शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

आम्हाला सौर ऊर्जा पंप नको, वीज पुरवठा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:26 IST

अर्जुनी-मोरगाव : शासनाने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप जोडणीचे काम खासगी कंपन्यांना दिले. पंप जोडणी झाली त्याचा मलिदा मिळाला ...

अर्जुनी-मोरगाव : शासनाने शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सौर ऊर्जा पंप जोडणीचे काम खासगी कंपन्यांना दिले. पंप जोडणी झाली त्याचा मलिदा मिळाला की झाला या आविर्भावात खासगी कंपन्या वावरत आहेत. पंप बिघाडाची दुरुस्ती करून देण्याचे सौजन्य बाळगले जात नाही. वीज वितरण कंपनीचे अधिकारीसुद्धा सांगून थकलेत मात्र उपयोग होत नाही. यामुळे सीआरआय व मुंदरा या कंपन्यांविरुद्ध शेतकऱ्यांत अधिक आक्रोश दिसून येत आहे.

निमगाव येथील नारायण खोब्रागडे यांची सिल्ली (निमगाव) येथे गट क्रमांक- ३१० मध्ये शेतजमीन आहे. त्यांचा १९ नोव्हेंबर २०१९ रोजी सौर कृषी पंपासाठी ऑनलाइन अर्ज मंजूर करण्यात आला होता. त्यांनी मागणी पत्राप्रमाणे ८,२९० रुपये भरणा केल्यानंतर मे २०२० मध्ये त्यांच्या शेतात सीआरआय कंपनीचा ३ अश्वशक्तीचा पंप बसविण्यात आला. सौर ऊर्जा पंप बसविला त्याच दिवशी मोटार बंद झाली. कंपनीने ४ दिवसांनी दुसरी मोटार बसवून दिली. एक महिन्यानंतर ती पुन्हा बंद पडली. तक्रार केल्यानंतर दुरुस्ती करून दिली. परत ३ सप्टेंबर २०२० पासून मोटार बंद आहे. या शेतकऱ्याने अर्जुनी-मोरगावच्या उपकार्यकारी अभियंत्यांकडे लेखी तक्रार केली व स्मरणपत्र दिले. तसेच ऑनलाईन तक्रार केली. मात्र अद्यापही सौर ऊर्जा पंप दुरुस्त करून देण्यात आले नाही.

पंप नादुरुस्त असल्यामुळे खोब्रागडे यांचे खरीप हंगामात पाण्याअभावी शेतपिकाचे नुकसान झाले. एवढेच नव्हे तर त्यांना रब्बी हंगामाला मुकावे लागले. बोळदे-करडगाव येथील जगदीश सांगोळे या शेतकऱ्याने ३० मे २०१९ रोजी मागणीपत्रानुसार पैसे भरले. मे २०२० मध्ये त्यांच्या शेतात सीआरआय कंपनीने सौर ऊर्जा पंप बसवून दिला. आठवडा होत नाही तोच पंपात बिघाड आला. दोनदा तो दुरुस्त करून दिला मात्र पुन्हा बिघाड आला. सांगोळे यांनी वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले. गेल्या ६ महिन्यांपासून पंप बंदच आहे. ऊर्जामंत्र्यांकडे तक्रार केली मात्र काहीच उपयोग झाला नाही. प्रमिला जांभुळकर व लोथे या शेतकऱ्यांनाही मुंदरा कंपनीचे वाईट अनुभव आलेत.

शेतकऱ्यांच्या नावावर कंपन्यांचंच चांगभलं होत असल्याचा शेतकऱ्यांना अनुभव येत आहे. मुळात ही योजनाच फसवी असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. सौर ऊर्जा पंप कंपनीने तातडीने दुरुस्ती करून द्यावे. नाही तर वीज वितरण कंपनीने शेतात नवीन वीज मीटर बसवून द्यावे जेणेकरून शेतीला सिंचन होईल, अन्यथा नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.