शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
7
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
8
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
9
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
10
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
11
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
12
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
13
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
14
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
15
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
16
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
17
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
18
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
19
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
20
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
Daily Top 2Weekly Top 5

जंगलातील पाणवठे पडले कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 21:11 IST

यंदा तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झपाट्याने होत आहे. नदी नाले, तलाव बोड्या कोरडे पडल्याने मनुष्यासह वन्यप्राण्यांची सुध्दा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे.तर जंगलातील पाणवठे सुध्दा कोरडे पडले असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहे.

ठळक मुद्देवन्यप्राण्याचा उष्माघाताने मृत्यू : वन्यजीव विभागाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा तापमानात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झपाट्याने होत आहे. नदी नाले, तलाव बोड्या कोरडे पडल्याने मनुष्यासह वन्यप्राण्यांची सुध्दा पाण्याच्या शोधात भटकंती सुरू आहे.तर जंगलातील पाणवठे सुध्दा कोरडे पडले असल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहे. तर वाढते तापमान आणि पाण्याअभावी वन्यप्राण्यांचा मृत्यू होत आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील शशीकरण पहाडी परिसरात नुकताच असा प्रकार उघडकीस आला.तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आणि तलाव पूर्णपणे कोरडे पडले आहे. परिणामी तलावांच्या जिल्ह्यातच यंदा एप्रिल महिन्यातच पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने पाणीे टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यावर्षी तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने त्याचा परिणाम सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात घट होत आहे.त्यामुळेच जंगलातील वन्यप्राण्यांना पाण्यासाठी गावाकडे धाव घेण्याची वेळ आली असून पाण्याअभावी व उष्णतेच्या दाहकतेमुळे रानगव्यासारख्या वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला. यामुळे वन आणि वन्यजीव विभागाच्या उपाय योजनांवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २५६ पाणवठे असून त्यापैकी ७८ नैसिर्गक स्त्रोताचे तर १५४ कृत्रिम पाणवठे आहेत. २४ तलाव ही या क्षेत्रात आहे. १५४ कृत्रीम पाणवठ्यात पाणी पुरवठा व्हावा यासाठी १४१ हातपंप तयार केलेले आहेत. त्यापैकी ११० हातपंप सौरऊर्जेवर चालणारे आहेत.१३ पाणवठ्यात तीन टँकरच्या माध्यमातून पाण्याची सोय केली जात आहे. वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकावे लागत नसल्याचे वन्यजीव विभागाचे म्हणने आहे. तर वन्यप्रेमीनी आठ दिवसांपूर्वी जंगलातील कुठल्याच पाण्याची सोय करण्यात नसल्याचा आरोप केला आहे.काही निसर्ग प्रेमी संस्थानी यावर आवाज उठविल्यानंतर वन्यजीव विभागाने टँकर लावून पाण्याची सोय केल्याची माहिती आहे. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील थाटेझरी गावाजवळील मालगुजारी तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. त्यामुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी गावाकडे धाव घेत असल्याचे चित्र आहे.यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :forest departmentवनविभाग