शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

गोंदिया-बल्लारशा पँसेजर सुरू करून फायदा काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:31 IST

मंगळवारपासून गोंदिया रेल्वेस्थानकावरून गोंदिया-बल्लारशा गाडी सकाळी ७.४० सुटणार आहे, तर बल्लारशावरून हीच गाडी परत दुपारी २.४० ला सुटणार आहे. ...

मंगळवारपासून गोंदिया रेल्वेस्थानकावरून गोंदिया-बल्लारशा गाडी सकाळी ७.४० सुटणार आहे, तर बल्लारशावरून हीच गाडी परत दुपारी २.४० ला सुटणार आहे. मात्र, गोंदियावरून बल्लारशाला सकाळी जाणे सोयीचे होणार असले तरी याच गाडीने जाऊन आपली कामे करून परत येण्यासाठी गाडी नसणार आहे. तर बल्लारशावरून सकाळी ६.३० वाजता सुटणारी गाडी सुरू करण्यात आली नाही. त्यामुळे गोंदियाला सकाळी येऊन परत जाण्यासाठीसुद्धा प्रवाशांना कुठलीच गाडी असणार नाही. त्यामुळे ही गाडी दोन्ही जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी त्रासदायकच ठरणार आहे. जेव्हापर्यंत बल्लारशाहून सकाळी ६.३० गोंदियासाठी गाडी सुरू होणार नाही आणि गोंदियावरून सायंकाळी ५ वाजता बल्लारशाकडे जाण्यासाठी पँसेजर गाडी सुरू होणार नाही. तेव्हापर्यंत या गाडीचा दोन्ही जिल्ह्यांतील रेल्वे प्रवाशांना कुठलाच फायदा होणार नाही. त्यामुळे दोन्हीकडे जाण्यासाठी पूर्वीप्रमाणेच रेल्वे गाड्या सुरू करण्याची गरज आहे. तरच हे दोन्ही जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी सोयीचे होईल, अन्यथा ही गाडी सुरू करून कुठलाच फायदा होणार नाही.

................

गोंदिया-जबलपूर गाडी सुरू करा

रेल्वे विभागाने हळूहळू सर्वच गाड्या सुरू केल्या असल्या तरी अद्यापही गोंदिया-जबलपूर गाडी सुरू केली नाही. ही गाडी सुरू न करण्यासाठी ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांचा दबाब असल्याची चर्चा आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात ट्रॅव्हल्स सुरू असून गोंदिया ते जबलपूरसाठी ४०० रुपये प्रवास भाडे द्यावे लागते, तर रेल्वेने यासाठी केवळ १०० रुपये लागतात. रेल्वे गाडी सुरू झाल्यास ट्रॅव्हल्स व्यावसायिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच ही गाडी सुरू केल्या जात नसल्याची माहिती आहे.