शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टीची वसुली न देणाऱ्या १६ गावातील पाणी पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:29 IST

गोंदिया : एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू होताच उन्हाची भीषण दाहकता सुरू झाली. यात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत ...

गोंदिया : एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू होताच उन्हाची भीषण दाहकता सुरू झाली. यात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपट्टीचे थकीत असलेले पैसे न दिल्यामुळे आमगाव तालुक्यातील १३, तर सालेकसा तालुक्यातील ३ अशा १६ गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.

आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत सुरूवातीला ४८ गावांना या योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येते. परंतु सद्यस्थितीत केवळ ३८ गावांना पाणी पुरवठा केला जातो. शुध्द पाणी घेणारे नळ ग्राहक महिन्याकाठी पैसे देत नाही किंवा ग्रामपंचायतीकडून पैसे वसुली केली जात नसल्याने या योजनेचा पाणी पुरवठा होत असलेल्या गावांतील वारंवार पाणी पुरवठा बंद करण्यात येतो. ७ एप्रिलपासून आमगाव तालुक्यातील १३, तर सालेकसा तालुक्यातील ३ गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. आमगाव तालुक्यातील बोरकन्हार ४ लाख १२ हजार ७२०, बाम्हणी ३ लाख ७३ हजार, शिवनी ४ लाख ३५ हजार ३२८, चिरचाळबांध ५ लाख ३१ हजार ४२०, खुर्शीपार ३ लाख ४५ हजार ९७०, जवरी ३ लाख ५३ हजार ६००, बोथली ३ लाख १ हजार ४४०, सुपलीपार २ लाख ५३ हजार ६२०, कालीमाटी ३ लाख ६० हजार ७४२, किकरीपार ३ लाख ९७ जार ५८४, ननसरी १ लाख २८ हजार १८०, फुक्कीमेटा २ लाख २० हजार २५२, धामणगाव ९५ हजार ६९० असे एकूण ४२ लाख ९ हजार ५४६ रुपये, सालेकसा तालुक्यातील साखरीटोला ५ लाख ९६ हजार ७६४, कारुटोला १ लाख ९० हजार ५७६, हेट्टी १ लाख ८९ हजार ४७० एकूण ९ लाख ७६ हजार ८१० रुपये थकीत आहेत.

बॉक्स

नगर परिषद क्षेत्रातील गावांचाही होणार पाणी पुरवठा ठप्प

आमगाव नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या बनगाव, आमगाव, पदमपूर, कुंभारटोली, रिसामा, किडंगीपार अशा सर्व गावांतील पाणी पुरवठा बंद होणार आहे. बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे ९ लाख १८ हजार ४०६ रुपये आमगाव नगर परिषदेवर थकीत आहेत. तहसीलदार यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित वसुली करून बिलाचा भरणा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बॉक्स

सरपंच व ग्रामसेवकांनी घ्यावा पुढाकार घ्यावा

उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना पाणी पुरवठा बंद होऊ नये, यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी खबरदारी घ्यावी. वेळीच ग्राहकांकडून वसुली करून पाणीपट्टीचे पैसे भरण्यात यावे, जेणेकरून योजना चालवण्यात अडचण होणार नाही.