शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला सौर ऊर्जा पंप नको, वीज पुरवठा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:26 IST

अर्जुनी-मोरगाव : शासनाने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप जोडणीचे काम खासगी कंपन्यांना दिले. पंप जोडणी झाली त्याचा मलिदा मिळाला ...

अर्जुनी-मोरगाव : शासनाने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप जोडणीचे काम खासगी कंपन्यांना दिले. पंप जोडणी झाली त्याचा मलिदा मिळाला की झाला या आविर्भावात खासगी कंपन्या वावरत आहेत. पंप बिघाडाची दुरुस्ती करून देण्याचे सौजन्य बाळगले जात नाही. वीज वितरण कंपनीचे अधिकारीसुद्धा सांगून थकलेत मात्र उपयोग होत नाही. यामुळे सीआरआय व मुंदरा या कंपन्यांविरुद्ध शेतकऱ्यांत अधिक आक्रोश दिसून येत आहे.

निमगाव येथील नारायण खोब्रागडे यांची सिल्ली (निमगाव) येथे गट क्रमांक- ३१० मध्ये शेतजमीन आहे. त्यांचा १९ नोव्हेंबर २०१९ रोजी सौर कृषी पंपासाठी ऑनलाइन अर्ज मंजूर करण्यात आला होता. त्यांनी मागणी पत्राप्रमाणे ८,२९० रुपये भरणा केल्यानंतर मे २०२० मध्ये त्यांच्या शेतात सीआरआय कंपनीचा ३ अश्वशक्तीचा पंप बसविण्यात आला. सौर ऊर्जा पंप बसविला त्याच दिवशी मोटार बंद झाली. कंपनीने ४ दिवसांनी दुसरी मोटार बसवून दिली. एक महिन्यानंतर ती पुन्हा बंद पडली. तक्रार केल्यानंतर दुरुस्ती करून दिली. परत ३ सप्टेंबर २०२० पासून मोटार बंद आहे. या शेतकऱ्याने अर्जुनी-मोरगावच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार केली व स्मरणपत्र दिले. तसेच ऑनलाईन तक्रार केली. मात्र अद्यापही सौर ऊर्जा पंप दुरुस्त करून देण्यात आले नाही.

पंप नादुरुस्त असल्यामुळे खोब्रागडे यांचे खरीप हंगामात पाण्याअभावी शेतपिकाचे नुकसान झाले. एवढेच नव्हे तर त्यांना रब्बी हंगामाला मुकावे लागले. बोळदे-करडगाव येथील जगदीश सांगोळे या शेतकऱ्याने ३० मे २०१९ रोजी मागणीपत्रानुसार पैसे भरले. मे २०२० मध्ये त्यांच्या शेतात सीआरआय कंपनीने सौर ऊर्जा पंप बसवून दिला. आठवडा होत नाही तोच पंपात बिघाड आला. दोनदा तो दुरुस्त करून दिला मात्र पुन्हा बिघाड आला. सांगोळे यांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले. गेल्या ६ महिन्यांपासून पंप बंदच आहे. ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार केली मात्र काहीच उपयोग झाला नाही. प्रमिला जांभुळकर व लोथे या शेतकऱ्यांनाही मुंदरा कंपनीचे वाईट अनुभव आलेत.

शेतकऱ्यांच्या नावावर कंपन्यांचंच चांगभलं होत असल्याचा शेतकऱ्यांना अनुभव येत आहे. मुळात ही योजनाच फसवी असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. सौर ऊर्जा पंप कंपनीने तातडीने दुरुस्ती करून द्यावे. नाही तर वीज वितरण कंपनीने शेतात नवीन वीज मीटर बसवून द्यावे जेणेकरून शेतीला सिंचन होईल, अन्यथा नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.