शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

गोंदिया : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मोबाइलचा वापर वाढला आहे. परिणामी अनेकांच्या मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे; परंतु कोरोनामुळे केवळ दुपारी ...

गोंदिया : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मोबाइलचा वापर वाढला आहे. परिणामी अनेकांच्या मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे; परंतु कोरोनामुळे केवळ दुपारी २ वाजेपर्यंतच दुकाने उघडण्याची परवानगी आहे. त्यामुळे मोबाइलची दुरुस्ती करण्यासाठी मोबाइलच्या दुकानांत रांगा दिसून येतात. आता निर्बंध शिथिल केल्यामुळे मोबाइल दुरुस्ती करण्यासाठी लोकांची लगबग सुरू आहे. राज्य सरकारने ४ एप्रिलपासून संचारबंदी सुरू केली होती. त्यामुळे सर्वजण घरी राहू लागले. दरम्यान, वेळ घालविण्यासाठी आबालवृद्धांपासून ते ज्येष्ठांचा मोबाइल हाच एकमेव आधार होता. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन क्लासेस, नेट बँकिंग यासोबतच कोरोना रुग्णांची चौकशी करण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग आदींसाठी मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यासोबतच लसीकरण नोंदणीसाठी सर्वच जण मोबाइलचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. लॉकडाऊन कालावधीत मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सततच्या वापराने व अन्य कारणांमुळे मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड आला आहे; परंतु लॉकडाऊनमुळे सकाळी ७ ते ११ या वेळेत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. याव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद होती. त्यासोबतच ऑनलाइनने मोबाइलचे सुटे पार्ट मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे अनेकांचे मोबाइल बंद आहेत. आता जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केले. दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढले, त्यामुळे मोबाइलच्या दुकानांत गर्दी दिसून येत होती.

.......................................

कारणे काय?

-सततच्या वापरामुळे मोबाइलमध्ये बिघाड झाला. मोबाइल स्क्रीन गार्ड खराब झाले,

फोन आल्यास आपल्याला आवाज येत नाही किंवा इकडून फोन केल्यास आवाज जात नाही.

चार्जिंग केल्यावरही बॅटरी लवकर उतरते, मोबाइल पडल्याने डिस्प्ले फुटला, त्यामुळे मोबाइल वापरायोग्य नाही. ऑटोमॅटिक इतरांना फोन लागणे, टच काम न करणे आदी समस्या आहेत.

पावसाळ्यापूर्वी मोबाइलला कव्हर लावणे, मोबा्यल स्वीच ऑफ होणे, अशा विविध तक्रारी आल्या आहेत.

.............................

दोन महिने बाजारपेठ बंद

कोरोनामुळे पहिल्या लाटेत लॉकडाऊन करण्यात आले. लाट ओसरत असताना लॉकडाऊन हटविल्यानंतर काही प्रमाणात स्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र, पुन्हा दुसरी लाट आल्याने सर्व बंद करण्यात आले. त्यामुळे दोन महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद होती. त्यामुळे मोबाइल दुरुस्ती करता आली नाही. परिणामी अनेकांचे मोबाइल बंद पडले.

...................................

दोन महिने बाजारपेठ बंद

मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये व यंदाही आम्हाला आमचे मोबाइल दुकान बंद ठेवावे लागले. त्यामुळे आमचा व्यवसाय बुडाला. घर चालविणे कठीण झाले. माेबाइलधारकांच्याही समस्या वाढल्या; परंतु आमचे दुकानच बंद असल्याने हातात कवडी नाही, असे मोबाइल दुरुस्ती करणारे आमगाव येथील लोकेश बोहरे यांनी सांगितले.

...............................

मोबाइल महत्त्वाचा, पण आरोग्य

आजघडीला मोबाइल हा आपला अविभाज्य अंग झाला आहे; परंतु सततच्या वापराने मोबाइलमध्ये बिघाड झाला आहे. आता सकाळी ७ ते २ या वेळेत मोबाइल दुकानेही सुरू राहणार आहेत, त्यामुळे मोबाइल दुरुस्त करण्यासाठी मी दुकानात जाईल.

-दीपक भांडारकर, मोबाइलधारक

.........................

अनेकांचे मोबाइल बिघडल्याने दुरुस्तीसाठी दुकानात जात आहेत; परंतु गर्दी करू नये, अन्यथा पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्यास वेळ लागणार नाही. मोबाइल जरी महत्त्वाचा असला तरी आपले आयुष्य त्यापेक्षा किमती आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी करणे योग्य नाही.

- अश्वीन हुमे, मोबाइलधारक आसोली

........................

दीड वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे दुकाने बंद असल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. अनेक ग्राहक मोबाइल दुरुस्तीसाठी फोन करतात; परंतु सुटे सामान येत नसल्याने दुरुस्ती बंद आहे. आता दुकाने सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे.

-हितेश सोनवणे, मोबाइल दुकानदार आमगाव

........................

कोरोनाच्या संसर्गामुळे मोबाइल दुकान बंद होते. आजघडीला मोबाइल अत्यावश्यक सेवेत आणायला हवा. संपर्काचे प्रमुख आणि प्रभावी साधन म्हणून मोबाइल आहे. एखाद्याचा मोबाइल बिघडला, तर ते मोबाइलशिवाय राहूच शकत नाहीत.

दुरुस्तीसाठी माझ्याकडे शेकडो मोबाइल आले आहेत.

- भुमेश बागडे, मोबाइल दुकानदार पदमपूर