शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांचा बळी गेल्यानंतर जनजागृती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:17 IST

परवानगी नसलेल्या कंपन्याच्या कीटकनाशक फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांचा नाहक बळी गेला.

ठळक मुद्देमकरंद अनासपुरे : यवतमाळची घटना दुर्देवी

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : परवानगी नसलेल्या कंपन्याच्या कीटकनाशक फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकºयांचा नाहक बळी गेला. त्यानंतर शासन आणि प्रशासनाला या घटनेचे गांभीर्य कळले. यानंतर त्यांनी कीटकनाशक फवारणी करताना कुठली काळजी घ्यायची यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली. मात्र हेच आधी केले असते तर शेतकºयांचा जीव गेला नसता. हे शासन आणि प्रशासनाचे नाकर्तेपण असल्याची टीका सिनेअभिनेते व नाम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मकरंद अनासपुरे यांनी रविवारी येथे केली.गोंदिया येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. यवतमाळ येथील घटनेकडे शासन आणि प्रशासनाने गांभीर्याने बघितले नाही. जी काळजी प्रशासन आता घेत आहे, ती आधीच घेतली असती तर शेतकºयांच्या कुटुंबांवर हे संकट ओढवले नसते. कीटकनाशक फवारणीमुळे २० ते २५ शेतकºयांचा जीव गेल्यानंतर जर प्रशासनाला जाग येत असेल तर हे दुर्देवच म्हणावे लागेल. आधीच या जिल्ह्यातील शेतकरी सततची नापिकी आणि कर्जामुळे हताश आहेत. त्यातच पिकांवरील कीडरोग नियंत्रणात आणण्यासाठी फवारणी केल्याने जीव गमवावा लागत आहे. हे दोन्ही चित्र फार दुर्देवी आहे. प्रशासनाने या घटनेचे वेळीच गांभीर्य ओळखून उपाय योजना करण्याची गरज होती, असेही ते म्हणाले.सरकारच्या नाकर्तेपणामुळेच शेतकरी आत्महत्यालागवड खर्चाच्या तुलनेत अद्यापही शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. परिणामी शेतकºयांवरील कर्जात सातत्याने वाढ होते. त्यातच बाजारपेठेतील दलालांकडून शेतकºयांचे आर्थिक शोषण केले जात आहे. जोपर्यंत या सर्व गोष्टींचे चित्र बदलणार नाही. तोपर्यंत शेतकरी समृद्ध आणि सुखी होणार आहे. शेतकरी विरोधी धोरणे आणि धारणेमुळेच शेतकºयांची आज ही स्थिती आहे. शेतकरी आत्महत्या या सरकारच्या नाकर्तेपणामुळेच होत असल्याचा आरोप अनासपुरे यांनी केला.