शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

वनविभागाच्या ‘चित्ररथाचे’ स्वागत

By admin | Updated: May 8, 2017 01:05 IST

पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्याबरोबरच मानवाला निसर्गाचा आनंद लुटता यावा, गावागावांत हिरवे रान तयार व्हावे,

ग्रामस्थांमध्ये जागृती : ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट;पर्यावरणाच्या संतुलनावर भर लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्याबरोबरच मानवाला निसर्गाचा आनंद लुटता यावा, गावागावांत हिरवे रान तयार व्हावे, गावकऱ्यांना वृक्षांबद्दल आवड निर्माण होऊन वृक्ष संगोपनासाठी त्यांनी पुढे यावे, सामान्य जनतेमध्ये वृक्षासंबंधी जागृती होण्याच्या हेतूने राज्याच्या वनविभागाच्यावतीने आकर्षक चित्ररथाचे भ्रमण करण्यात येत आहे. वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगाव येथे चित्ररथाचे आगमन होताच अर्जुनीवासीयांकडून मनापासून स्वागत करण्यात आले. येत्या १ जुलै ते ७ जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र चार कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जनतेमध्ये वृक्षसंगोपनाबद्दल आकर्षण वाढावे या मनीषेतून आकर्षक वाहनात तयार केलेल्या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा उपक्रम वनविभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. वनविभागाच्या कार्यालयात चित्ररथाचे आगमन झाल्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला तहसीलदार डी.सी. बोंबर्डे, पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, नवेगावबांधचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी व्ही.जी. उदापुरे, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, वनपरिक्षेत्राधिकारी छत्रपाल रहांगडाले, सामाजिक वनीकरणाचे लागवड अधिकारी पडोळे, प्राध्यापक शरद मेश्राम, क्षेत्र सहायक दखने, दहिवले, पंधरे प्रामुख्याने उपस्थित होते. वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात आलेल्या चित्ररथाचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतानी तहसीलदार बोंबर्डे म्हणाले की, वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. तालुक्याच्या वतीने सर्व यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. वनपरिक्षेत्राधिकारी रहांगडाले यांनी वनांची महती विशद करताना सांगितले की, दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. उन्हाची दाहकता वाढत आहे. पर्यावरणाचग संतुलन ढासळत आहे. या बाबीवर मात करण्यासाठी वनांचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. गावागावात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. वृक्षांना आपले सगे-सोयरे समजून त्यांच्यावर प्रेम करणे आवश्यक आहे. येत्या १ जुलैच्या वनमहोत्सवात सहभागी होऊन विक्रमी वृक्ष लागवड करण्यचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. चित्ररथाद्वारे करण्यात येणाऱ्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाची जबाबदारी तयार होईल व हिरवे वातावरण निर्माण करणे सोईचे होईल, हा यामागे हेतू आहे. याप्रसंगी कर्मचारी, शालेय विद्यार्थी, वनसमितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.