शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय नोकरी म्हणजे ‘वेठबिगारी’ आहे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:46 IST

शासकीय नोकरी देताना जाचक अटी लावायच्या, सेवक प्रथा कंत्राटी नोकर अशा गोंडस नावाखाली तुटपुंज्या मानधनावर कर्मचाऱ्यांकडून सारी कामे करुन घ्यायची, अनेक नावाखाली त्यांच्या वेतनातून कपात करायची आणि कर्मचाऱ्यांचे बरे वाईट झाले तर हात वर करायचे म्हणजे शासन नोकरी देते की वेठबिगार समजून जुलूम करते, असा संतप्त सवाल मृत कर्मचाऱ्याच्या ७८ वर्षीय आई पदमीनबाई आरसुळे यांनी केला आहे.

ठळक मुद्देमृत कर्मचाऱ्याच्या आईचा संतप्त सवाल

लोकमत न्यूज नेटवर्कवडेगाव : शासकीय नोकरी देताना जाचक अटी लावायच्या, सेवक प्रथा कंत्राटी नोकर अशा गोंडस नावाखाली तुटपुंज्या मानधनावर कर्मचाऱ्यांकडून सारी कामे करुन घ्यायची, अनेक नावाखाली त्यांच्या वेतनातून कपात करायची आणि कर्मचाऱ्यांचे बरे वाईट झाले तर हात वर करायचे म्हणजे शासन नोकरी देते की वेठबिगार समजून जुलूम करते, असा संतप्त सवाल मृत कर्मचाऱ्याच्या ७८ वर्षीय आई पदमीनबाई आरसुळे यांनी केला आहे.कर्मचाºयांच्या जीवावर उठलेल्या अंशदायी पेन्शन योजनेच्या कचाट्यात सापडून मृत पावलेल्या कर्मचाºयांच्या कुटुंबाची व्यथा सांगताना त्यांनी लोकमत जवळ आपल्या अश्रूंना वाट मोकळी केली. गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील धमदीटोला शाळेत कार्यरत शिक्षक बालाजी तुकाराम आरसुळे यांचे २०१२ मध्ये अपघाती निधन झाले.वडिलांचे छत्र बालपणातच हरवल्यानंतर बालाजी आरसुळे यांनी अल्पवयातच कुटुंबांची जबाबदारी सांभाळत २२ व्या वर्षी शिक्षकाची नोकरी पत्करली. त्यातही तीन वर्षे तुटपुंज्या मानधनावर काम केले.२००९ ला सेवेत कायम झाले, पण २०१२ रोजी त्याचे दु:खद निधन झाले. घरी म्हातारी आई पदमीनबाई आरसुळे (७८), भाऊ गंगाधर व बहीण मनकरणाबाई असा परिवार आहे. कुटुंबाच्या जबाबदारी शिक्षक आरसुळे यांच्यावरच होती.त्यांचे पश्चात आई सावकारी कर्ज काढून दुसºया मुलाच्या मदतीने शेतात कापसाची पेरणी करते.पण अस्मानी संकटामुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर कायम आहे.लोक सेवानिवृत्त होऊन देवदर्शनाला जातात. तिथे वयोवृद्ध पदमीनबाई पोटासाठी मुलाला साथ देत शेतात राबत आहे.कर्ता मुलगा गमावला परंतु शासनाकडून याची कुठलीच दखल घेतल्या गेली नाही. ऐवढेच काय कर्मचारी आरसुळे यांच्या वेतनातून कपात झालेल्या डीसीपीएस, गटविमा व इतर रकमांचा आजवर हिशोब नाही. उतारवयात स्वत:च जीव सांभाळायचा की शासकीय कार्यालयाच्या येरझºया मारायच्या असा यक्षप्रश्न तिच्यापुढे उभा आहे.कायद्यातील तरतुदींचे उल्लंघनवेठबिगार म्हणजे निराधार, दुर्बल, असंघटित व्यक्तीस योग्य मोबदला न देता राबवून घेणे त्या त्याकाळात त्यास इतरच काम करण्यास मनाई करणे,त्यास वेठीस धरुन बिगारासारखे काम करणे म्हणजे वेठ बिगार होय.भारतीय संविधान कलम २३ नुसार वेठ बिगारी बेकायदा ठरविण्यात आली असून वीस कलमी कार्यक्रमात वेठबिगार निर्मूलन व पुनर्वसनाचे निर्देश दिले आहेत.कुटुंब निवृत्ती वेतन लागू करावेशासकीय सेवेत असलेला मुलगा दगावल्यानंतरही शासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.शासनाने याकडे लक्ष देवून वेतनातून कपात रक्कम व्याजासह द्यावी व कुटुंबीयांना कुटुंबनिवृत्ती वेतन लागू करावे.-पदमीनबाई आरसुळेमृत कर्मचाºयांची आई

टॅग्स :Governmentसरकार