शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.तील युतीचा ब्रेकअप केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 22:18 IST

गोंदिया जिल्हा परिषदेत मागील चार वर्षांपासून काँग्रेस-भाजप युतीची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या मुंबई येथे पार पडलेल्या मंथन बैठकीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षांनी जि.प. आणि प.स.च्या पोटनिवडणुकीनंतर जि.प.मधील युती तोडणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिका अर्जुन खरगे यांच्यासमोर दिली होती.

ठळक मुद्देकाँग्रेस जिल्हाध्यक्षांना आश्वासनाचा विसर : पोटनिवडणुकीनंतर युती तोडण्याचे दिली होती ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेत मागील चार वर्षांपासून काँग्रेस-भाजप युतीची सत्ता आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या मुंबई येथे पार पडलेल्या मंथन बैठकीत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षांनी जि.प. आणि प.स.च्या पोटनिवडणुकीनंतर जि.प.मधील युती तोडणार असल्याची ग्वाही काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिका अर्जुन खरगे यांच्यासमोर दिली होती. पोटनिवडणूक होवून महिनाभराचा कालावधी लोटला असला तरी जि.प.तील युती तोडण्याबाबत कुठलीच पाऊले उचलण्यात आली नाही. त्यामुळे जि.प.तील युतीचा ब्रेकअप केव्हा अशी चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात आहे.गोंदिया जि.प.मधील पक्षीय बलाबल पाहता राष्टÑवादी काँग्रेस २०, काँग्रेस १६ आणि भाजप १७ असे एकूण ५३ सदस्य संख्या आहे.राष्टÑवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन जि.प.मध्ये सत्ता स्थापन करु शकले असते. शिवाय लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पक्षाची आघाडी होती.मात्र जिल्ह्यातील अंतर्गत राजकारणामुळे केवळ राष्टÑवादी काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसने जि.प.मध्ये भाजपसह युती करुन सत्ता स्थापन करणे पसंत केले. अध्यक्ष काँग्रेसचा तर उपाध्यक्ष भाजपचा असेच समीकरण मागील चार वर्षांपासून जि.प.मध्ये आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुध्दा या युतीचा मुद्दा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर आता दोन महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होवू घातल्या आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा या युतीचा मुद्दा चर्चेत आहेत.विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात आघाडी होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील जागा वाटप करताना पुन्हा जि.प.मधील काँग्रेस-भाजप युतीचा मुद्दा उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे.महिनाभरापूर्वीच काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे मंथन करण्यासाठी जिल्हानिहाय बैठका मुंबई येथे घेतल्या होत्या. या बैठकीत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी पराभवाचे खापर राष्टÑवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांवर फोडले होते. तेव्हाच जि.प.मधील युतीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तेव्हा काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी जि.प. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर जि.प. मध्ये भाजपसह असलेली युती तोडण्याची ग्वाही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसमोर दिली होती. मात्र पोटनिवडणूक होवून आता महिनाभराचा कालावधी लोटला आहे. पण युती तोडण्यासंदर्भात कुठल्याच हालचाली नसून या मुद्दावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुध्दा कुठलीही चर्चा करताना दिसत नाही. त्यामुळे जि.प.तील युतीचा मुद्दा चांगलाच गाजत असून युतीचा ब्रेकअप केव्हा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.भाजप बिनधास्तकाँग्रेस जिल्हाध्यक्षांनी जि.प.मधील युती तोडण्याची ग्वाही पक्षश्रेष्ठींसमोर दिली होती. त्यामुळे पोटनिवडणुकीनंतर युती तुटण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र यासंदर्भात भाजप जिल्हाध्यक्षांना विचारणा केली असता जि.प.तील युती तोडण्यासंदर्भात कुठलेच संकेत मिळाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे भाजप बिनधास्त असल्याचे चित्र आहे.विधानसभा निवडणुकीत मुद्दा उपस्थित होणारदोन महिन्याने विधानसभा निवडणुका होवू घातल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जि.प.मधील युतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते युती केव्हा तोडणार अशी आपसात चर्चा करीत आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा तोंडावर हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.