शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
2
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
3
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
4
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
5
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
6
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
7
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
8
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
9
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
10
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
11
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
12
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
13
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
14
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
15
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
16
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
17
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
18
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
19
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
20
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस

काय म्हणता, २ वर्षांत फक्त एकच विदेशी पर्यटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2022 5:00 AM

माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला आता या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सान्निध्याची गरज भासत आहे. यासाठी वनविभागाने राखून ठेवलेल्या जंगलांकडे त्यांची पावले आपसूकच वळत आहेत. हेच कारण आहे की, जंगलातील नागरिकांचा कल आता वन पर्यटनाकडे जास्त दिसत आहे. 

कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया :  चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व मध्यप्रदेश राज्यातील कान्हा केसली व्याघ्र प्रकल्पात मोठ्या संख्येत विदेशी पर्यटक हजेरी लावत असतानाच येथील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २ वर्षांत फक्त एकाच विदेशी पर्यटकाने हजेरी लावल्याची माहिती आहे. यावरून नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प प्रचार-प्रसारात कोठेतरी कमी पडत असल्याचे म्हणणे वावगे पडणार नाही. माणूस आपल्या हव्यासापोटी जंगलांना नष्ट करून तेथेही सिमेंट काँक्रीटचे जंगल उभारत आहे. परिणामी आज मोकळा श्वास घेण्यासाठी या मानवालाच नैसर्गिक वातावरण उरलेले नाही. यामुळेच माणसाला आता या धकाधकीच्या जीवनात काही काळ निवांत घालविण्यासाठी निसर्ग सान्निध्याची गरज भासत आहे. यासाठी वनविभागाने राखून ठेवलेल्या जंगलांकडे त्यांची पावले आपसूकच वळत आहेत. हेच कारण आहे की, जंगलातील नागरिकांचा कल आता वन पर्यटनाकडे जास्त दिसत आहे. जिल्हावासीयांसाठी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वरदान ठरत असून येथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते; मात्र शोकांतिका अशी की, राष्ट्रीय स्तरावर ख्याती असलेले नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार-प्रसारा कोठेतरी कमी पडत असल्याचे दिसते. कारण या प्रकल्पात विदेशी पर्यटकांची हजेरी नावापुरतीच आहे. सन २०२०-२१ व २०२१-२२ या काळात प्रकल्पात एकाही विदेशी पर्यटकाने हजेरी लावली नसून सन २०२२-२३ मध्ये मे महिन्यात जर्मन देशातील फक्त एका विदेशी पर्यटकाने हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा प्रकल्पाला देशातील नावाजलेले व्यक्ती भेट देतात. शिवाय मोठ्या संख्येत विदेशी पर्यटकांचाही यात समावेश असतो. लगतच्या मध्यप्रदेश राज्यातील कान्हा केसली प्रकल्पातही मोठ्या संख्येत विदेशी पर्यटक येतात. नागपूर येथील विमानतळावर विदेशी पर्यटकांचे आगमन झाल्यानंतर त्यांना गोंदिया होत कान्हा केसली हाच सोयीचा मार्ग ठरतो. शिवाय, नागपूर येथून गोंदिया अत्यधिक जवळ असूनही ते नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट न देता इतरत्र जात आहे ही शोकांतिका आहे. वनविभागाने यावर मंथन करण्याची गरज आहे. 

३ महिन्यात १२५५६ पर्यटकांची भेट - कोरोनामुळे सन २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये व्याघ्र प्रकल्प ऐन हंगामातच बंद ठेवावे लागले होते. त्यानंतर आता सन २०२२-२३ मध्ये व्याघ्र प्रकल्प सुरू असून त्यातही ऐन हंगामात सुरू असल्याने मार्च, एप्रिल व मे या ३ महिन्यांत व्याघ्र प्रकल्पात १२५५६  पर्यटकांनी जंगल सफारी केली आहे. यासाठी २३४३ वाहनांना प्रवेश देण्यात आला असून वन्यजीव विभागाला तब्बल २६,९२,५०० रुपयांचे उत्पन्न आले आहे.  

टॅग्स :tourismपर्यटनNagzira Tiger Projectनागझिरा व्याघ्र प्रकल्प