शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

मोबाइल बिघडला म्हणून काय झाले, आरोग्य बिघडायला नको !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:22 IST

गोंदिया : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मोबाइलचा वापर वाढला आहे. परिणामी अनेकांच्या मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे; परंतु कोरोनामुळे केवळ दुपारी ...

गोंदिया : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मोबाइलचा वापर वाढला आहे. परिणामी अनेकांच्या मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे; परंतु कोरोनामुळे केवळ दुपारी २ वाजेपर्यंतच दुकाने उघडण्याची परवानगी आहे. त्यामुळे मोबाइलची दुरुस्ती करण्यासाठी मोबाइलच्या दुकानांत रांगा दिसून येतात. आता निर्बंध शिथिल केल्यामुळे मोबाइल दुरुस्ती करण्यासाठी लोकांची लगबग सुरू आहे. राज्य सरकारने ४ एप्रिलपासून संचारबंदी सुरू केली होती. त्यामुळे सर्वजण घरी राहू लागले. दरम्यान, वेळ घालविण्यासाठी आबालवृद्धांपासून ते ज्येष्ठांचा मोबाइल हाच एकमेव आधार होता. वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन क्लासेस, नेट बँकिंग यासोबतच कोरोना रुग्णांची चौकशी करण्यासाठी व्हिडिओ कॉलिंग आदींसाठी मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. यासोबतच लसीकरण नोंदणीसाठी सर्वच जण मोबाइलचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. लॉकडाऊन कालावधीत मोबाइलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सततच्या वापराने व अन्य कारणांमुळे मोबाइलमध्ये तांत्रिक बिघाड आला आहे; परंतु लॉकडाऊनमुळे सकाळी ७ ते ११ या वेळेत केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली. याव्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद होती. त्यासोबतच ऑनलाइनने मोबाइलचे सुटे पार्ट मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे अनेकांचे मोबाइल बंद आहेत. आता जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केले. दुकाने दुपारी २ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश काढले, त्यामुळे मोबाइलच्या दुकानांत गर्दी दिसून येत होती.

.......................................

कारणे काय?

-सततच्या वापरामुळे मोबाइलमध्ये बिघाड झाला. मोबाइल स्क्रीन गार्ड खराब झाले,

फोन आल्यास आपल्याला आवाज येत नाही किंवा इकडून फोन केल्यास आवाज जात नाही.

चार्जिंग केल्यावरही बॅटरी लवकर उतरते, मोबाइल पडल्याने डिस्प्ले फुटला, त्यामुळे मोबाइल वापरायोग्य नाही. ऑटोमॅटिक इतरांना फोन लागणे, टच काम न करणे आदी समस्या आहेत.

पावसाळ्यापूर्वी मोबाइलला कव्हर लावणे, मोबा्यल स्वीच ऑफ होणे, अशा विविध तक्रारी आल्या आहेत.

.............................

दोन महिने बाजारपेठ बंद

कोरोनामुळे पहिल्या लाटेत लॉकडाऊन करण्यात आले. लाट ओसरत असताना लॉकडाऊन हटविल्यानंतर काही प्रमाणात स्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र, पुन्हा दुसरी लाट आल्याने सर्व बंद करण्यात आले. त्यामुळे दोन महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू वगळता इतर दुकाने बंद होती. त्यामुळे मोबाइल दुरुस्ती करता आली नाही. परिणामी अनेकांचे मोबाइल बंद पडले.

...................................

दोन महिने बाजारपेठ बंद

मागच्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये व यंदाही आम्हाला आमचे मोबाइल दुकान बंद ठेवावे लागले. त्यामुळे आमचा व्यवसाय बुडाला. घर चालविणे कठीण झाले. माेबाइलधारकांच्याही समस्या वाढल्या; परंतु आमचे दुकानच बंद असल्याने हातात कवडी नाही, असे मोबाइल दुरुस्ती करणारे आमगाव येथील लोकेश बोहरे यांनी सांगितले.

...............................

मोबाइल महत्त्वाचा, पण आरोग्य

आजघडीला मोबाइल हा आपला अविभाज्य अंग झाला आहे; परंतु सततच्या वापराने मोबाइलमध्ये बिघाड झाला आहे. आता सकाळी ७ ते २ या वेळेत मोबाइल दुकानेही सुरू राहणार आहेत, त्यामुळे मोबाइल दुरुस्त करण्यासाठी मी दुकानात जाईल.

-दीपक भांडारकर, मोबाइलधारक

.........................

अनेकांचे मोबाइल बिघडल्याने दुरुस्तीसाठी दुकानात जात आहेत; परंतु गर्दी करू नये, अन्यथा पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढण्यास वेळ लागणार नाही. मोबाइल जरी महत्त्वाचा असला तरी आपले आयुष्य त्यापेक्षा किमती आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी करणे योग्य नाही.

- अश्वीन हुमे, मोबाइलधारक आसोली

........................

दीड वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे दुकाने बंद असल्याने आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. अनेक ग्राहक मोबाइल दुरुस्तीसाठी फोन करतात; परंतु सुटे सामान येत नसल्याने दुरुस्ती बंद आहे. आता दुकाने सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे.

-हितेश सोनवणे, मोबाइल दुकानदार आमगाव

........................

कोरोनाच्या संसर्गामुळे मोबाइल दुकान बंद होते. आजघडीला मोबाइल अत्यावश्यक सेवेत आणायला हवा. संपर्काचे प्रमुख आणि प्रभावी साधन म्हणून मोबाइल आहे. एखाद्याचा मोबाइल बिघडला, तर ते मोबाइलशिवाय राहूच शकत नाहीत.

दुरुस्तीसाठी माझ्याकडे शेकडो मोबाइल आले आहेत.

- भुमेश बागडे, मोबाइल दुकानदार पदमपूर