शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

थकबाकीच्या नावाखाली भारनियमन

By admin | Updated: November 15, 2014 01:49 IST

ग्राहकांकडे थकबाकी असल्याची बतावनी करुन साखरीटोला (सातगाव) केंद्रांतर्गत भारनियमन सुरु केल्याने केंद्रांतर्गत गावातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

साखरीटोला : ग्राहकांकडे थकबाकी असल्याची बतावनी करुन साखरीटोला (सातगाव) केंद्रांतर्गत भारनियमन सुरु केल्याने केंद्रांतर्गत गावातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्युत विभागाविषयी नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. फिडरवरील भारनियम त्वरीत बंद करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. काही दिवसांपुर्वी येथील गावकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी उपअभियंता यांची भेट घेऊन गाव भारनियमन मुक्त करावे या संदर्भात निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते कि सहा महिन्यांत साखरीटोला गावाला भारनियमन मुक्त करण्यात येईल. परंतु वेळ लोटून सुद्धा गाव भारनियमन मुक्त करण्यात आले नाही. साखरीटोला (पावर हाऊस) विद्युत केंद्राशी संलग्न तीन फिडर आहेत. त्यात साखरीटोला, हेटीटोला, सोनेखारी यापैकी केवळ साकरीटोला फिडरवर भारनियमन सुरु करण्यात आले. यात साखरीटोला, सातगाव, कन्हारटोला, सलंगटोला, रामपूर, पानगाव, अजोंरा, दागोटोला, या गावांना भारनियमनाचा तडाखा सहन करण्याची पाळी आली आहे. यात सकाळी ६ ते ९ व दुपारी ३ ते ६ पर्यंत भारनियमन करण्यात येते, ज्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.मात्र सदर विद्युत केंद्रातील हेटीटोला व सोनेखारी फिडरला भारनियमन नाही. मग साखरीटोला फिडरलाच भारनियमन का लादण्यात आले असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. याविषयी प्रभारी शाखा अभियंता घोरमारे यांना विचारणा केली असता त्यांनी सदर फिडरचे भारनियम विभागीय कार्यालयाच्या निर्देशानुसार थकबाकीदार अधीक असलेल्या गावांना लादण्यात येते. साखरीटोला फिडर केंद्रात थकबाकीदारांची संख्या अधिक असल्याची बतावणी करुन भारनियमन लादण्यात आल्याचे सांगितले.विद्युत विभागाच्या अफलातुन कारभाराविषयी जनतेने नाराजी व्यक्त केली आहे. जे ग्राहक नियमित विद्युत बिलाचा भरणा करतात त्यांचा विचार का केला जात नाही. ग्राहकाने विद्युत बिल वेळेवर भरले नाही तर विद्युत विभागाचे कर्मचारी त्वरीतच त्या ग्राहकांचा विज पुरवठा खंडीत करतात. विद्युत पुरवठा खंडीत केला जाऊ नये म्हणून विज बिल वेळेवर भरले जाते. याचा अर्थ असा की, विद्युत विभागाचे अधिकारी चुकिची माहिती देऊन साखरीटोलावासीयांना नाहक त्रास देत आहेत. भारनियमनामुळे जनता त्रासली असून लादण्यात आलेले भारनियम त्वरीत बंद करण्यात आले नाही तर साकरीटोलावासी रस्त्यावर उतरुन आंदोलन करुन शकतात असा इशारा रमेश चुटे, प्रभाकर दोनोडे, डॉ. संजय देशमुख, डॉ. अजय उमाटे, सुनिल अग्रवाल, संतोष शहारे, संतोष बोहरे, अश९ाक मेहर, अरविंद गजभिये, संजय कुसराम, राजू काडे, सागर काटेखाये, प्रकाश दोनोडे, पृथ्वीराज शिवनकर, किसन चकोले, बबलू लांजेवार, प्रदिप अग्रवाल यांनी दिला आहे.