शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

धान गर्भावस्थेत असताना भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 21:51 IST

जिल्ह्यात पावसाने दगा दिला. त्यामुळे ७० हजार हेक्टर जमीन पडीत आहे. तलाव, प्रकल्प, नाले यात पाणी नाही. जिल्ह्यात काही प्रमाणात धानाचे पीक उभे आहे.

ठळक मुद्देपरशुरामकर यांचा आरोप: शेतकºयांना संपविण्याचे सरकारचे षड्यंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात पावसाने दगा दिला. त्यामुळे ७० हजार हेक्टर जमीन पडीत आहे. तलाव, प्रकल्प, नाले यात पाणी नाही. जिल्ह्यात काही प्रमाणात धानाचे पीक उभे आहे. ते पिक वाचविण्यासाठी शेतातील विहिरीवरील विद्युत पंप सुरू करण्याची गरज आहे. परंतु विज वितरण कंपनीने ६ ते ८ तासांचे भारनियमन सुरु केले आहे. आता शेतकºयांची जात संपविण्यास सरकारने सुरूवात केल्याचा आरोप जि.प.सदस्य परशुरामकर यांनी केला आहे.जिल्ह्यात यावर्षी दुष्काळ आहे. ३० सप्टेंबरपर्यंत १३०० मिमी. पाऊस होणे गरजेचे होते. परंतु अर्धाही पाऊस पडला नाही. पाऊसच झाला नसल्याने तलाव, बोड्या, नदी, नाले, प्रकल्प सर्वच कोरडे आहेत. काही परिसरात धानाचे पीक चांगले आहे. याला कारण शेतकºयांच्या शेतात असलेल्या विंधनविहीरी व त्यावर लावलेले पंप यामुळेच काही प्रमाणात धानाचे पीक उभे आहे. यात शेतकºयांची मेहनत व जिद्द दिसत आहे. हे पीक हातात येईल या आशेने शेतकरी आनंदात होते. पण केंद्रात व राज्यात सत्तेत येण्यापूर्वी १ मिनीटही भारनियमन होणार नाही याचा कांगावा करणारे सत्तेत येताच सर्व विसरले. पीक हातात येईल एवढ्यात ६ ते ८ तासांचे भारनियमन सुरु केले. सत्तेत असणारे नेते व पदाधिकारी काही बोलावयास तयार नाही. शेतकरी देशोधडीला लागत आहे. शेतकºयांसमोर दुष्काळात तेरावा महिना उभा करुन शेतकºयांची जातच यांनी संपविण्याचा प्रयत्न सुरु केल्याची संतप्त प्रतिक्रीया भारनियमनावर जि.प.सदस्य परशुरामकर यांनी व्यक्त केली.