शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आम्ही कारवाई केली, आता तुम्हीही करून दाखवा

By admin | Updated: April 12, 2016 04:13 IST

राजकारणात आम्ही गुंडागिरीचे समर्थन करीत नाही. त्याकरिताच आम्ही शिव शर्मावर कारवाई करून त्यांना पक्षातून

गोंदिया : राजकारणात आम्ही गुंडागिरीचे समर्थन करीत नाही. त्याकरिताच आम्ही शिव शर्मावर कारवाई करून त्यांना पक्षातून निलंबित केले. मात्र कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस भ्रष्टाचार व गुंडागिरीच्या विरोधात आहे तर आता त्यांनीही आपल्या सदस्यांवर कारवाई करावी, अशी अपेक्षा खासदार नाना पटोले यांनी केली.येथील शासकीय विश्रामृहात सोमवारी (दि.११) आयोजित पत्रपरिषदेत आमदार अग्रवाल यांच्यावरील हल्ला प्रकरणात पक्षाची बाजू मांडताना ते बोलत होते. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी अध्यक्ष विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, भाऊराव उके, गुड्डू कारडा व अन्य उपस्थित होते. पुढे बोलताना खा.पटोले यांनी आमचे सदस्य गुंडागिरी करणारे आहेत तर त्यांनी आपल्या सदस्यांना बघावे. त्यांना त्यांचे किती सदस्य गुन्हेगार आहेत याची माहिती नसल्यास आम्ही यादी जाहीर करतो, असा टोला लगावला.नगर परिषदेतील भ्रष्टाचारावर बोलताना पटोले यांनी, १५ वर्षे सत्तेत असताना अवघ्या राज्याचे बजेटच गोंदिया नगर परिषदेत येत होते. तो पैसा गेला कुठे याचा शोध मी घेत आहे. मात्र तो पैसा काही दिसत नाही, असा टोला लावला. आम्ही तर आज सत्तेत आलो, १५ वर्षे त्यांचे राज्य होते. याची मुख्यमंत्र्यांकडून चौकशी करण्याची मागणी करू, ते म्हणाले. शहर बंद करून तोडफोड करून दहशत पसरविली जात आहे. अशात आम्ही व्यवसायिकांच्या सोबत असल्याचेही ते म्हणाले. शिव शर्मा यांनी केलेल्य कृत्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत नाही. मात्र त्यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याला घेऊन पोलीस अधीक्षकांसोबत बोलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)जिल्हा परिषदेतील युतीवर ३० दिवसात निर्णय घेणार?४आपल्या पक्षाची भूमिका मांडण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या या पत्रपरिषदेत पत्रकारांच्या एका प्रश्नाने खा.पटोले व भाजप पदाधिकाऱ्यांची गोची झाली. दोन्ही पक्षांत एवढे भेद असताना जिल्हा परिषदेत एकत्र का? हा प्रश्न केला असता त्यावर उत्तर देताना पटोले स्पष्टपणे बोलू शकले नाही. मात्र ३० दिवसांत त्यावरही निर्णय घेणार, असे ते म्हणाले. त्यामुळे जिल्हा परिषदेतील काँग्रेस-भाजपचा घरोबा किती दिवस राहणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.