शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

लग्नसोहळे झाले लॉकडाऊन; पुन्हा अक्षय तृतीयेचा मुहूर्त हुकला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे यंदाही संचारबंदीच्या नियमामुळे लग्नसोहळे पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्याचे चित्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गोंदिया : कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे यंदाही संचारबंदीच्या नियमामुळे लग्नसोहळे पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्याचे चित्र दिसून येत आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयेला लग्न करण्याची जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यभरात परंपरा आहे. मात्र, यावर्षी कोरोनाची दुसरी लाट आल्याने गतवर्षी खेडोपाडी लपूनछपून होणारे विवाह सोहळेही आता लॉकडाऊन झाले आहेत. त्यामुळे आता उन्हाळ्याच्या दिवसात दिसणारी लग्नाची धामधूम दिसेनाशी झाली आहे. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी अनेकजण वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. यावर्षी कोरोना संचारबंदीमुळे अक्षय तृतीयेच्या विवाह मुहूर्तावर लग्नसोहळा करण्याच्या अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. कोरोना संसर्गात दोन तासात लग्न उरकण्यापेक्षा अनेकांनी लग्नसोहळे पुढे ढकलले आहेत. यंदाच्या लग्न सोहळ्यांमुळे लॉन व्यावसायिकांवर चांगलेच संकट आले आहे. यंदा मोठ्या प्रमाणात लग्नाच्या ऑर्डर मिळाल्या परंतु कोरोनाचा संसर्ग वाढल्याने लग्न समारंभ कमी लोकांमध्ये करा, असा फतवा काढण्यात आल्याने आमचा रोजगार बुडाल्याचे आमगाव येथील लॉन व्यावसायिक पुष्पकांत बहेकार यांनी म्हटले आहे. यावर्षी कोरोनात लग्न नको म्हणून बुकिंग रद्द केल्याची माहिती बहेकार यांनी दिली.

....

नियमांचा अडसर

कोरोनाचा उद्रेक असलेल्या ठिकाणी प्रशासनाने अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नासाठी यंदा परवानगी दिली नाही. काही ठिकाणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लग्नासाठी कुणाचेही अर्ज घेतले नाहीत. विनापरवानगीने घरगुती लग्न केले तर त्यांच्यावर प्रशासन कारवाई करणार असल्याचे सांगितले. अनेकजण लग्न पुढे ढकलत आहेत. शिवाय कोरोना चाचणी, आरटीपीसीआर चाचणी, निवडक जणांचीच उपस्थिती अशी सरकारने लग्न सोहळ्यासाठी बंधने घातली आहेत.

................................

मंगल कार्यालयांंचे गणित बिघडले

१) गोंदिया शहरात जवळपास २० ते २२ मंगल कार्यालये आहेत. परंतु, कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे मंगल कार्यालये संचारबंदीमुळे ओस पडली आहेत.

२) क्वचितप्रसंगी लग्न झालेच तरी सध्या प्रशासनाच्या जाचक अटींमुळे मंगल कार्यालयात मात्र कुणीही लग्न करत नाहीत. कमीत कमी लोकांमध्ये लग्न करायचे तर लॉन कशाला, असा विचार लोक करत आहेत.

३) लग्नात २५ वऱ्हाडी आणि दोन तासात लग्न करा, असे आदेश असल्याने अनेक लोकं लग्नासाठी टाळाटाळ करत आहेत.

४) मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा मंगल कार्यालयात बुकिंग मोठ्या प्रमाणात होते. परंतु, लग्न समारंभ झालेच नाहीत.

५) पहिली कोरोनाची लाट ओसरल्यानंतर लग्न समारंभ धुमधडाक्यात सुरू झाले, त्यामुळे मंगल कार्यालयांचे बुकिंग करण्यात आले होते, ते नंतर रद्द झाले.

......

यंदा कर्तव्य नाही

माझ्या मुलीचे लग्न ५ मेला ठरले होते. पूर्ण तयारीही झाली, पाहुण्यांना पत्रिका वाटल्या. मात्र, त्यानंतर कोरोना दिवसेंदिवस वाढतच चालल्याने शेवटी नाईलाजास्तव लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व तयारी झाल्यानंतर ठरलेल्या तारखेत लग्न न झाल्याने मन निराश झाले. पण जीवाच्या भीतीपोटी लग्न पुढे ढकलावे लागले.

रामदास मेंढे, वधू पिता, गोंदिया.

लग्नासाठी प्रशासनाने २५ पाहुण्यांची परवानगी दिली आहे. परंतु, आमचे सर्व पाहुणे पकडले तरी जवळपास ५००च्यावर लोक आमचे खास आहेत. शिवाय दोन तासात लग्न कसे शक्य आहे. यापेक्षा कोरोना कमी झाल्यावरच मुलीचे धुमधडाक्यात लग्न करण्याचा निर्णय आमच्या कुटुंबाने घेतला आहे.

- पारबता मेंढे, वधू माता, गोंदिया.

................

मे महिन्यातील मुहूर्त

मे महिन्यात १४, १५, १८, २१, २३, २६ व २९ मे असे सात दिवस लग्नाचे मुहूर्त आहेत.