारदाना परताव्याची रक्कम अदा करावी अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.