शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

शासकीय नोकरी म्हणजे ‘वेठबिगारी’ आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:46 IST

शासकीय नोकरी देताना जाचक अटी लावायच्या, सेवक प्रथा कंत्राटी नोकर अशा गोंडस नावाखाली तुटपुंज्या मानधनावर कर्मचाऱ्यांकडून सारी कामे करुन घ्यायची, अनेक नावाखाली त्यांच्या वेतनातून कपात करायची आणि कर्मचाऱ्यांचे बरे वाईट झाले तर हात वर करायचे म्हणजे शासन नोकरी देते की वेठबिगार समजून जुलूम करते, असा संतप्त सवाल मृत कर्मचाऱ्याच्या ७८ वर्षीय आई पदमीनबाई आरसुळे यांनी केला आहे.

ठळक मुद्देमृत कर्मचाऱ्याच्या आईचा संतप्त सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : शासकीय नोकरी देताना जाचक अटी लावायच्या, सेवक प्रथा कंत्राटी नोकर अशा गोंडस नावाखाली तुटपुंज्या मानधनावर कर्मचाऱ्यांकडून सारी कामे करुन घ्यायची, अनेक नावाखाली त्यांच्या वेतनातून कपात करायची आणि कर्मचाऱ्यांचे बरे वाईट झाले तर हात वर करायचे म्हणजे शासन नोकरी देते की वेठबिगार समजून जुलूम करते, असा संतप्त सवाल मृत कर्मचाऱ्याच्या ७८ वर्षीय आई पदमीनबाई आरसुळे यांनी केला आहे.कर्मचाºयांच्या जीवावर उठलेल्या अंशदायी पेन्शन योजनेच्या कचाट्यात सापडून मृत पावलेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबाची व्यथा सांगताना त्यांनी लोकमत जवळ आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील धमदीटोला शाळेत कार्यरत शिक्षक बालाजी तुकाराम आरसुळे यांचे २०१२ मध्ये अपघाती निधन झाले.वडिलांचे छत्र बालपणातच हरवल्यानंतर बालाजी आरसुळे यांनी अल्पवयातच कुटुंबांची जबाबदारी सांभाळत २२ व्या वर्षी शिक्षकाची नोकरी पत्करली. त्यातही तीन वर्षे तुटपुंज्या मानधनावर काम केले.२००९ ला सेवेत कायम झाले, पण २०१२ रोजी त्याचे दु:खद निधन झाले. घरी म्हातारी आई पदमीनबाई आरसुळे (७८), भाऊ गंगाधर व बहीण मनकरणाबाई असा परिवार आहे. कुटुंबाच्या जबाबदारी शिक्षक आरसुळे यांच्यावरच होती.त्यांचे पश्चात आई सावकारी कर्ज काढून दुसºया मुलाच्या मदतीने शेतात कापसाची पेरणी करते.पण अस्मानी संकटामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर कायम आहे.लोक सेवानिवृत्त होऊन देवदर्शनाला जातात. तिथे वयोवृद्ध पदमीनबाई पोटासाठी मुलाला साथ देत शेतात राबत आहे.कर्ता मुलगा गमावला परंतु शासनाकडून याची कुठलीच दखल घेतल्या गेली नाही. ऐवढेच काय कर्मचारी आरसुळे यांच्या वेतनातून कपात झालेल्या डीसीपीएस, गटविमा व इतर रकमांचा आजवर हिशोब नाही. उतारवयात स्वत:च जीव सांभाळायचा की शासकीय कार्यालयाच्या येरझºया मारायच्या असा यक्षप्रश्न तिच्यापुढे उभा आहे.कायद्यातील तरतुदींचे उल्लंघनवेठबिगार म्हणजे निराधार, दुर्बल, असंघटित व्यक्तीस योग्य मोबदला न देता राबवून घेणे त्या त्याकाळात त्यास इतरच काम करण्यास मनाई करणे,त्यास वेठीस धरुन बिगारासारखे काम करणे म्हणजे वेठ बिगार होय.भारतीय संविधान कलम २३ नुसार वेठ बिगारी बेकायदा ठरविण्यात आली असून वीस कलमी कार्यक्रमात वेठबिगार निर्मूलन व पुनर्वसनाचे निर्देश दिले आहेत.कुटुंब निवृत्ती वेतन लागू करावेशासकीय सेवेत असलेला मुलगा दगावल्यानंतरही शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.शासनाने याकडे लक्ष देवून वेतनातून कपात रक्कम व्याजासह द्यावी व कुटुंबीयांना कुटुंबनिवृत्ती वेतन लागू करावे.-पदमीनबाई आरसुळेमृत कर्मचाºयांची आई

टॅग्स :Governmentसरकार