शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ सावकारांवर कारवाई कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2016 02:00 IST

कर्जदारांना कच्चा पावत्या देऊन लाखो रुपयांचे सोने सावकारांनी गहाण ठेवून घेतल्याच्या तक्रारी येत आहेत.

उपोषणाचा इशारा : अनेक कर्जदार शेतकरी संकटात अर्जुनी-मोरगाव : कर्जदारांना कच्चा पावत्या देऊन लाखो रुपयांचे सोने सावकारांनी गहाण ठेवून घेतल्याच्या तक्रारी येत आहेत. सावकार कर्जदारांना सोने परत करीत नसल्याने अनेक कर्जदार शासनाच्या योजनेपासून वंचित आहेत. याविरूध्द वडेगाव-स्टेशन येथील विजय मारोती खुणे यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे. सावकारांनी सोन्याच्या मोबदल्यात दिलेल्या कर्जाला शासनाने १० एप्रिल रोजी कर्जमाफी योजना जाहीर केली. यासाठी ३० नोव्हेंबर २०१४ अखेरपर्यंत थकीत असलेले कर्जदार पात्र आहेत. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात ५९४ कर्जदारांचे ५८ लाख ९० हजार ७३४ रुपयांचे सोने सावकारांकडून कर्जदारांना परत करण्यात आले. ४६७ कर्जदारांच्या ३१ लाख ४६ हजार ७०७ रुपयांच्या दाव्यांना २८ डिसेंबर रोजी मंजूरी देण्यात आली. यातील कर्जदारांना सोने परत करण्याची सावकारांकडून प्रक्रिया सुरू आहे. मात्र याव्यतिरीक्त २५४ दावे अपात्र ठरविण्यात आले आहेत. तालुकास्तरीय समितीकडून १४ जानेवारी रोजी १६६ दावे पात्र व ६३ दावे अपात्र ठरवून मंजूरीसाठी जिल्हा समितीकडे पाठविण्यात आले. याचे मूल्य १० लक्ष ९२ हजार ७०० रुपये एवढे आहे. तालुक्यात परवाना प्राप्त सावकारांची संख्या २४ आहे. काही परवानाधारक सावकारांनी साध्या चिढ्ढीवर सोने तारण ठेवून त्या चिढ्या कर्जदारांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे या चिट्यांत नमूद सोनेतारणची नोंद त्यांच्या रोकडपुस्तिकेत नाही. अनेकांनी तर तारण करून कर्जदाराला दिलेल्या चिट्टीवर स्वाक्षरी सुध्दा केलेली नाही. परवानाप्राप्त सावकारांचे पावती बुक व रोकड पुस्तिकेची सहकार विभागाकडून दरवर्षी हिशेब तपासणी केली जाते. शासनाने सावकार कर्जमाफी योजना जाहीर करताच कर्जदार सावकाराकडे दावा दाखल करण्यासाठी जातात. सावकारांनी अशा नोंदी घेतल्या नसल्याने शासनाकडून कर्जमाफी होणार नाही असे सोनेतारण आपल्याच मानगुटीवर बसेल म्हणून कर्जदारांना परत करण्यास चक्क नकार देतात. मुद्दल कर्जाची राशी द्या, व्याज माफी करतो असे सावकार सांगत असल्याचे कर्जदार सांगतात. अजूनही बरेच कर्जदार या योजनेपासून वंचित आहेत. सावकारांच्या छळाविरूध्द विजय खुणे यांनी २८ जानेवारी रोजी अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यात कर्जदारांसमवेत तक्रार नोंदविली. यात तालुक्यात विना परवानाधारक सावकार काम करीत आहेत. एकाच परवान्यावर अनेक सावकार व्यवसाय करतात अशा बोगस सावकारांवर व संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई मागणी केली आहे. अन्यथा ९ फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)