शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
3
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
4
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
5
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
6
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
7
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
8
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
9
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
10
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
11
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
12
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
13
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
14
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
15
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
16
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
17
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
18
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
19
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
20
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश

प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: November 19, 2014 22:55 IST

अर्जुनी/मोरगाव येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना १ एप्रिलपासून सुरळीत सुरू आहे. परंतु वाढत्या विद्युत बिलांमुळे १ डिसेंबरपासून सदर योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे.

अर्जुनी मोरगाव : अर्जुनी/मोरगाव येथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना १ एप्रिलपासून सुरळीत सुरू आहे. परंतु वाढत्या विद्युत बिलांमुळे १ डिसेंबरपासून सदर योजना बंद होण्याच्या मार्गावर आहे.एक महिन्याचे विद्युत बिल एक लाख ७५ हजार रूपये याप्रमाणे दोन महिन्यांचे बिल थकित आहे. यामुळेच सदर योजना बंद होण्याची दाट शक्यता आहे. एका वर्षापूर्वी योजना सुरू करण्यासंदर्भात नवेगावबांध येथे उपोषण करण्यात आले होते. त्यात अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील तिन्ही योजनांची जबाबदारीसाठी उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग नवेगावबांध येथील कनिष्ठ अभियंत्याची निवड करण्यात आली होती. परंतु संबंधित अभियंत्याने आजपर्यंत संपर्क साधला नाही. योजनास्थळी भेटसुद्धा दिली नाही. त्यामुळे योजनाच आता बंद होण्याच्या मार्गावर आहे. अर्जुनी/मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे एकूण १५ गावांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरविले जाते. परंतु येत्या १ डिसेंबरपासून योजना बंद होण्याच्या मार्गावर असल्याने १५ गावातील नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्यापासून मुकावे लागणार असून पाण्याची टंचाई उद्भवण्याची दाट शक्यता आहे. या योजनेकडे १५ गावे मिळून एक हजार ४०० नळ जोडण्या आहेत. प्रत्येक नळ धारकाकडून दर महिना ८० रूपये वसूल केले जाते. त्यानुसार एक लक्ष १२ हजार रूपये जमे होतात. त्यात मासिक विद्युत बिल एक लाख ७५ हजार रूपये, देखभाल दुरूस्तीसाठी ४० हजार रूपये, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ६५ हजार रूपये असा खर्च येतो. यावरून जमा रकमेपेक्षा खर्चच अधिक दिसून येतो. त्यामुळे योजना तोट्यात सुरू असून शासनाकडून मिळालेले अनुदान विद्युत बिलांवर पूर्ण खर्च झाले आहे. पुढील विद्युत बिल भरण्यासाठी मंडळाकडे निधी उपलब्ध नाही. त्यामुळे तिन्ही मंडळांनी संयुक्त सभा घेवून जि.प. प्रशासनाने स्वत:कडे हस्तांतरीत करावे, असा ठराव घेतला आहे. सदर ठराव कार्यवाहीसाठी ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जि.प. गोंदिया यांना देण्यात आला आहे. (वार्ताहर)