शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:33 IST

गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे बारावीची परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. आताही कोरोना संकट कायमच आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा ...

गोंदिया : कोरोनाच्या संसर्गामुळे बारावीची परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आली. आताही कोरोना संकट कायमच आहे. त्यामुळे बारावीची परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. परीक्षेवर काय पर्याय होऊ शकतो याची चाचपणी शिक्षण विभाग व शासन करीत आहे. काहीही करा; पण एकदाचा निर्णय घ्यावा, असा सूर विद्यार्थ्यांतून उमटत आहे.

बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातीलर टर्निंग पाॅइंट असतो. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट आल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रथम ऑनलाइन अभ्यासक्रम करावा लागला. त्यानंतर काही दिवसांनी काॅलेज सुरू झाले. मात्र नियमित वर्ग भरलेच नसल्याने अनेकांच्या डोक्यावरून अभ्यासक्रम गेला. त्यातच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची स्थिती बिकट आहे. अनेकांकडे स्मार्ट फोन नव्हते तर काहींच्या गावामध्ये नेटवर्क समस्या कायमचीच होती. त्यामुळे काय करावे, हा संभ्रम विद्यार्थ्यांना कायम होता. त्यातच परीक्षेची तारीख जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात गती घेतली. मात्र दोन वेळा परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा उत्साह गेला. आता तर अनेकांना काय शिकलो हेसुद्धा आठवत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे सामाईक परीक्षेचा पर्याय शासनाने निवडावा, अशी काहींची मागणी आहे. मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना पास करता येते का यावर शिक्षणतज्ज्ञांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत.

................

जिल्ह्यातील बारावीचे एकूण विद्यार्थी- २०,८५६

मूले- १०,६२७

मुली- १०,२२९

.................

काय असू शकतो पर्याय

शाळा स्तरावर परीक्षेचे आयोजन करण्यास हरकत नाही. एका वर्गात जास्तीत जास्त बारा ते १५ विद्यार्थी बसायला हवेेत. परीक्षेपूर्वी शाळा निर्जंतुक करावी, शिक्षकांना फेसशिल्ड, हॅण्डग्लोज व लसीकरण अनिवार्य असावे. शक्यतो विद्यार्थ्यांचेही लसीकरण करावे व सर्वांना सर्जिकल मास्क पुरवावे. आजारी विद्यार्थ्यांबाबत शासनाने योग्य धोरण ठरवावे. बारावीनंतरचे प्रवेश आणि इतर सर्व प्रक्रियांसाठी परीक्षा घेणे गरजेचे आहे.

- मिलिंद रंगारी, शिक्षणतज्ज्ञ

........................

मागील वर्षापासून कोरोनाच्या संसर्गामुळे बारावीची परीक्षा लांबली आहे. यासंदर्भात आता शासनस्तरावर विचारविर्मश केला जात आहे. कोरोनाकाळात परीक्षा घेण्यापेक्षा दहावी, अकरावी आणि बारावीच्या प्रात्याक्षिकांतून विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनानुसार गुणानुसार पुढच्या वर्गासाठी गुणदान करावे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

- सुशील पाऊलझगडे, शिक्षणतज्ज्ञ

...................................................

मागील वर्षभरापासून कोरोनामुळे ग्रामीण भागात तर परिस्थिती वेगळी आहे. कोरोनामुळे शाळा, काॅलेज भरले नाही. त्यामुळे अभ्यासक्रम व्यवस्थित झाला नाही. आता सर्वच विद्यार्थी अभ्यासक्रमही विसरले आहेत. त्यामुळे परीक्षा न घेता सर्व विद्यार्थ्यांना सरसकट पास करावे. म्हणजे, कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही.

- विनायक गायधने, शिक्षणतज्ज्ञ

.....................................................

विद्यार्थी संभ्रमात

यावर्षी ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केला. कोरोना संकटामुळे काॅलेज पाहिजे त्या प्रमाणात झाले नाही. दिवाळीनंतर परीक्षेची चांगली तयारी केली. मात्र पुन्हा कोरोना संकटामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता जून महिना येत असतानाही परीक्षा झाल्या नाही. आम्हाला शिक्षण विभागाने संभ्रमात ठेवू नये.

- राकेश नेवारे, विद्यार्थी

...................................

कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद होत्या तरीही शिक्षकांनी भरपूर मेहनत घेत ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यासक्रम पूर्ण केला. परीक्षेची तारीखही निश्चित झाली होती. कोरोनामुळे परीक्षा झाली नाही. दोन वेळा तारीख पुढे ढकलली. त्यामुळे अभ्यास करणे कंटाळवाणे झाले आहे.

- अक्षय काकडे, विद्यार्थी

............................................

कोरोनामुळे आमचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. शिक्षण विभागाने सीईटी तसेच सामाईक परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर करावे. त्यानुसार पुढील वर्गातील प्रवेश घेताना अडचण जाणार नाही. मात्र याबाबत निर्णय त्वरित घ्यावा. यामुळे विद्यार्थ्यांची अडचण दूर होईल.

- नंदिता पाऊलझगडे, विद्यार्थिनी.