शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

पाणपोईचा धर्म झाला बाटलीबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 23:35 IST

तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासारखा दुसरा कोणता माणुसकीचा मोठा धर्म नाही. त्यामुळेच उन्हाळा आला की शहरासह ग्रामीण भागात सामाजिक भान म्हणून पाणपोई उभारल्या जातात. परंतु काही वर्षापासून पाणी टंचाई व पाणी विक्रीच्या व्यापारामुळे सामाजिक बांधीलकी जोपासणाºया पाणपोईचा धर्म बाटली बंद पाण्यामध्ये कालबाह्य झाल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देजागोजागी दिसणाऱ्या पाणपोई लुप्त । पाणीविक्रीचा धंदा फोफावला

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : तहानलेल्यांची तृष्णा भागविण्यासारखा दुसरा कोणता माणुसकीचा मोठा धर्म नाही. त्यामुळेच उन्हाळा आला की शहरासह ग्रामीण भागात सामाजिक भान म्हणून पाणपोई उभारल्या जातात. परंतु काही वर्षापासून पाणी टंचाई व पाणी विक्रीच्या व्यापारामुळे सामाजिक बांधीलकी जोपासणाºया पाणपोईचा धर्म बाटली बंद पाण्यामध्ये कालबाह्य झाल्याचे चित्र आहे.तहानलेल्यास घोटभर पाणी पाजणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणाºया सामाजिक संस्था व संघटना सामाजिक भान जपत दरवर्षी उन्हाळ्यात वाटसरुंसाठी पाणपोई सुरू करीत होते.या सामाजिक कार्यासाठी पाच-सहा वर्षापूर्वी बरेच हात पुढे येत. मात्र आजघडीला या सामाजिक कार्यासाठी अनेकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. सेवाभाव या वृत्तीने ग्रामीण भागात बसस्थानकासह वर्दळीच्या ठिकाणी किंवा आपल्या घर व दुकानासमोर पाणपोई उभारतात.या ठिकाणी रस्त्यावरुन जाणारी व्यक्ती आपसुकच पाणपोई दिसली की, क्षणभर विश्रांती घेऊन दोन घोट पाणी पिऊन नंतर पुढच्या मार्गाने प्रवासाला जायचे. काही वर्षापूर्वी ग्रामीण भागात हे चित्र बहुतांश ठिकाणी दिसायचे. परंतु कालौघात ग्रामीण व शहरी भागात पाणी पाजणे या पुण्याच्या कामाला अखेरची घरघर लागली आहे.गोरेगावात प्याऊचे उद्घाटननिसर्ग मंडळाने नागरिकांसाठी मुख्य चौकाच्या बाजूला प्याऊची व्यवस्था केली आहे. मंगळवारी (दि.२८) या प्याऊचे उद्घाटन करून नागरिकांसाठी प्याऊ सुरू करण्यात आले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष रेखलाल टेंभरे, सचिव रेवेंद्रकुमार बिसेन, उपाध्यक्ष गुड्डू कटरे, कोषाध्यक्ष अंकीत रहांगडाले, महेश कटरे, डॉ. लोकेश तुरकर, टिटू जैन, शेखर रहांगडाले, पुरुषोत्तम बोपचे, गुड्डू ठाकूर, जगदिश पटले, किशोर भगत, सुरेश कटरे, रंजीत हरिणखेडे उपस्थित होते.लहान मोठ्या कार्यातही विकतचे पाणीतहानलेल्यांची तहान भागविणे हे पुण्याचे काम समजले जाते व पाणी विकणे हा अपराध समजला जायचा. परंतु काळ बदलला, आता ग्रामीण भागासह शहरी भागापर्यंत पाणी विकण्याच्या व्यवसायाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाटर फिल्टर उभे राहिले. कॅनच्या पाण्याची अलीकडे फॅशन झाली, अनेक ठिकाणी लहानमोठ्या कार्यातही कॅनचा वापर केला जात आहे.हॉटेलच्या पाण्यावर भिस्तआजघडीला पानपोईचे पाणी पिने नागरिकांना कमीपणाचे वाटत आहे. त्यामुळे अनेक जन हॉटेलमध्ये जाऊन काहीतरी खात हॉटेलच्या पाण्यावर तहान भागवितात. एकीकडे हॉटेलातील गरम पाण्याने तहान भागत नाही तर दुसरीकडे बाटलीबंद पाण्याशिवाय उपाय नाही. 

टॅग्स :Waterपाणी