शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
7
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
8
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
9
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
10
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
11
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
12
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
13
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
14
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
15
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
16
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
17
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
18
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
19
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
20
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले

पाणीपुरवठ्याची कामे मार्चपूर्वीच झाली पाहिजेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:23 IST

गोंदिया : उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई भासत आहे. त्यामुळे पाणी टंचाई भासणार नाही, असे नियोजन करून पाण्याचे ...

गोंदिया : उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई भासत आहे. त्यामुळे पाणी टंचाई भासणार नाही, असे नियोजन करून पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणाहून पाणी उपलब्ध करून पाणी टंचाईवर मात करावी, तसेच दरवर्षी पाणीपुरवठ्याशी संबंधीत कामे मार्च महिन्यापूर्वीच पूर्ण करण्याचे नियोजन करीत जा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पाणीपुरवठ्याबाबत राज्यमंत्री बनसोडे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. आमदार विनोद अग्रवाल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे उपस्थित होते. राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, पांदन रस्त्यांच्या कामासाठी जेवढा निधी लागेल, तेवढा निधी उपलब्ध करून देणार, त्यासाठी मागणी प्रस्ताव सादर करावा. जल जीवन मिशनबाबत वेळोवेळी बैठका घेण्यात याव्या, असे सांगितले. आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, शहराच्या पाणी टंचाईसाठी डांगोर्ली बॅरेज बांधणे गरजेचे आहे. लोकांना पाणी मिळाले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. माजी आमदार राजेंद्र जैन यांनी गोंदिया शहराला सकाळ व संध्याकाळ किती पाणीपुरवठा करण्यात येतो, याबाबत विचारणा करून नाराजी व्यक्त केली. पाणी टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील सन २०२०-२१ अंतर्गत पाणी टंचाई आराखडा टप्पा १ निरंक असून, टप्पा २ अंतर्गत एकूण १०१ उपाययोजनांचे ५६ लाख ६४ रुपयांच्या आराखड्यास मंजुरी प्राप्त झालेली आहे. टप्पा ३ अंतर्गत एकूण १,६४७ उपाययोजनांचे ५८९.१९ लक्ष रुपये आराखड्याला मंजुरी प्राप्त झालेली असल्याचे सांगितले. अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सचिन गोसावी, जि.प.उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (सामान्य) नरेशश भांडारकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सतीश चंद्रसुशिल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रत्नाकर चंद्रिकापुरे उपस्थित होते.

.....

जल जीवन मिशन अंतर्गत कामे सुुरू

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यात सन २०२०-२१ मध्ये घरगुती नळ जोडणी एकूण ५४५ ग्रामपंचायतीमध्ये ८८९ व १,६०० वाड्यामधील एकूण कुटुंब संख्या २,५१,८६७ पैकी सन २०२०-२१ अंतर्गत नळ जोडणी व खासगी स्रोत मिळून १,६१,४९८ उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.