शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

थकबाकीच्या नावाखाली भारनियमन

By admin | Updated: November 15, 2014 01:49 IST

ग्राहकांकडे थकबाकी असल्याची बतावनी करुन साखरीटोला (सातगाव) केंद्रांतर्गत भारनियमन सुरु केल्याने केंद्रांतर्गत गावातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

साखरीटोला : ग्राहकांकडे थकबाकी असल्याची बतावनी करुन साखरीटोला (सातगाव) केंद्रांतर्गत भारनियमन सुरु केल्याने केंद्रांतर्गत गावातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे विद्युत विभागाविषयी नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे. फिडरवरील भारनियम त्वरीत बंद करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. काही दिवसांपुर्वी येथील गावकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने वीज वितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता आणि कार्यकारी उपअभियंता यांची भेट घेऊन गाव भारनियमन मुक्त करावे या संदर्भात निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते कि सहा महिन्यांत साखरीटोला गावाला भारनियमन मुक्त करण्यात येईल. परंतु वेळ लोटून सुद्धा गाव भारनियमन मुक्त करण्यात आले नाही. साखरीटोला (पावर हाऊस) विद्युत केंद्राशी संलग्न तीन फिडर आहेत. त्यात साखरीटोला, हेटीटोला, सोनेखारी यापैकी केवळ साकरीटोला फिडरवर भारनियमन सुरु करण्यात आले. यात साखरीटोला, सातगाव, कन्हारटोला, सलंगटोला, रामपूर, पानगाव, अजोंरा, दागोटोला, या गावांना भारनियमनाचा तडाखा सहन करण्याची पाळी आली आहे. यात सकाळी ६ ते ९ व दुपारी ३ ते ६ पर्यंत भारनियमन करण्यात येते, ज्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे.मात्र सदर विद्युत केंद्रातील हेटीटोला व सोनेखारी फिडरला भारनियमन नाही. मग साखरीटोला फिडरलाच भारनियमन का लादण्यात आले असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. याविषयी प्रभारी शाखा अभियंता घोरमारे यांना विचारणा केली असता त्यांनी सदर फिडरचे भारनियम विभागीय कार्यालयाच्या निर्देशानुसार थकबाकीदार अधीक असलेल्या गावांना लादण्यात येते. साखरीटोला फिडर केंद्रात थकबाकीदारांची संख्या अधिक असल्याची बतावणी करुन भारनियमन लादण्यात आल्याचे सांगितले.विद्युत विभागाच्या अफलातुन कारभाराविषयी जनतेने नाराजी व्यक्त केली आहे. जे ग्राहक नियमित विद्युत बिलाचा भरणा करतात त्यांचा विचार का केला जात नाही. ग्राहकाने विद्युत बिल वेळेवर भरले नाही तर विद्युत विभागाचे कर्मचारी त्वरीतच त्या ग्राहकांचा विज पुरवठा खंडीत करतात. विद्युत पुरवठा खंडीत केला जाऊ नये म्हणून विज बिल वेळेवर भरले जाते. याचा अर्थ असा की, विद्युत विभागाचे अधिकारी चुकिची माहिती देऊन साखरीटोलावासीयांना नाहक त्रास देत आहेत. भारनियमनामुळे जनता त्रासली असून लादण्यात आलेले भारनियम त्वरीत बंद करण्यात आले नाही तर साकरीटोलावासी रस्त्यावर उतरुन आंदोलन करुन शकतात असा इशारा रमेश चुटे, प्रभाकर दोनोडे, डॉ. संजय देशमुख, डॉ. अजय उमाटे, सुनिल अग्रवाल, संतोष शहारे, संतोष बोहरे, अश९ाक मेहर, अरविंद गजभिये, संजय कुसराम, राजू काडे, सागर काटेखाये, प्रकाश दोनोडे, पृथ्वीराज शिवनकर, किसन चकोले, बबलू लांजेवार, प्रदिप अग्रवाल यांनी दिला आहे.