शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

वनविभागाच्या ‘चित्ररथाचे’ स्वागत

By admin | Updated: May 8, 2017 01:05 IST

पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्याबरोबरच मानवाला निसर्गाचा आनंद लुटता यावा, गावागावांत हिरवे रान तयार व्हावे,

ग्रामस्थांमध्ये जागृती : ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट;पर्यावरणाच्या संतुलनावर भर लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्याबरोबरच मानवाला निसर्गाचा आनंद लुटता यावा, गावागावांत हिरवे रान तयार व्हावे, गावकऱ्यांना वृक्षांबद्दल आवड निर्माण होऊन वृक्ष संगोपनासाठी त्यांनी पुढे यावे, सामान्य जनतेमध्ये वृक्षासंबंधी जागृती होण्याच्या हेतूने राज्याच्या वनविभागाच्यावतीने आकर्षक चित्ररथाचे भ्रमण करण्यात येत आहे. वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगाव येथे चित्ररथाचे आगमन होताच अर्जुनीवासीयांकडून मनापासून स्वागत करण्यात आले. येत्या १ जुलै ते ७ जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र चार कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जनतेमध्ये वृक्षसंगोपनाबद्दल आकर्षण वाढावे या मनीषेतून आकर्षक वाहनात तयार केलेल्या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा उपक्रम वनविभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. वनविभागाच्या कार्यालयात चित्ररथाचे आगमन झाल्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला तहसीलदार डी.सी. बोंबर्डे, पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, नवेगावबांधचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी व्ही.जी. उदापुरे, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, वनपरिक्षेत्राधिकारी छत्रपाल रहांगडाले, सामाजिक वनीकरणाचे लागवड अधिकारी पडोळे, प्राध्यापक शरद मेश्राम, क्षेत्र सहायक दखने, दहिवले, पंधरे प्रामुख्याने उपस्थित होते. वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात आलेल्या चित्ररथाचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतानी तहसीलदार बोंबर्डे म्हणाले की, वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. तालुक्याच्या वतीने सर्व यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. वनपरिक्षेत्राधिकारी रहांगडाले यांनी वनांची महती विशद करताना सांगितले की, दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. उन्हाची दाहकता वाढत आहे. पर्यावरणाचग संतुलन ढासळत आहे. या बाबीवर मात करण्यासाठी वनांचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. गावागावात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. वृक्षांना आपले सगे-सोयरे समजून त्यांच्यावर प्रेम करणे आवश्यक आहे. येत्या १ जुलैच्या वनमहोत्सवात सहभागी होऊन विक्रमी वृक्ष लागवड करण्यचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. चित्ररथाद्वारे करण्यात येणाऱ्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाची जबाबदारी तयार होईल व हिरवे वातावरण निर्माण करणे सोईचे होईल, हा यामागे हेतू आहे. याप्रसंगी कर्मचारी, शालेय विद्यार्थी, वनसमितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.