शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

स्वागताधिकारी कार्यालय ठरले शोभेचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 23:50 IST

येथील राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुलाची जवाबदारी सांभाळण्यासाठी असलेले स्वागताधिकारी कार्यालय शोभेची वास्तू ठरत आहे. येथे लॉगहट विश्रामगृहाच्या देखभालीसाठी वन्यजीव विभागाच्या ११ कर्मचाºयांची फौज तैनात आहे.

ठळक मुद्देगरज नसतानाही क र्मचाऱ्यांची फौज : कर्मचाऱ्यांच्या पगारावर नाहक कोट्यवधींचा खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील राष्ट्रीय उद्यान पर्यटन संकुलाची जवाबदारी सांभाळण्यासाठी असलेले स्वागताधिकारी कार्यालय शोभेची वास्तू ठरत आहे. येथे लॉगहट विश्रामगृहाच्या देखभालीसाठी वन्यजीव विभागाच्या ११ कर्मचाºयांची फौज तैनात आहे. यातून स्वागताधिकारी कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांवर वेतनासह वर्षाला कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी होत आहे. पर्यटन संकुलाचीच दुरवस्था झाल्याने या कार्यालयाचा अट्टाहास कशाला? असा प्रश्न नवेगावबांध फाऊंडेशनचे उपस्थित केला आहे.या पर्यटन संकुल परिसरात सन १९७५ ते १९९१ पर्यंत प्राणी संग्रहालय व त्यानंतर अनाथालय अस्तित्वात होते. सन १९९१ नंतर या अनाथालयातील प्राण्यांची सुटका करुन त्यांना राखीव जंगलात सोडण्यात आले. सन २०१२ पर्यंत या अनाथालयात दोन बिबट असल्याने चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली होती. सन २०१२ नंतर वन्यजीव संरक्षण विभागाने पर्यटन संकुल परिसरातील लॉगहट विश्रामगृह वगळून डॉरमेंट्री, हॉलीडे होम, प्राणी अनाथालय परिसर, संजयकुटी विश्रामगृह, हिलटॉप गार्डन, बालोद्यान, तंबू निवास, मनोहर उडान हे सर्व वनविकास महामंडळाला हस्तांतरित केले.त्यामुळे सन २०१२ नंतर वन्यजीव संरक्षण विभागाकडे एकमेव लॉगहट विश्रामगृह उरले होते. त्यामुळे इतके कर्मचारी व एका स्वतंत्र कार्यालयाची गरजच काय? असे म्हणण्याची पाळी आता आली आहे. या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना काही कामच नसल्यामुळे सुस्त झाले असून स्वागताधिकारी कार्यालय शोभेचा पांढरा हत्ती ठरला आहे. दुसरीकडे वन्यजीव संरक्षण विभागाच्या नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या राष्ट्रीय उद्यान संरक्षीत विभागात अनेक पदे रिक्त आहेत. तेथील कार्यरत कर्मचारी व अधिकाºयांना अतिरिक्त कार्यभार सांभाळतांना तारेवरची कसरत करावी लागते.तर एक स्वागताधिकारी, दोन वनरक्षक, एक स्वयंपाकी, दोन माळी व चार चतुर्थश्रेणी कर्मचारी यांच्या वेतनावर वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करुन यांचे लाड पुरविले जातात. यावर फाऊंडेशनने तिव्र नाराजी व्यक्त केली आहे. एक बालोद्यान सोडले तर संपूर्ण पर्यटन संकुलाची दुरवस्था झाली आहे. शासन कर्मचाºयांच्या पगारावर कोट्यावधींचा खर्च करतो तर विकासाकडे दुर्लक्ष होत आहे.या कार्यालयाद्वारे विश्रामगृहाची डागडुजी करणे, संजयकुटी डॉरमेंट्री व लॉगहट या विश्रामगृहांचे आॅफलाईन बुकींग करणे तसेच या कार्यालयातील कर्मचाºयांचे वेतन काढणे एवढेच काम आहे. विश्रामगृहाच्या डागडुजीचे कामही आता राष्ट्रीय उद्यान (संरक्षण) विभागच करीत आहे.सदानंद अवगानवनक्षेत्राधिकारी, स्वागताधिकारी कार्यालय राष्ट्रीय उड्डान पर्यटन संकूल नवेगावबांध

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य