शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मोबाइल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

गोंदिया : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मोबाइलचा वापर वाढला आहे. परिणामी अनेकांच्या मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे; परंतु कोरोनामुळे केवळ दुपारी ...

गोंदिया : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मोबाइलचा वापर वाढला आहे. परिणामी अनेकांच्या मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे; परंतु कोरोनामुळे केवळ दुपारी २ वाजेपर्यंतच दुकाने उघडण्याची परवानगी आहे. त्यामुळे मोबाइलची दुरुस्ती करण्यासाठी मोबाइलच्या दुकानांत रांगा दिसून येतात. आता निर्बंध शिथिल केल्यामुळे मोबाइल दुरुस्ती करण्यासाठी लोकांची लगबग सुरू आहे. राज्य सरकारने ४ एप्रिलपासून संचारबंदी सुरू केली होती. त्यामुळे सर्वजण घरी राहू लागले. दरम्यान, वेळ घालविण्यासाठी आबालवृद्धांपासून ते ज्येष्ठांचा मोबाइल हाच एकमेव आधार होता. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन क्लासेस, नेट बँकिंग यासोबतच कोरोना रुग्णांची चौकशी करण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग आदींसाठी मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यासोबतच लसीकरण नोंदणीसाठी सर्वच जण मोबाइलचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. लॉकडाऊन कालावधीत मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सततच्या वापराने व अन्य कारणांमुळे मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड आला आहे; परंतु लॉकडाऊनमुळे सकाळी ७ ते ११ या वेळेत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. याव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद होती. त्यासोबतच ऑनलाइनने मोबाइलचे सुटे पार्ट मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे अनेकांचे मोबाइल बंद आहेत. आता जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केले. दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढले, त्यामुळे मोबाइलच्या दुकानांत गर्दी दिसून येत होती.

.......................................

कारणे काय?

-सततच्या वापरामुळे मोबाइलमध्ये बिघाड झाला. मोबाइल स्क्रीन गार्ड खराब झाले,

फोन आल्यास आपल्याला आवाज येत नाही किंवा इकडून फोन केल्यास आवाज जात नाही.

चार्जिंग केल्यावरही बॅटरी लवकर उतरते, मोबाइल पडल्याने डिस्प्ले फुटला, त्यामुळे मोबाइल वापरायोग्य नाही. ऑटोमॅटिक इतरांना फोन लागणे, टच काम न करणे आदी समस्या आहेत.

पावसाळ्यापूर्वी मोबाइलला कव्हर लावणे, मोबा्यल स्वीच ऑफ होणे, अशा विविध तक्रारी आल्या आहेत.

.............................

दोन महिने बाजारपेठ बंद

कोरोनामुळे पहिल्या लाटेत लॉकडाऊन करण्यात आले. लाट ओसरत असताना लॉकडाऊन हटविल्यानंतर काही प्रमाणात स्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र, पुन्हा दुसरी लाट आल्याने सर्व बंद करण्यात आले. त्यामुळे दोन महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद होती. त्यामुळे मोबाइल दुरुस्ती करता आली नाही. परिणामी अनेकांचे मोबाइल बंद पडले.

...................................

दोन महिने बाजारपेठ बंद

मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये व यंदाही आम्हाला आमचे मोबाइल दुकान बंद ठेवावे लागले. त्यामुळे आमचा व्यवसाय बुडाला. घर चालविणे कठीण झाले. माेबाइलधारकांच्याही समस्या वाढल्या; परंतु आमचे दुकानच बंद असल्याने हातात कवडी नाही, असे मोबाइल दुरुस्ती करणारे आमगाव येथील लोकेश बोहरे यांनी सांगितले.

...............................

मोबाइल महत्त्वाचा, पण आरोग्य

आजघडीला मोबाइल हा आपला अविभाज्य अंग झाला आहे; परंतु सततच्या वापराने मोबाइलमध्ये बिघाड झाला आहे. आता सकाळी ७ ते २ या वेळेत मोबाइल दुकानेही सुरू राहणार आहेत, त्यामुळे मोबाइल दुरुस्त करण्यासाठी मी दुकानात जाईल.

-दीपक भांडारकर, मोबाइलधारक

.........................

अनेकांचे मोबाइल बिघडल्याने दुरुस्तीसाठी दुकानात जात आहेत; परंतु गर्दी करू नये, अन्यथा पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्यास वेळ लागणार नाही. मोबाइल जरी महत्त्वाचा असला तरी आपले आयुष्य त्यापेक्षा किमती आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी करणे योग्य नाही.

- अश्वीन हुमे, मोबाइलधारक आसोली

........................

दीड वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे दुकाने बंद असल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. अनेक ग्राहक मोबाइल दुरुस्तीसाठी फोन करतात; परंतु सुटे सामान येत नसल्याने दुरुस्ती बंद आहे. आता दुकाने सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे.

-हितेश सोनवणे, मोबाइल दुकानदार आमगाव

........................

कोरोनाच्या संसर्गामुळे मोबाइल दुकान बंद होते. आजघडीला मोबाइल अत्यावश्यक सेवेत आणायला हवा. संपर्काचे प्रमुख आणि प्रभावी साधन म्हणून मोबाइल आहे. एखाद्याचा मोबाइल बिघडला, तर ते मोबाइलशिवाय राहूच शकत नाहीत.

दुरुस्तीसाठी माझ्याकडे शेकडो मोबाइल आले आहेत.

- भुमेश बागडे, मोबाइल दुकानदार पदमपूर