शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
2
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
3
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
4
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
5
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
6
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
7
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
8
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
9
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
10
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
11
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
13
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
14
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
15
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
16
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
17
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
18
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
19
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
20
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट

पाण्याची भिस्त पुजारीटोलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:57 IST

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगा नदीचे पात्र देखील कोरडे पडले आहे. त्यामुळे डांर्गोली येथे या वैनगंगा नदीजवळ उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून....

ठळक मुद्देकमी पावसामुळे पाणी साठ्यात घट : महाराष्टÑ जीवन प्राधिकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगा नदीचे पात्र देखील कोरडे पडले आहे. त्यामुळे डांर्गोली येथे या वैनगंगा नदीजवळ उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून गोंदिया शहराला केल्या जाणाºया पाणी पुरवठ्यात घट झाली आहे. त्यामुळेच महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने आता पुजारीटोला प्रकल्पातून शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.गोंदिया शहराला महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. प्राधिकरणाचे शहरात १३ हजारांवर ग्राहक आहेत.प्रती व्यक्ती १३५ लिटर या प्रमाणे दिवसांतून दोनदा पाणी पुरवठा केला जातो.शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी गोंदियापासून १८ कि.मी.अंतरावर डांर्गोलीजवळील वैनगंगा नदीवर पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे.मात्र यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत घट झाली असून वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले. त्यामुळे शहराला नियमित केल्या जाणाºया पाणी पुरवठ्यात कपात करण्याची वेळ महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागावर आली आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात शहरवासीयांवरील पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र होवू शकते.मात्र उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महाराष्टÑ जीवन प्राधीकरणाचे कार्यकारी अभियंता आर.पी.चंद्रीकापुरे, उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके, वाघ इटियाडोह विभागाचे सहायक अभियंता शुभम, एम.जी.भेंडारकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत जानेवारी ते जून महिन्यादरम्यान गोंदिया शहराला पुजारीटोला प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.८० कि.मी.वरुन पाणी पोहचविणे कठीणगोंदियापासून ८० कि.मी.अंतरावर असलेल्या वाघ नदीवर पुजारीटोला प्रकल्प उभारण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पात केवळ १६ दलघमी पाणीसाठा आहे. या प्रकल्पाचे गेट उघडून वाघ नदीत पाणी सोडल्यानंतर ते पाणी बिरसोला गावाजवळ पोहचेल. या प्रकल्पापासून गोंदियापर्यंतचे अंतर ८० कि.मी.चे असल्याने पाणी आणण्यासाठी मोठा कस लागणार आहे. पाणी पोहचविण्याचे नियोजन केल्यानंतरही ते गोंदियापर्यंत पोहचणार की नाही.याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.३० वर्षानंतर प्रथमच जलसंकटमागील २५ ते ३० वर्षांच्या कालावधीत प्रथमच शहरवासीयांना केल्या जाणाºया पाणी पुरवठ्यात कपात करण्याची वेळ महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागावर आली आहे. आॅक्टोबर महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळेच शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होवू नये, यासाठी पुजारीटोला प्रकल्पातील पाण्याचा उपयोग करण्याची देखील पहिलीच वेळ असल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी सांगितले.दुसरा पर्यायवाघ नदीऐवजी पुजारीटोला प्रकल्पातील पाणी मुख्य नहराव्दारे पाणी सोडून ते रजेगावजवळील कन्हारटोला नाल्याच्या माध्यमातून पोहचविणे शक्य आहे. हे अंतर देखील ७० कि.मी.चे आहे.कन्हारटोला ते डांर्गोली हे अंतर दीड कि.मी.चे आहे. पुजारीटोलाचे पाणी नहराव्दारे आणण्याचे असेल तर नहराचे इतर ठिकाणाचे सर्व गेट बंद करावे लागतील. त्याची अधिसूचना देखील काढावी लागेल. तेव्हाच पाणी डांर्गोलीपर्यंत पोहचेल. सध्या जिल्हा प्रशासन आणि पाणी पुरवठा विभागाने या दोन्ही पर्यांयावर अभ्यास करणे सुरू केले आहे. जो पर्याय योग्य ठरेल त्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा केला जाणार आहे.पाणी बचतीचे आवाहनकमी पावसामुळे पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची बचत करण्याचे आवाहन केले जात आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करुन अपव्यय टाळण्याची सूचना सुद्धा केली जात आहे.