शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
4
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
5
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
6
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
7
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
8
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
9
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
10
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
11
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
12
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
13
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
14
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
15
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
16
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
17
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
18
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
19
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
20
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

स्वागताधिकारी कार्यालय ठरले शोभेचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:50 IST

येथील राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुलाची जवाबदारी सांभाळण्यासाठी असलेले स्वागताधिकारी कार्यालय शोभेची वास्तू ठरत आहे. येथे लॉगहट विश्रामगृहाच्या देखभालीसाठी वन्यजीव विभागाच्या ११ कर्मचाºयांची फौज तैनात आहे.

ठळक मुद्देगरज नसतानाही क र्मचाऱ्यांची फौज : कर्मचाऱ्यांच्या पगारावर नाहक कोट्यवधींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुलाची जवाबदारी सांभाळण्यासाठी असलेले स्वागताधिकारी कार्यालय शोभेची वास्तू ठरत आहे. येथे लॉगहट विश्रामगृहाच्या देखभालीसाठी वन्यजीव विभागाच्या ११ कर्मचाºयांची फौज तैनात आहे. यातून स्वागताधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांवर वेतनासह वर्षाला कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होत आहे. पर्यटन संकुलाचीच दुरवस्था झाल्याने या कार्यालयाचा अट्टाहास कशाला? असा प्रश्न नवेगावबांध फाऊंडेशनचे उपस्थित केला आहे.या पर्यटन संकुल परिसरात सन १९७५ ते १९९१ पर्यंत प्राणी संग्रहालय व त्यानंतर अनाथालय अस्तित्वात होते. सन १९९१ नंतर या अनाथालयातील प्राण्यांची सुटका करुन त्यांना राखीव जंगलात सोडण्यात आले. सन २०१२ पर्यंत या अनाथालयात दोन बिबट असल्याने चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. सन २०१२ नंतर वन्यजीव संरक्षण विभागाने पर्यटन संकुल परिसरातील लॉगहट विश्रामगृह वगळून डॉरमेंट्री, हॉलीडे होम, प्राणी अनाथालय परिसर, संजयकुटी विश्रामगृह, हिलटॉप गार्डन, बालोद्यान, तंबू निवास, मनोहर उडान हे सर्व वनविकास महामंडळाला हस्तांतरित केले.त्यामुळे सन २०१२ नंतर वन्यजीव संरक्षण विभागाकडे एकमेव लॉगहट विश्रामगृह उरले होते. त्यामुळे इतके कर्मचारी व एका स्वतंत्र कार्यालयाची गरजच काय? असे म्हणण्याची पाळी आता आली आहे. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना काही कामच नसल्यामुळे सुस्त झाले असून स्वागताधिकारी कार्यालय शोभेचा पांढरा हत्ती ठरला आहे. दुसरीकडे वन्यजीव संरक्षण विभागाच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या राष्ट्रीय उद्यान संरक्षीत विभागात अनेक पदे रिक्त आहेत. तेथील कार्यरत कर्मचारी व अधिकाºयांना अतिरिक्त कार्यभार सांभाळतांना तारेवरची कसरत करावी लागते.तर एक स्वागताधिकारी, दोन वनरक्षक, एक स्वयंपाकी, दोन माळी व चार चतुर्थश्रेणी कर्मचारी यांच्या वेतनावर वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करुन यांचे लाड पुरविले जातात. यावर फाऊंडेशनने तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. एक बालोद्यान सोडले तर संपूर्ण पर्यटन संकुलाची दुरवस्था झाली आहे. शासन कर्मचाºयांच्या पगारावर कोट्यावधींचा खर्च करतो तर विकासाकडे दुर्लक्ष होत आहे.या कार्यालयाद्वारे विश्रामगृहाची डागडुजी करणे, संजयकुटी डॉरमेंट्री व लॉगहट या विश्रामगृहांचे आॅफलाईन बुकींग करणे तसेच या कार्यालयातील कर्मचाºयांचे वेतन काढणे एवढेच काम आहे. विश्रामगृहाच्या डागडुजीचे कामही आता राष्ट्रीय उद्यान (संरक्षण) विभागच करीत आहे.सदानंद अवगानवनक्षेत्राधिकारी, स्वागताधिकारी कार्यालय राष्ट्रीय उड्डान पर्यटन संकूल नवेगावबांध

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य