शहरं
Join us  
Trending Stories
1
शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ...
2
स्फोटानंतर घाबरून बेसमेंटमध्ये पळाले लोक; २० जणांचा तिथेच गुदमरून जीव गेला, आतापर्यंत २५ मृत्यू
3
झोंबणाऱ्या थंडीनं भरलं कापरं, उत्तर भारतात थंडीची लाट; उत्तराखंड, हिमाचलमध्ये बर्फवृष्टीचा इशारा
4
शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २५ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ...
5
आदिवासी, ओबीसींचा वेगळा विदर्भ व्हायला हवा; विजय वडेट्टीवार : काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार
6
विरोधी पक्षनेता नसेल तर उपमुख्यमंत्रिपदही रद्द करा; उद्धव ठाकरे : सरकार विरोधी पक्षाला घाबरते का?
7
दिल्लीत PM नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे एकत्र; मुलगा अमित अन् नातू किआननं मोदींसोबत काढला फोटो
8
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
9
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
10
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
11
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
12
धक्कादायक... मेळघाटात व्यसनामुळे वाढतोय कॅन्सर; युवा ते प्रौढ व्यक्तींमध्ये रक्ताल्पता : संशोधन चमू काढणार निष्कर्ष
13
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
14
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
15
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
16
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
17
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
18
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
19
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
20
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
Daily Top 2Weekly Top 5

निर्बंंधांना धुडकावून लग्नसोहळे थाटामाटात सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 23:10 IST

राज्यातील कोरोनाची भयावह स्थिती बघता राज्य शासनाने लग्नसोहळ्यांवर पुन्हा एकदा निर्बंध घातले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले जिल्ह्यातही लग्नसोहळ्यांवर निर्बंध लावले आहेत. यामध्ये दोन्ही पक्षांकडून ५० पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होता येणार नाहीत, असे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र शहरात या विपरीत परिस्थिती दिसून येत आहेत. 

ठळक मुद्देलग्नसराईचा धडाका सुरूच : ना गर्दीवर नियंत्रण, ना फिजिकल डिस्टन्सिंग

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यासोबतच आता जिल्ह्यातही कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. याकडे लक्ष देत राज्यासह आता जिल्ह्यातही लग्नसोहळ्यांवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. ५० व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्ती असल्यास कारवाईचे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र शहरात या निर्बंधांना धुडकावून लग्नसोहळे थाटामाटात आटोपले जात असल्याचे दिसून येत आहे. लग्नांमध्ये ना गर्दीवर नियंत्रण, ना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन दिसून येत आहे. कोरोनाची भीती न बाळगता लग्नसोहळ्यांचा धडाका सुरूच आहे. मध्यंतरी अवघ्या राज्यातच कोरोना नियंत्रणात आला होता. मात्र आता मागील दिवसांपासून कोरोनाचा भडका उडू लागला आहे. अवघ्या राज्यातच कोरोना पुन्हा डोके वर काढत असून जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली असल्याने खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. राज्यातील कोरोनाची भयावह स्थिती बघता राज्य शासनाने लग्नसोहळ्यांवर पुन्हा एकदा निर्बंध घातले आहेत. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले जिल्ह्यातही लग्नसोहळ्यांवर निर्बंध लावले आहेत. यामध्ये दोन्ही पक्षांकडून ५० पेक्षा जास्त व्यक्ती सहभागी होता येणार नाहीत, असे आदेश काढण्यात आले आहेत. मात्र शहरात या विपरीत परिस्थिती दिसून येत आहेत. कोरोना भडका पुन्हा एकदा उठला असतानाही शहरात सध्या धडाक्यात लग्नसोहळे आटोपले जात आहेत. त्यातही कोरोनामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांना धुडकावून शेकडो-हजारो नागरिकांच्या उपस्थितीत लग्न थाटामाटात उरकले जात आहेत. राज्य शासनाने ५० व्यक्तींच्या उपस्थितीची अट घातली असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मात्र हा प्रकार धोकादायक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे, नागरिकही तेवढ्याच निर्भयपणे अशा या लग्न सोहळ्यांमध्ये उपस्थिती लावून आपले संबंध जोपासताना दिसत आहेत. 

आता आहे कारवायांची गरज मध्यंतरी २-४ वर आलेली दररोजच्या कोरोनाबाधितांची संख्या आता मागील काही दिवसांपासून २० पार झाली आहे. म्हणजेच, जिल्ह्यातही कोरोना पुन्हा आपले डोके वर काढताना दिसत आहे. अशात जिल्हाधिकाऱ्यांनी लग्नसोहळ्यांवर निर्बंध लावतानाच आयोजक तसेच सभागृह व लॉन संचालकांवर प्रत्येकी १० हजार रुपये दंड आकारून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतरही काहीच कारवाई होत नसल्याने लग्न सोहळे धडाक्यात न घाबरता सुरूच आहेत. हा प्रकार नक्कीच धोकादायक असल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कारवाई करण्याची गरज असल्याचेही आता नागरिक खुद्द बोलत आहे.

 

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या