शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

रबीसाठी पाणी पुरवठा सुरू

By admin | Updated: March 5, 2017 00:11 IST

रबीच्या हंगामातील पिकांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी पाटबंधारे विभागाने यंदा ११ हजार ९९० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केल्याची माहिती आहे.

बाघ व इटियाडोह प्रकल्पातून सिंचन : पाणी सोडल्याची चौथी पाळी कपिल केकत   गोंदिया रबीच्या हंगामातील पिकांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी पाटबंधारे विभागाने यंदा ११ हजार ९९० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केल्याची माहिती आहे. अशात आता विभागाकडून पिकांसाठी प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा केला जात आहे. आतापर्यंत विभागाने चौथी पाळी गाठली असून इटियाडोह व पूजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. पिकांना पाणी मिळत असल्यामुळे रबीचे उत्पादन चांगले निघणार असल्याचा अंदाज लावता येत आहे. जिल्ह्याला धानाचे कोठार अशी साजूक उपमा देण्यात आली आहे. वास्तवीक जिल्ह्यातील प्रमुख पीकही धानच आहे. मात्र बदलत्या काळानुरूप निसर्गाचा लहरीपणा वाढला असून धानाच्या या कोठारात आता धानालाच ग्रहण लागू लागले आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण घटत चालले असून शेतीला फटका बसतच चालला आहे. परिणामी शेतकरी दारिद्रयात झोकला जात असतानाच धानाचे उत्पादनही घटत चालले आहे. यात धानच काय सर्वच शेती नेस्तनाबूत होऊ लागल्याचे भकास वास्तव आज जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. शेतकरी आपल्या रक्ताचे पाणी करून शेती करीत आहेत. मात्र पाऊस आपला रंग दाखवून त्यांचे जीवन बेरंग करीत आहे. परिणामी शेती महागडी होऊ लागली असून शेतकऱ्यांचा निसर्गावरील भरवसा उठू लागला आहे. खरिपातही पावसाने आपला रंग दाखविला मात्र परतीच्या पावसाने चमत्कार केल्याने शेतकरी कसा तरी उभा राहिला. त्यात पाटबंधारे विभागाने सिंचनाची सोय करून दिल्याने कितीतरी शेतकऱ्यांचे पीक बचावले. पाटबंधारे विभागच देव बनून शेतकऱ्यांसाठी धावून आल्याचे दिसून आले व नेहमी विभागाकडून सिंचनाची सोय केली जाते. याचेच फलीत आहे की, जिल्ह्यातील शेतकरी आजही पावसाच्या लहरीपणावर नव्हे तर पाटबंधारे विभागाच्या भरवशावर आपली शेती करीत आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. शेतकऱ्यांच्या या विश्वासाला लक्षात घेत पाटबंधारे विभागाने यंदाही रबी हंगामासाठी ११ हजार ९९० हेक्टर क्षेत्राचे नियोजन केले आहे. यात बाघ प्रकल्पातून चार हजार ६० हेक्टर क्षेत्राचे तर इटियाडोह प्रकल्पातून सात हजार ९३० हेक्टर क्षेत्राचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यानुसार पाटबंधारे विभागाकडून या दोन्ही प्रकल्पांतून सिंचनासाठी पाण्याचा पुरवठा केला जात आहे. यात १ जानेवारीपासून इटियाडोह प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. तर १६ जानेवारीपासून पूजारीटोला प्रकल्पातून पाणी सोडले जात आहे. सिंचनासाठी पाण्याच्या सुमारे ११ पाळ््या द्याव्या लागतात. १०-१२ दिवस सतत पाणी सुरू ठेवतात व त्यानंतर सुमारे ५-६ दिवस बंद केले जाते त्याला पाळी म्हणतात. त्यानुसार सध्या चौथी पाळी सुरू असून महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या कालव्यांना पाणी सोडले जात आहे. पिकांना यंदा चांगले पाणी मिळाले आहे. त्यामुळे रबीचा हंगाम चांगला जाणार असल्याचेही दिसून येत आहे. इटियाडोहचे ६७ तर पूजारीटोलाचे ४३ दलघमी पाणी सोडले रबी पिकांना सिंचनाची सोय व्हावी यासाठी पाटबंधारे विभागाकडून योग्य ते नियोजन करण्यात आले आहे. शिवाय पाटबंधारे विभागाने १ जानेवारीपासूनच पिकांना पाणी मिळावे यासाठी प्रकल्पांतून पाणी सोडण्याचे काम सुरू केले आहे. यात १ जानेवारीपासून इटियाडोह प्रकल्पातून पाणी सोडले जात असून आतापर्यंत प्रकल्पातून ६६.८६ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. तर १६ जानेवारीपासून पूजारीटोली प्रकल्पातून पाणी सोडले जात असून आतापर्यंत ४३.२६ दलघमी पाणी सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे सिरपूचे २ गेट ०.३० मीटरने पूजारीटोलासाठी सुरू असून १६१९ क्युसेस प्रवाह आहे.