शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
4
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
5
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
6
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
7
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
8
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
9
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
10
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
11
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
12
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
13
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
14
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
15
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
16
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
17
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
18
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
19
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
20
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले

वनविभागाच्या ‘चित्ररथाचे’ स्वागत

By admin | Updated: May 8, 2017 01:05 IST

पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्याबरोबरच मानवाला निसर्गाचा आनंद लुटता यावा, गावागावांत हिरवे रान तयार व्हावे,

ग्रामस्थांमध्ये जागृती : ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट;पर्यावरणाच्या संतुलनावर भर लोकमत न्यूज नेटवर्क बोंडगावदेवी : पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्याबरोबरच मानवाला निसर्गाचा आनंद लुटता यावा, गावागावांत हिरवे रान तयार व्हावे, गावकऱ्यांना वृक्षांबद्दल आवड निर्माण होऊन वृक्ष संगोपनासाठी त्यांनी पुढे यावे, सामान्य जनतेमध्ये वृक्षासंबंधी जागृती होण्याच्या हेतूने राज्याच्या वनविभागाच्यावतीने आकर्षक चित्ररथाचे भ्रमण करण्यात येत आहे. वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय अर्जुनी-मोरगाव येथे चित्ररथाचे आगमन होताच अर्जुनीवासीयांकडून मनापासून स्वागत करण्यात आले. येत्या १ जुलै ते ७ जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र चार कोटी वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जनतेमध्ये वृक्षसंगोपनाबद्दल आकर्षण वाढावे या मनीषेतून आकर्षक वाहनात तयार केलेल्या चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा उपक्रम वनविभागाच्या वतीने राबविण्यात येत आहे. वनविभागाच्या कार्यालयात चित्ररथाचे आगमन झाल्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला तहसीलदार डी.सी. बोंबर्डे, पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर, नवेगावबांधचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी व्ही.जी. उदापुरे, पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, वनपरिक्षेत्राधिकारी छत्रपाल रहांगडाले, सामाजिक वनीकरणाचे लागवड अधिकारी पडोळे, प्राध्यापक शरद मेश्राम, क्षेत्र सहायक दखने, दहिवले, पंधरे प्रामुख्याने उपस्थित होते. वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयात आलेल्या चित्ररथाचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतानी तहसीलदार बोंबर्डे म्हणाले की, वृक्ष लागवड करुन त्यांचे संगोपन करणे आवश्यक आहे. तालुक्याच्या वतीने सर्व यंत्रणेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. वनपरिक्षेत्राधिकारी रहांगडाले यांनी वनांची महती विशद करताना सांगितले की, दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. उन्हाची दाहकता वाढत आहे. पर्यावरणाचग संतुलन ढासळत आहे. या बाबीवर मात करण्यासाठी वनांचे प्रमाण वाढणे गरजेचे आहे. गावागावात वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. वृक्षांना आपले सगे-सोयरे समजून त्यांच्यावर प्रेम करणे आवश्यक आहे. येत्या १ जुलैच्या वनमहोत्सवात सहभागी होऊन विक्रमी वृक्ष लागवड करण्यचा आशावाद त्यांनी व्यक्त केला. चित्ररथाद्वारे करण्यात येणाऱ्या जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये वृक्ष लागवड व वृक्ष संगोपनाची जबाबदारी तयार होईल व हिरवे वातावरण निर्माण करणे सोईचे होईल, हा यामागे हेतू आहे. याप्रसंगी कर्मचारी, शालेय विद्यार्थी, वनसमितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.