शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

पाणीपट्टीची वसुली न देणाऱ्या १६ गावातील पाणी पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:29 IST

गोंदिया : एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू होताच उन्हाची भीषण दाहकता सुरू झाली. यात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत ...

गोंदिया : एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू होताच उन्हाची भीषण दाहकता सुरू झाली. यात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपट्टीचे थकीत असलेले पैसे न दिल्यामुळे आमगाव तालुक्यातील १३, तर सालेकसा तालुक्यातील ३ अशा १६ गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.

आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत सुरूवातीला ४८ गावांना या योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येते. परंतु सद्यस्थितीत केवळ ३८ गावांना पाणी पुरवठा केला जातो. शुध्द पाणी घेणारे नळ ग्राहक महिन्याकाठी पैसे देत नाही किंवा ग्रामपंचायतीकडून पैसे वसुली केली जात नसल्याने या योजनेचा पाणी पुरवठा होत असलेल्या गावांतील वारंवार पाणी पुरवठा बंद करण्यात येतो. ७ एप्रिलपासून आमगाव तालुक्यातील १३, तर सालेकसा तालुक्यातील ३ गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. आमगाव तालुक्यातील बोरकन्हार ४ लाख १२ हजार ७२०, बाम्हणी ३ लाख ७३ हजार, शिवनी ४ लाख ३५ हजार ३२८, चिरचाळबांध ५ लाख ३१ हजार ४२०, खुर्शीपार ३ लाख ४५ हजार ९७०, जवरी ३ लाख ५३ हजार ६००, बोथली ३ लाख १ हजार ४४०, सुपलीपार २ लाख ५३ हजार ६२०, कालीमाटी ३ लाख ६० हजार ७४२, किकरीपार ३ लाख ९७ जार ५८४, ननसरी १ लाख २८ हजार १८०, फुक्कीमेटा २ लाख २० हजार २५२, धामणगाव ९५ हजार ६९० असे एकूण ४२ लाख ९ हजार ५४६ रुपये, सालेकसा तालुक्यातील साखरीटोला ५ लाख ९६ हजार ७६४, कारुटोला १ लाख ९० हजार ५७६, हेट्टी १ लाख ८९ हजार ४७० एकूण ९ लाख ७६ हजार ८१० रुपये थकीत आहेत.

बॉक्स

नगर परिषद क्षेत्रातील गावांचाही होणार पाणी पुरवठा ठप्प

आमगाव नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या बनगाव, आमगाव, पदमपूर, कुंभारटोली, रिसामा, किडंगीपार अशा सर्व गावांतील पाणी पुरवठा बंद होणार आहे. बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे ९ लाख १८ हजार ४०६ रुपये आमगाव नगर परिषदेवर थकीत आहेत. तहसीलदार यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित वसुली करून बिलाचा भरणा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बॉक्स

सरपंच व ग्रामसेवकांनी घ्यावा पुढाकार घ्यावा

उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना पाणी पुरवठा बंद होऊ नये, यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी खबरदारी घ्यावी. वेळीच ग्राहकांकडून वसुली करून पाणीपट्टीचे पैसे भरण्यात यावे, जेणेकरून योजना चालवण्यात अडचण होणार नाही.