शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पाणपोईचा धर्म झाला बाटलीबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:35 IST

तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासारखा दुसरा कोणता माणुसकीचा मोठा धर्म नाही. त्यामुळेच उन्हाळा आला की शहरासह ग्रामीण भागात सामाजिक भान म्हणून पाणपोई उभारल्या जातात. परंतु काही वर्षापासून पाणी टंचाई व पाणी विक्रीच्या व्यापारामुळे सामाजिक बांधीलकी जोपासणाºया पाणपोईचा धर्म बाटली बंद पाण्यामध्ये कालबाह्य झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजागोजागी दिसणाऱ्या पाणपोई लुप्त । पाणीविक्रीचा धंदा फोफावला

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासारखा दुसरा कोणता माणुसकीचा मोठा धर्म नाही. त्यामुळेच उन्हाळा आला की शहरासह ग्रामीण भागात सामाजिक भान म्हणून पाणपोई उभारल्या जातात. परंतु काही वर्षापासून पाणी टंचाई व पाणी विक्रीच्या व्यापारामुळे सामाजिक बांधीलकी जोपासणाºया पाणपोईचा धर्म बाटली बंद पाण्यामध्ये कालबाह्य झाल्याचे चित्र आहे.तहानलेल्यास घोटभर पाणी पाजणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाºया सामाजिक संस्था व संघटना सामाजिक भान जपत दरवर्षी उन्हाळ्यात वाटसरुंसाठी पाणपोई सुरू करीत होते.या सामाजिक कार्यासाठी पाच-सहा वर्षापूर्वी बरेच हात पुढे येत. मात्र आजघडीला या सामाजिक कार्यासाठी अनेकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. सेवाभाव या वृत्तीने ग्रामीण भागात बसस्थानकासह वर्दळीच्या ठिकाणी किंवा आपल्या घर व दुकानासमोर पाणपोई उभारतात.या ठिकाणी रस्त्यावरुन जाणारी व्यक्ती आपसुकच पाणपोई दिसली की, क्षणभर विश्रांती घेऊन दोन घोट पाणी पिऊन नंतर पुढच्या मार्गाने प्रवासाला जायचे. काही वर्षापूर्वी ग्रामीण भागात हे चित्र बहुतांश ठिकाणी दिसायचे. परंतु कालौघात ग्रामीण व शहरी भागात पाणी पाजणे या पुण्याच्या कामाला अखेरची घरघर लागली आहे.गोरेगावात प्याऊचे उद्घाटननिसर्ग मंडळाने नागरिकांसाठी मुख्य चौकाच्या बाजूला प्याऊची व्यवस्था केली आहे. मंगळवारी (दि.२८) या प्याऊचे उद्घाटन करून नागरिकांसाठी प्याऊ सुरू करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, सचिव रेवेंद्रकुमार बिसेन, उपाध्यक्ष गुड्डू कटरे, कोषाध्यक्ष अंकीत रहांगडाले, महेश कटरे, डॉ. लोकेश तुरकर, टिटू जैन, शेखर रहांगडाले, पुरुषोत्तम बोपचे, गुड्डू ठाकूर, जगदिश पटले, किशोर भगत, सुरेश कटरे, रंजीत हरिणखेडे उपस्थित होते.लहान मोठ्या कार्यातही विकतचे पाणीतहानलेल्यांची तहान भागविणे हे पुण्याचे काम समजले जाते व पाणी विकणे हा अपराध समजला जायचा. परंतु काळ बदलला, आता ग्रामीण भागासह शहरी भागापर्यंत पाणी विकण्याच्या व्यवसायाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाटर फिल्टर उभे राहिले. कॅनच्या पाण्याची अलीकडे फॅशन झाली, अनेक ठिकाणी लहानमोठ्या कार्यातही कॅनचा वापर केला जात आहे.हॉटेलच्या पाण्यावर भिस्तआजघडीला पानपोईचे पाणी पिने नागरिकांना कमीपणाचे वाटत आहे. त्यामुळे अनेक जन हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खात हॉटेलच्या पाण्यावर तहान भागवितात. एकीकडे हॉटेलातील गरम पाण्याने तहान भागत नाही तर दुसरीकडे बाटलीबंद पाण्याशिवाय उपाय नाही. 

टॅग्स :Waterपाणी