शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

मागील ८ दिवसांपासून तिरोडा शहराचा पाणीपुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:54 IST

बिरसी फाटा : तिरोडा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणीपुरवठा होत असून, मागील ८ दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून ...

बिरसी फाटा : तिरोडा शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून पाणीपुरवठा होत असून, मागील ८ दिवसांपासून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतून पाणीपुरवठा होत नसल्याने शहराला होणारा पाणीपुरवठा जवळपास बंद आहे. पाण्याअभावी नागरिक बेजार झाले असून, नगर परिषद किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून शहरात पाणीपुरवठा होणार नसल्याची कुठलीही सूचना देण्यात न आल्याने नागरिक नाराज आहेत. ही अडचण दूर करण्याचे प्रयत्न सुरू असून २ दिवसांत पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे वर्तविली जात आहे.

तिरोडा शहरातील अंदाजे ३५०० न‌ळधारकांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून वैनगगा नदीवरून पाणीपुरवठा करण्यात येतो. धापेवाडा उपसा सिंचन योजनेने धरणाची दारे बंद केल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीस पुरवठा होत नसल्याने तिरोडा शहराचा पाणीपुरवठा मागील ८ दिवसांपासून बंद आहे. असे असतानाही शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याची कोणतीही सूचना नगर परिषद किंवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने दिली नसल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे शाखा अभियंता सुनील भांडारकर यांना विचारणा केला असता त्यांनी, धापेवाडा उपसा सिंचन योजनेचे धरणाचे दार बंद केल्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीस पाणीपुरवठा होत नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणाचे झिरपणारे पाणी विहिरीपर्यंत आणण्याचा प्रयत्न सुरू असून २ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वर्तविली आहे. मात्र, पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांना आणखी त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. याकरिता प्राधिकरण व धापेवाडा उपसा सिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून अशी परिस्थिती निर्माण होऊ नये याची दक्षता घेण्याची गरज होती, असे तिरोडा शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे.