शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

पाण्याची भिस्त पुजारीटोलावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:57 IST

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगा नदीचे पात्र देखील कोरडे पडले आहे. त्यामुळे डांर्गोली येथे या वैनगंगा नदीजवळ उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून....

ठळक मुद्देकमी पावसामुळे पाणी साठ्यात घट : महाराष्टÑ जीवन प्राधिकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातून वाहणाºया वैनगंगा नदीचे पात्र देखील कोरडे पडले आहे. त्यामुळे डांर्गोली येथे या वैनगंगा नदीजवळ उभारण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेतून गोंदिया शहराला केल्या जाणाºया पाणी पुरवठ्यात घट झाली आहे. त्यामुळेच महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने आता पुजारीटोला प्रकल्पातून शहरवासीयांना पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.गोंदिया शहराला महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाच्या पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. प्राधिकरणाचे शहरात १३ हजारांवर ग्राहक आहेत.प्रती व्यक्ती १३५ लिटर या प्रमाणे दिवसांतून दोनदा पाणी पुरवठा केला जातो.शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी गोंदियापासून १८ कि.मी.अंतरावर डांर्गोलीजवळील वैनगंगा नदीवर पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली आहे.मात्र यंदा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत घट झाली असून वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले. त्यामुळे शहराला नियमित केल्या जाणाºया पाणी पुरवठ्यात कपात करण्याची वेळ महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागावर आली आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात शहरवासीयांवरील पाणी टंचाईचे संकट अधिक तीव्र होवू शकते.मात्र उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महाराष्टÑ जीवन प्राधीकरणाचे कार्यकारी अभियंता आर.पी.चंद्रीकापुरे, उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके, वाघ इटियाडोह विभागाचे सहायक अभियंता शुभम, एम.जी.भेंडारकर व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीत जानेवारी ते जून महिन्यादरम्यान गोंदिया शहराला पुजारीटोला प्रकल्पातून पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.८० कि.मी.वरुन पाणी पोहचविणे कठीणगोंदियापासून ८० कि.मी.अंतरावर असलेल्या वाघ नदीवर पुजारीटोला प्रकल्प उभारण्यात आला आहे. सध्या या प्रकल्पात केवळ १६ दलघमी पाणीसाठा आहे. या प्रकल्पाचे गेट उघडून वाघ नदीत पाणी सोडल्यानंतर ते पाणी बिरसोला गावाजवळ पोहचेल. या प्रकल्पापासून गोंदियापर्यंतचे अंतर ८० कि.मी.चे असल्याने पाणी आणण्यासाठी मोठा कस लागणार आहे. पाणी पोहचविण्याचे नियोजन केल्यानंतरही ते गोंदियापर्यंत पोहचणार की नाही.याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.३० वर्षानंतर प्रथमच जलसंकटमागील २५ ते ३० वर्षांच्या कालावधीत प्रथमच शहरवासीयांना केल्या जाणाºया पाणी पुरवठ्यात कपात करण्याची वेळ महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागावर आली आहे. आॅक्टोबर महिन्यातच वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळेच शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होवू नये, यासाठी पुजारीटोला प्रकल्पातील पाण्याचा उपयोग करण्याची देखील पहिलीच वेळ असल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाºयांनी सांगितले.दुसरा पर्यायवाघ नदीऐवजी पुजारीटोला प्रकल्पातील पाणी मुख्य नहराव्दारे पाणी सोडून ते रजेगावजवळील कन्हारटोला नाल्याच्या माध्यमातून पोहचविणे शक्य आहे. हे अंतर देखील ७० कि.मी.चे आहे.कन्हारटोला ते डांर्गोली हे अंतर दीड कि.मी.चे आहे. पुजारीटोलाचे पाणी नहराव्दारे आणण्याचे असेल तर नहराचे इतर ठिकाणाचे सर्व गेट बंद करावे लागतील. त्याची अधिसूचना देखील काढावी लागेल. तेव्हाच पाणी डांर्गोलीपर्यंत पोहचेल. सध्या जिल्हा प्रशासन आणि पाणी पुरवठा विभागाने या दोन्ही पर्यांयावर अभ्यास करणे सुरू केले आहे. जो पर्याय योग्य ठरेल त्या माध्यमातून शहराला पाणी पुरवठा केला जाणार आहे.पाणी बचतीचे आवाहनकमी पावसामुळे पाणी टंचाईची समस्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनातर्फे शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची बचत करण्याचे आवाहन केले जात आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करुन अपव्यय टाळण्याची सूचना सुद्धा केली जात आहे.