शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
2
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
3
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
4
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
5
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
6
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
7
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
8
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
9
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
10
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
11
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
12
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
13
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
14
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
15
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
16
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
17
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
18
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
19
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
20
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील पाणवठे पडले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:11 IST

यंदा तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झपाट्याने होत आहे. नदी नाले, तलाव बोड्या कोरडे पडल्याने मनुष्यासह वन्यप्राण्यांची सुध्दा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे.तर जंगलातील पाणवठे सुध्दा कोरडे पडले असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहे.

ठळक मुद्देवन्यप्राण्याचा उष्माघाताने मृत्यू : वन्यजीव विभागाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झपाट्याने होत आहे. नदी नाले, तलाव बोड्या कोरडे पडल्याने मनुष्यासह वन्यप्राण्यांची सुध्दा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे.तर जंगलातील पाणवठे सुध्दा कोरडे पडले असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहे. तर वाढते तापमान आणि पाण्याअभावी वन्यप्राण्यांचा मृत्यू होत आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील शशीकरण पहाडी परिसरात नुकताच असा प्रकार उघडकीस आला.तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहे. परिणामी तलावांच्या जिल्ह्यातच यंदा एप्रिल महिन्यातच पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने पाणीे टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यावर्षी तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात घट होत आहे.त्यामुळेच जंगलातील वन्यप्राण्यांना पाण्यासाठी गावाकडे धाव घेण्याची वेळ आली असून पाण्याअभावी व उष्णतेच्या दाहकतेमुळे रानगव्यासारख्या वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला. यामुळे वन आणि वन्यजीव विभागाच्या उपाय योजनांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २५६ पाणवठे असून त्यापैकी ७८ नैसिर्गक स्त्रोताचे तर १५४ कृत्रिम पाणवठे आहेत. २४ तलाव ही या क्षेत्रात आहे. १५४ कृत्रीम पाणवठ्यात पाणी पुरवठा व्हावा यासाठी १४१ हातपंप तयार केलेले आहेत. त्यापैकी ११० हातपंप सौरऊर्जेवर चालणारे आहेत.१३ पाणवठ्यात तीन टँकरच्या माध्यमातून पाण्याची सोय केली जात आहे. वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागत नसल्याचे वन्यजीव विभागाचे म्हणने आहे. तर वन्यप्रेमीनी आठ दिवसांपूर्वी जंगलातील कुठल्याच पाण्याची सोय करण्यात नसल्याचा आरोप केला आहे.काही निसर्ग प्रेमी संस्थानी यावर आवाज उठविल्यानंतर वन्यजीव विभागाने टँकर लावून पाण्याची सोय केल्याची माहिती आहे. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील थाटेझरी गावाजवळील मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :forest departmentवनविभाग