शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

पाणपोईचा धर्म झाला बाटलीबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:35 IST

तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासारखा दुसरा कोणता माणुसकीचा मोठा धर्म नाही. त्यामुळेच उन्हाळा आला की शहरासह ग्रामीण भागात सामाजिक भान म्हणून पाणपोई उभारल्या जातात. परंतु काही वर्षापासून पाणी टंचाई व पाणी विक्रीच्या व्यापारामुळे सामाजिक बांधीलकी जोपासणाºया पाणपोईचा धर्म बाटली बंद पाण्यामध्ये कालबाह्य झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजागोजागी दिसणाऱ्या पाणपोई लुप्त । पाणीविक्रीचा धंदा फोफावला

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासारखा दुसरा कोणता माणुसकीचा मोठा धर्म नाही. त्यामुळेच उन्हाळा आला की शहरासह ग्रामीण भागात सामाजिक भान म्हणून पाणपोई उभारल्या जातात. परंतु काही वर्षापासून पाणी टंचाई व पाणी विक्रीच्या व्यापारामुळे सामाजिक बांधीलकी जोपासणाºया पाणपोईचा धर्म बाटली बंद पाण्यामध्ये कालबाह्य झाल्याचे चित्र आहे.तहानलेल्यास घोटभर पाणी पाजणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाºया सामाजिक संस्था व संघटना सामाजिक भान जपत दरवर्षी उन्हाळ्यात वाटसरुंसाठी पाणपोई सुरू करीत होते.या सामाजिक कार्यासाठी पाच-सहा वर्षापूर्वी बरेच हात पुढे येत. मात्र आजघडीला या सामाजिक कार्यासाठी अनेकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. सेवाभाव या वृत्तीने ग्रामीण भागात बसस्थानकासह वर्दळीच्या ठिकाणी किंवा आपल्या घर व दुकानासमोर पाणपोई उभारतात.या ठिकाणी रस्त्यावरुन जाणारी व्यक्ती आपसुकच पाणपोई दिसली की, क्षणभर विश्रांती घेऊन दोन घोट पाणी पिऊन नंतर पुढच्या मार्गाने प्रवासाला जायचे. काही वर्षापूर्वी ग्रामीण भागात हे चित्र बहुतांश ठिकाणी दिसायचे. परंतु कालौघात ग्रामीण व शहरी भागात पाणी पाजणे या पुण्याच्या कामाला अखेरची घरघर लागली आहे.गोरेगावात प्याऊचे उद्घाटननिसर्ग मंडळाने नागरिकांसाठी मुख्य चौकाच्या बाजूला प्याऊची व्यवस्था केली आहे. मंगळवारी (दि.२८) या प्याऊचे उद्घाटन करून नागरिकांसाठी प्याऊ सुरू करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, सचिव रेवेंद्रकुमार बिसेन, उपाध्यक्ष गुड्डू कटरे, कोषाध्यक्ष अंकीत रहांगडाले, महेश कटरे, डॉ. लोकेश तुरकर, टिटू जैन, शेखर रहांगडाले, पुरुषोत्तम बोपचे, गुड्डू ठाकूर, जगदिश पटले, किशोर भगत, सुरेश कटरे, रंजीत हरिणखेडे उपस्थित होते.लहान मोठ्या कार्यातही विकतचे पाणीतहानलेल्यांची तहान भागविणे हे पुण्याचे काम समजले जाते व पाणी विकणे हा अपराध समजला जायचा. परंतु काळ बदलला, आता ग्रामीण भागासह शहरी भागापर्यंत पाणी विकण्याच्या व्यवसायाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाटर फिल्टर उभे राहिले. कॅनच्या पाण्याची अलीकडे फॅशन झाली, अनेक ठिकाणी लहानमोठ्या कार्यातही कॅनचा वापर केला जात आहे.हॉटेलच्या पाण्यावर भिस्तआजघडीला पानपोईचे पाणी पिने नागरिकांना कमीपणाचे वाटत आहे. त्यामुळे अनेक जन हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खात हॉटेलच्या पाण्यावर तहान भागवितात. एकीकडे हॉटेलातील गरम पाण्याने तहान भागत नाही तर दुसरीकडे बाटलीबंद पाण्याशिवाय उपाय नाही. 

टॅग्स :Waterपाणी