शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

तापमानात भारनियमनाचा फटका

By admin | Updated: May 7, 2017 00:19 IST

मे महिन्याची रणरणती उन्ह आणि त्यावर भर दुपारी भारनियमनाचा तीन तासांचा फटका यामुळे तालुक्यात ...

तीन तास लोकांची लाही-लाही : शेतीलाही बसतोय फटका लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : मे महिन्याची रणरणती उन्ह आणि त्यावर भर दुपारी भारनियमनाचा तीन तासांचा फटका यामुळे तालुक्यात लोकांचे दुपारचे जीवन कठिण झाले आहे. उष्णतेमुळे जीवाची लाही-लाही होताना दिसत आहे. दरवर्षी मे महिना हा सर्वोच्च उष्णतेचा असून ‘मे हीट’ चा फटका हा परमोच्च असतो. या महिन्यात स्वत:ला उष्णतेपासून सांभाळून ठेवणे मोठे आवाहन असते. बाहेर ४५ डिग्री सेल्सियसच्या जवळ तापमान प्रत्येक जीवाला त्राही त्राही करुन सोडणारे असते. अशात लोक घराबाहेर निघण्याचे टाळतात व दार खिडक्या लावून कुलर व पंख्याच्या हवेत विश्रांती घेणे पसंत करतात व तसे करणे शरीराला हितकारक ठरते. परंतु एवढ्यात वीज नसेल तर घरात राहूनही काय अर्थ. सध्या वीज विभागाने ऐन दुपारी गर्मीच्या वेळी ३ वाजतापासून वीज कपात सुरू केलेली आहे. ती ५.३० किंवा ६ वाजतापर्यंत असते. ३ ते ५ वाजताचा कालावधी हा अती उष्णतेचा असून यादरम्यान घराबाहेर पडणे मोठे जीवघेणे वाटत असते व घराबाहेर निघण्याची मुळीच इच्छा होत नाही. परंतु याच कालावधीत भारनियमन सुरू झाल्याने घरात राहणे सुद्धा कठिण झाले आहे. अशात जीवाची लाही-लाही होत आहे. धानपिकालाही फटका धानपिकाला पाण्याची नेहमी गरज असते. परंतु गर्मी वाढल्याने पाणी लवकर आटते. त्यामुळे शेतीला सतत पाणी पुरवठा करणे आवश्यक असते. तीन तासांचे भार नियमन सुरु झाल्याने धानपिक ही धोक्यात आले आहे. पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून भार नियमनाचा फटका पिकांनाही बसत आहे.