शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

पाणीच पाणी चोहीकडे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 23:23 IST

जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. दुष्काळी परिस्थितीत मागील सहा दिवसापासून सुरु असलेल्या या सुखद ‘वर्षा’ वामुळे कोरडेठाक पडलेल्या जलाशयांची पाणी पातळी वाढत आहे. सोमवारी झालेल्या पावसाची जिल्ह्यात सरासरी २६.५४ मिमी. नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनदी-नाल्यांना पूर : लालनाला व नांद प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग; गावांना सतर्कतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यात सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. दुष्काळी परिस्थितीत मागील सहा दिवसापासून सुरु असलेल्या या सुखद ‘वर्षा’ वामुळे कोरडेठाक पडलेल्या जलाशयांची पाणी पातळी वाढत आहे. सोमवारी झालेल्या पावसाची जिल्ह्यात सरासरी २६.५४ मिमी. नोंद करण्यात आली आहे. हिंगणघाट तालुक्यात सर्वाधिक ३७.३० मिमी पावसाची नोेंद केली. या पावसामुळे समुद्रपूर तालुक्यातील लालनाला आणि हिंगणघाट तालुक्यातील नांद प्रकल्पाचे गेट उघडण्यात आले.यासोबतच वर्धा तालुक्यात २०.८१ मिमी, सेलू ९.८० मिमी, देवळी ३७.१५ मिमी, आर्वी २८.९१ मिमी, आष्टी २४.६६ मिमी, कारंजा १९.०८ मिमी, समुद्रपूर ३५.८६ मिमी पाऊस झाला असून जिल्ह्यात एकूण २१२.३० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे शेतीपिकांना नवसंजीवनी मिळाली असून सध्या काही भागात पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.लालनाला प्रकल्पाचे ५ दरवाजे २५ सेंमीने उघडलेकोरा: पाच दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने समुद्रपूर तालुक्यातील लाल नाला प्रकल्प पुर्णत: भरला आहे. त्यामुळे मंगळवारी दुपारी १२ वाजता या प्रकल्पाचे ५ दरवाजे २५ सेमीने उघडले असून त्यातून ७४.१८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. गुरुवारी सायंकाळपासून सुरु झालेल्या संततधार पावसाच्या पाण्याने हा प्रकल्प आता शंभर टक्के भरला आहे. मागील वर्षी हा प्रकल्प २२ सप्टेंबरला १०० टक्के भरला होता.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल दीड महिन्यापूर्वीच हा प्रकल्प फुल्ल झाला आहे. या प्रकल्पाचे सध्या पाच दरवाजे उघडले असून यातील पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील खांबाळा नदीत सोडले जाते. या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत असल्याने पूर बघण्याकरिता नागरिकांची गर्दी होत आहे. येथील पुरामुळे चिखली, आसोला व डोंगरगाव यासह इतरही गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महसूल विभाग, पोलीस प्रशासन आणि प्रलक्प अधिकारीही यावर लक्ष देऊन आहे. पावसाची संततधार आणि पाणी पातळी लक्षात घेता आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पाणी सोडताना कार्यकारी अभियंता एस.बी.काळे, उपअभियंता सुहास साळवे, सहाय्यक अभियंता शशांक वर्मा यांच्यासह १० कर्मचारी उपस्थित होते.नांद प्रकल्पाच्या सात दरवाज्यातून पाण्याचा विसर्गहिंगणघाट: सततच्या मुसळधार पावसामुळे वणा नदीवरील नांद धरण आज दुपारी २ वाजता ७१.६४ टक्के भरले. त्यामुळे या प्रकल्पातून ६८३.५२ क्युबिक मीटर प्रतीसेकंद पाण्याचा प्रवाह असल्याने सुरुवातीला या प्रकल्पाचे ४ दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर सायकाळपर्यंत सात दरवाजे दोन मीटर पर्यंत उघडले असून यातून ११२२.३५ सेमी.प्रती सेकंद पावसाचा विसर्ग सुरु आहे. तालुक्यात मागील दोन दिवसांपासुन सुरु असलेल्या सततच्या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला असुन जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आहे. पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून चांगलीच उघडीप दिल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. खरिपातील कपाशी व सोयाबीन पीक हातुन जाण्याच्या मार्गावर होते. परंतु या पावसाने सध्यातरी शेतकऱ्यांना जीवनदान दिल्याचे दिसून येते.चिंतातूर शेतकऱ्यांची चिंता दूरघोराड - परिसरात मागील तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. या पावसाने शेतकऱ्यांची सध्यातरी चिंता मिटल्याचे बोलले जात आहे. रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले आणि आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरणात आलेल्या सरींनी खरीप हंगामात पेरणीची सुरुवात झाली. पण, त्यानंतर पावसाने चांगलीच दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला होता. पण, आता आषाढ सरी शेतकºयांची पिक वाचविण्यासाठी चाललेली धडपड थांबविण्यास पोषक ठरल्या आहे. बुधवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असल्याने सध्याच्या पाऊस हा पिकांची खुंटलेली वाढ करण्यास उपयुक्त ठरणार आहे.हा पाऊस कपाशी व सोयाबीन पिकाला पोषक ठरणारा आहे. या पावसामुळे विहिरीच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोरडवाहू शेतकºयांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून हा पाऊस थांबताच शेतकरी खत, फवारणीच्या तयारी करीत आहे. हा पाऊस असाच सुरु राहिल्यास शेतकºयांच्या निंदनाच्या खर्चात मात्र वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर