शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

पाणीपुरवठ्याची कामे मार्चपूर्वीच झाली पाहिजेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:23 IST

गोंदिया : उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई भासत आहे. त्यामुळे पाणी टंचाई भासणार नाही, असे नियोजन करून पाण्याचे ...

गोंदिया : उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई भासत आहे. त्यामुळे पाणी टंचाई भासणार नाही, असे नियोजन करून पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणाहून पाणी उपलब्ध करून पाणी टंचाईवर मात करावी, तसेच दरवर्षी पाणीपुरवठ्याशी संबंधीत कामे मार्च महिन्यापूर्वीच पूर्ण करण्याचे नियोजन करीत जा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पाणीपुरवठ्याबाबत राज्यमंत्री बनसोडे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. आमदार विनोद अग्रवाल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे उपस्थित होते. राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, पांदन रस्त्यांच्या कामासाठी जेवढा निधी लागेल, तेवढा निधी उपलब्ध करून देणार, त्यासाठी मागणी प्रस्ताव सादर करावा. जल जीवन मिशनबाबत वेळोवेळी बैठका घेण्यात याव्या, असे सांगितले. आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, शहराच्या पाणी टंचाईसाठी डांगोर्ली बॅरेज बांधणे गरजेचे आहे. लोकांना पाणी मिळाले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. माजी आमदार राजेंद्र जैन यांनी गोंदिया शहराला सकाळ व संध्याकाळ किती पाणीपुरवठा करण्यात येतो, याबाबत विचारणा करून नाराजी व्यक्त केली. पाणी टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील सन २०२०-२१ अंतर्गत पाणी टंचाई आराखडा टप्पा १ निरंक असून, टप्पा २ अंतर्गत एकूण १०१ उपाययोजनांचे ५६ लाख ६४ रुपयांच्या आराखड्यास मंजुरी प्राप्त झालेली आहे. टप्पा ३ अंतर्गत एकूण १,६४७ उपाययोजनांचे ५८९.१९ लक्ष रुपये आराखड्याला मंजुरी प्राप्त झालेली असल्याचे सांगितले. अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सचिन गोसावी, जि.प.उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (सामान्य) नरेशश भांडारकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सतीश चंद्रसुशिल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रत्नाकर चंद्रिकापुरे उपस्थित होते.

.....

जल जीवन मिशन अंतर्गत कामे सुुरू

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यात सन २०२०-२१ मध्ये घरगुती नळ जोडणी एकूण ५४५ ग्रामपंचायतीमध्ये ८८९ व १,६०० वाड्यामधील एकूण कुटुंब संख्या २,५१,८६७ पैकी सन २०२०-२१ अंतर्गत नळ जोडणी व खासगी स्रोत मिळून १,६१,४९८ उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.