शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

पाणीपट्टीची वसुली न देणाऱ्या १६ गावातील पाणी पुरवठा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:29 IST

गोंदिया : एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू होताच उन्हाची भीषण दाहकता सुरू झाली. यात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत ...

गोंदिया : एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा सुरू होताच उन्हाची भीषण दाहकता सुरू झाली. यात लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपट्टीचे थकीत असलेले पैसे न दिल्यामुळे आमगाव तालुक्यातील १३, तर सालेकसा तालुक्यातील ३ अशा १६ गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे.

आमगाव व सालेकसा या दोन तालुक्यांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत सुरूवातीला ४८ गावांना या योजनेतून पाणी पुरवठा करण्यात येते. परंतु सद्यस्थितीत केवळ ३८ गावांना पाणी पुरवठा केला जातो. शुध्द पाणी घेणारे नळ ग्राहक महिन्याकाठी पैसे देत नाही किंवा ग्रामपंचायतीकडून पैसे वसुली केली जात नसल्याने या योजनेचा पाणी पुरवठा होत असलेल्या गावांतील वारंवार पाणी पुरवठा बंद करण्यात येतो. ७ एप्रिलपासून आमगाव तालुक्यातील १३, तर सालेकसा तालुक्यातील ३ गावांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. आमगाव तालुक्यातील बोरकन्हार ४ लाख १२ हजार ७२०, बाम्हणी ३ लाख ७३ हजार, शिवनी ४ लाख ३५ हजार ३२८, चिरचाळबांध ५ लाख ३१ हजार ४२०, खुर्शीपार ३ लाख ४५ हजार ९७०, जवरी ३ लाख ५३ हजार ६००, बोथली ३ लाख १ हजार ४४०, सुपलीपार २ लाख ५३ हजार ६२०, कालीमाटी ३ लाख ६० हजार ७४२, किकरीपार ३ लाख ९७ जार ५८४, ननसरी १ लाख २८ हजार १८०, फुक्कीमेटा २ लाख २० हजार २५२, धामणगाव ९५ हजार ६९० असे एकूण ४२ लाख ९ हजार ५४६ रुपये, सालेकसा तालुक्यातील साखरीटोला ५ लाख ९६ हजार ७६४, कारुटोला १ लाख ९० हजार ५७६, हेट्टी १ लाख ८९ हजार ४७० एकूण ९ लाख ७६ हजार ८१० रुपये थकीत आहेत.

बॉक्स

नगर परिषद क्षेत्रातील गावांचाही होणार पाणी पुरवठा ठप्प

आमगाव नगर परिषद क्षेत्रात येणाऱ्या बनगाव, आमगाव, पदमपूर, कुंभारटोली, रिसामा, किडंगीपार अशा सर्व गावांतील पाणी पुरवठा बंद होणार आहे. बनगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचे ९ लाख १८ हजार ४०६ रुपये आमगाव नगर परिषदेवर थकीत आहेत. तहसीलदार यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित वसुली करून बिलाचा भरणा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

बॉक्स

सरपंच व ग्रामसेवकांनी घ्यावा पुढाकार घ्यावा

उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना पाणी पुरवठा बंद होऊ नये, यासाठी सरपंच व ग्रामसेवकांनी खबरदारी घ्यावी. वेळीच ग्राहकांकडून वसुली करून पाणीपट्टीचे पैसे भरण्यात यावे, जेणेकरून योजना चालवण्यात अडचण होणार नाही.