शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

परंपरागत ‘वाजा’ संस्कृती लोप पावण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 00:02 IST

‘वाजा’ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोकसंगीतातील एक वाद्य.या लोकसंगीताने एकेकाळी गावागावात आपली ओळख निर्माण केली होती.

ठळक मुद्देघोटीत ‘वाजा’ मेळावा : प्रशासनाने लोकसंगीताला नवसंजीवनी देण्याची गरज

दिलीप चव्हाण ।ऑनलाईन लोकमतगोरेगाव : ‘वाजा’ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोकसंगीतातील एक वाद्य.या लोकसंगीताने एकेकाळी गावागावात आपली ओळख निर्माण केली होती. पण कालांतराने या वाजाची जागा संदल, डीजे, बँड यांनी घेतली. त्यामुळे परंपरागत ‘वाजा’ वाजविणाºया होली, होलीया व होल्या या समाजावर उपासमारीची पाळी आली आहे. या समाजाची कुठलीही संघटना नसल्यामुळे या समाजाला आजही आधार नाही. त्यामुळे होली समाज मागासलेला आहे. नुसता वाजा वाजवून कुटुंबाचे उदरनिर्वाह करणाºया या समाजाला शासनाने मदत करावी अशी अपेक्षा आहे.गोरेगाव तालुक्यातील घोटी येथे शिवाजी महाराजांच्या जयंतीदिनी होली समाजाचा ‘वाजा’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध प्रकारचे वाद्य या मेळाव्याचे मुख्य आकर्षण होते. पारंपारिक व्यवसायातून या समाजाने बाहेर निघावे तरच या समाजाचे उत्थानाचे दार उघडे होतील असे बोलले जात असले तरी हा समाज आजही कोणत्या जाती, वर्गात मोडतो हे माहित नाही. त्यांना होल्या बोलले गेले व तसेच कागदावर लिहिले गेले, होली वेगळा व त्याच कुटुंबातील होलीया वेगळा, अशी या अल्पसंख्याक समाजाची खरी परिस्थिती आहे.शंभर वर्षापूर्वी गावागावात दंगल भरायची. गावकरी होली समाजाला वाजा वाजविण्यासाठी बोलवायचे. आता ही प्रथा काळाच्या पडद्याआड झाली आहे. पूर्वी शेतीचे काम संपल्यानंतर वाजा वाजवून शेतीतून परत यायचे. शेतातील थंड वातावरणामुळे वाजा थंड व्हायचा. ते गरम करण्यासाठी तणस जाळायचे. आता ही प्रथा बंद झाली. बँड, संदल, डिजे या वाद्यांनी ही जागा घेतल्याचे चित्र समाजात उभे आहे.वाजा संस्कृतीत सात प्रकारचे लोकसंगीत आहेत. या लोकसंगीताने एकेकाळी साºया महाराष्टÑात आपली छाप सोडली. परंतु कालपरत्वे लोकसंगीताला प्रशासनाने मदत केली नाही. वाजा लोकसंस्कृतीचा भाग म्हणून बहुजन समाजाने याचा वापर केला. पण या संगिताला जीवंत ठेवण्यासाठी प्रशासनाने कुठलेही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे वाजा लोकसंगीत लोप पावण्याच्या मार्गावर आहे.या लोकसंगीताला जीवंत ठेवणारा होली समाज आजही मागासलेले जीवन जगत आहे.साहित्य उपलब्ध करुन देण्याची गरजहोली समाजाचे लोक पूर्वीच्या काळात शेळीच्या चामडापासून वाजा बनवायचे. या वाजातील बाहेरील आवरण, चिंचाच्या झाडाच्या सालापासून तर ‘वाजा’ वाजविण्यासाठी ‘तारा’ सागवान या झाडापासून तयार करण्यात येते. आज घडीला प्राण्यांचे कातडे मिळणे दिवास्वप्न ठरत आहे. सागवन व चिंचाचे झाडही कमी झाले आहेत. त्यामुळे भविष्यात वाजा संस्कृतीला पूरक वातावरण नाही. त्यामुळे शासनाने वाजाला लागणारे साहित्य उपलब्ध करुन देण्याची गरज आहे.समाजाला हवे दिशादर्शक मार्गदर्शनहोली, होलीया, होल्या या एकाच जातीच्या समाजाला तीन नावाने ओळखले जाते. २०११ पूर्वी या समाजाला जातीचे दाखले देण्यासाठी मोठी अडचण होती. २०११ नंतर तत्कालीन राज्यमंत्री सचिन अहिर यांनी शासन आदेश काढून होली समाजाला जातीचे दाखले देण्याचे आदेश काढले. जिल्ह्यात या समाजाची दहा हजाराच्या जवळपास लोकसंख्या आहे. महाराष्टÑातील पूर्व विदर्भात या समाजाचे लोक वास्तव्य करतात. शिक्षणात मागासलेला हा समाज परंपरागत वाजा वाजविण्यातच गुंतला आहे. अंत्यसंस्कारासाठी वाजा, वाढदिवसाचा वाजा, लग्नातील वाजा, पºहे संपले तर वाजणारा वाजा, मोहरम सनाला वाजणारा वाजा, वरात वाजा, हळदी वाजा या सात प्रकारात वाजविण्याची कला या होली समाजात रूढ आहे.होली समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. जिल्हा परिषदेच्या उपलब्ध निधीतून या जातीतील लोकांचे प्रश्न सोडविाण्याचा प्रयत्न करणार.-विश्वजित डोंगरेसमाजकल्याण सभापती, जि.प.गोंदिया.............................................होली समाजाचे एकच वाद्य आहे. प्रसंगावधान राखून वाद्ये वाजविले जाते. कसलेही प्रशिक्षण नसताना या कलेला जीवंत ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा नव्या पिढीला ‘वाजा’ लोकसंगीत कधीही दिसणार नाही.- दुलीचंद बुद्धेसचिव अधिकारी/कर्मचारी समन्वय समिती, गोंदिया