शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

युरियाचा काळाबाजार केव्हा थांबविणार,शेतकऱ्यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 05:00 IST

आपला जिल्हा हा धान शेतीचा जिल्हा आहे. या धान शेतीवरच येथील शेतकऱ्यांचे जीवन आहे. सध्या धान शेतीला  करपा रोगाने ग्रासले असून त्याचे निदान म्हणून  युरिया खताची आवश्यकता आहे. ते खरेदीसाठी शेतकरी एकच धावपळ करीत आहेत. हीच संधी साधून खत व्यापारी कृत्रिमरित्या युरिया खताचा तुटवडा दाखवून २७० रुपयांची पोती सरळ ५०० रुपयाला विक्री करीत आहेत. ही सर्व माहिती कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाला सुद्धा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  सध्या धानाला युरिया खताची अत्यंत आवश्यकता असून ते जर वेळेवर मिळाले नाही तर ऐन बहरात आलेले धान पीक मातीमोल होण्याची शक्यता आहे. हीच संधी साधून खत व्यापाऱ्यांनी कृत्रिमरित्या युरिया खताचा  तुटवडा निर्माण करून काळा बाजार मांडला आहे. युरिया खताचा काळा बाजार करणाऱ्यांना बेड्या ठोका अशी मागणी तालुक्यातील ग्राम ढाकणी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रितम मेश्राम यांनी केली आहे.आपला जिल्हा हा धान शेतीचा जिल्हा आहे. या धान शेतीवरच येथील शेतकऱ्यांचे जीवन आहे. सध्या धान शेतीला  करपा रोगाने ग्रासले असून त्याचे निदान म्हणून  युरिया खताची आवश्यकता आहे. ते खरेदीसाठी शेतकरी एकच धावपळ करीत आहेत. हीच संधी साधून खत व्यापारी कृत्रिमरित्या युरिया खताचा तुटवडा दाखवून २७० रुपयांची पोती सरळ ५०० रुपयाला विक्री करीत आहेत. ही सर्व माहिती कृषी विभाग व जिल्हा प्रशासनाला सुद्धा आहे. खताच्या  होणाऱ्या काळ्याबाजारवर नियंत्रण ठेवण्यासाठी विभागाकडून भरारी पथकसुद्धा बनविण्यात आले आहेत. परंतु आजपर्यंत या पथकांनी खत व्यापाऱ्यांना फक्त नोटिसाच दिल्या असून ठोक स्वरूपाची कारवाई केली नाही. त्यामुळे कृषी विभाग हा शेतकरी हिताचा की खत विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या हिताचा असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडणे स्वाभाविक आहे. युरिया खताची कोणतीही टंचाही नाही असे कृषी विभागाचे म्हणणे आहे तर मग युरियाचा तुटवडा कसा? असा प्रश्न पडत आहे. खताचा काळाबाजार मांडणाऱ्या खत व्यापाऱ्यांवर देशद्रोह कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना तत्काळ बेड्या ठोकाव्यात. तसेच या काळाबाजार प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी मेश्राम यांनी केली आहे.

युरियाच्या टंचाईसाठी जिल्हा प्रशासन जबाबदार- मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण झाली असून, त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. एकंदरीत जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांना युरिया खतासाठी वणवण भटकावे लागत असून, चढ्या दराने खरेदी करावे लागत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांनी केला आहे.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने शेतकरी सुखावला आहे; मात्र मागील काही दिवसांपासून शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या युरिया खताची टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी मिळेल ते दाम देऊन युरिया खत खरेदी करण्यासाठी भटकत आहे. ३०० रुपयाला मिळणारी बॅग सध्या ५०० रुपये देऊनही शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही. गोरेगाव तालुक्यातील अनेक कृषी केंद्र संचालक ५०० रुपये घेऊन खत विक्री करीत आहेत; मात्र प्रशासन धृतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याचे दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी तत्काळ हस्तक्षेप करून कृषी विभागाला धारेवर धरत शेतकऱ्यांना योग्य दरात कसे युरिया खत उपलब्ध करून देण्यात येईल यासंदर्भात नियोजन करावे, अशी मागणी कटरे यांनी केली आहे.

 

टॅग्स :agricultureशेती