शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याची कामे मार्चपूर्वीच झाली पाहिजेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:23 IST

गोंदिया : उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई भासत आहे. त्यामुळे पाणी टंचाई भासणार नाही, असे नियोजन करून पाण्याचे ...

गोंदिया : उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे जिल्ह्यात पाणी टंचाई भासत आहे. त्यामुळे पाणी टंचाई भासणार नाही, असे नियोजन करून पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणाहून पाणी उपलब्ध करून पाणी टंचाईवर मात करावी, तसेच दरवर्षी पाणीपुरवठ्याशी संबंधीत कामे मार्च महिन्यापूर्वीच पूर्ण करण्याचे नियोजन करीत जा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात पाणीपुरवठ्याबाबत राज्यमंत्री बनसोडे आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. आमदार विनोद अग्रवाल, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीपकुमार डांगे उपस्थित होते. राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, पांदन रस्त्यांच्या कामासाठी जेवढा निधी लागेल, तेवढा निधी उपलब्ध करून देणार, त्यासाठी मागणी प्रस्ताव सादर करावा. जल जीवन मिशनबाबत वेळोवेळी बैठका घेण्यात याव्या, असे सांगितले. आमदार विनोद अग्रवाल म्हणाले, शहराच्या पाणी टंचाईसाठी डांगोर्ली बॅरेज बांधणे गरजेचे आहे. लोकांना पाणी मिळाले पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले. माजी आमदार राजेंद्र जैन यांनी गोंदिया शहराला सकाळ व संध्याकाळ किती पाणीपुरवठा करण्यात येतो, याबाबत विचारणा करून नाराजी व्यक्त केली. पाणी टंचाई निवारण कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील सन २०२०-२१ अंतर्गत पाणी टंचाई आराखडा टप्पा १ निरंक असून, टप्पा २ अंतर्गत एकूण १०१ उपाययोजनांचे ५६ लाख ६४ रुपयांच्या आराखड्यास मंजुरी प्राप्त झालेली आहे. टप्पा ३ अंतर्गत एकूण १,६४७ उपाययोजनांचे ५८९.१९ लक्ष रुपये आराखड्याला मंजुरी प्राप्त झालेली असल्याचे सांगितले. अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) सचिन गोसावी, जि.प.उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (सामान्य) नरेशश भांडारकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सतीश चंद्रसुशिल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता रत्नाकर चंद्रिकापुरे उपस्थित होते.

.....

जल जीवन मिशन अंतर्गत कामे सुुरू

जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यात सन २०२०-२१ मध्ये घरगुती नळ जोडणी एकूण ५४५ ग्रामपंचायतीमध्ये ८८९ व १,६०० वाड्यामधील एकूण कुटुंब संख्या २,५१,८६७ पैकी सन २०२०-२१ अंतर्गत नळ जोडणी व खासगी स्रोत मिळून १,६१,४९८ उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.