शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

जंगलातील पाणवठे पडले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:11 IST

यंदा तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झपाट्याने होत आहे. नदी नाले, तलाव बोड्या कोरडे पडल्याने मनुष्यासह वन्यप्राण्यांची सुध्दा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे.तर जंगलातील पाणवठे सुध्दा कोरडे पडले असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहे.

ठळक मुद्देवन्यप्राण्याचा उष्माघाताने मृत्यू : वन्यजीव विभागाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झपाट्याने होत आहे. नदी नाले, तलाव बोड्या कोरडे पडल्याने मनुष्यासह वन्यप्राण्यांची सुध्दा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे.तर जंगलातील पाणवठे सुध्दा कोरडे पडले असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहे. तर वाढते तापमान आणि पाण्याअभावी वन्यप्राण्यांचा मृत्यू होत आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील शशीकरण पहाडी परिसरात नुकताच असा प्रकार उघडकीस आला.तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहे. परिणामी तलावांच्या जिल्ह्यातच यंदा एप्रिल महिन्यातच पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने पाणीे टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यावर्षी तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात घट होत आहे.त्यामुळेच जंगलातील वन्यप्राण्यांना पाण्यासाठी गावाकडे धाव घेण्याची वेळ आली असून पाण्याअभावी व उष्णतेच्या दाहकतेमुळे रानगव्यासारख्या वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला. यामुळे वन आणि वन्यजीव विभागाच्या उपाय योजनांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २५६ पाणवठे असून त्यापैकी ७८ नैसिर्गक स्त्रोताचे तर १५४ कृत्रिम पाणवठे आहेत. २४ तलाव ही या क्षेत्रात आहे. १५४ कृत्रीम पाणवठ्यात पाणी पुरवठा व्हावा यासाठी १४१ हातपंप तयार केलेले आहेत. त्यापैकी ११० हातपंप सौरऊर्जेवर चालणारे आहेत.१३ पाणवठ्यात तीन टँकरच्या माध्यमातून पाण्याची सोय केली जात आहे. वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागत नसल्याचे वन्यजीव विभागाचे म्हणने आहे. तर वन्यप्रेमीनी आठ दिवसांपूर्वी जंगलातील कुठल्याच पाण्याची सोय करण्यात नसल्याचा आरोप केला आहे.काही निसर्ग प्रेमी संस्थानी यावर आवाज उठविल्यानंतर वन्यजीव विभागाने टँकर लावून पाण्याची सोय केल्याची माहिती आहे. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील थाटेझरी गावाजवळील मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :forest departmentवनविभाग